Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, मार्च ०६, २०२१

कोकणातील युवकांनी शेतीची कास धरावी विकेल ते पिकेल योजनेच्या माध्यमातून कोकण सुजलाम सुफलाम करुया - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

  कोकणातील युवकांनी शेतीची कास धरावी विकेल ते पिकेल योजनेच्या माध्यमातून कोकण सुजलाम सुफलाम करुया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे



     मुंबई दि.- 6 :  शेती ही शाश्वत आहे. कोरोनाच्या संकटात शेतकऱ्यांनी फक्त दोन घास दिले नाहीत तर अर्थव्यवस्थेला बळ देण्याचे कामही केले. याचा विचार करून कोकणातील युवकांनी शेतीच्या व्यवसायाकडे वळावे. शासनाने सुरू केलेल्या विकेल ते पिकेल या योजनेच्या माध्यमातून कोकणवासियांनी कोकण सुजलाम सुफलाम करावा असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

      मालवण तालुक्यातील मसुरे- आंगणेवाडी लघु पाटबंधारे योजना ,मालोंड- मालडी कोल्हापूरी पाटबंधारे योजना आणि कणकवली तालुक्यातील कुंभवडे लघु पाटबंधारे योजनेचे भूमिपूजन आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने झाले. त्यावेळी ते बोलत होते.  यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंतमृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाखजिल्हा परिषदेच्या अध्यक्षा समिधा नाईकखासदार सर्वश्री विनायक राऊतअरविंद सावंतआमदार वैभव नाईकआमदार दीपक केसरकररोहयो व जलसंधारण विभागाचे अपर मुख्य सचिव नंदकुमारजिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मीमुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायरजिल्हा पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडेआंगणेवाडी देवस्थान समितीचे अध्यक्ष भास्कर आंगणेबिळवस - आंगणेवाडीचे सरपंच मानसी पालवमालडीचे सरपंच संदीप आडवलकरकुंभवडे सरपंच सूर्यकांत तावडेश्री. वडाळकरजिल्हा जलसंधारण अधिकारीरत्नागिरीश्री. देवशेट्टेउपविभागीय जलसंधारण अधिकारीअंबडपाल व फोंडाघाट आदी मान्यवर उपस्थित होते.

       कोरोनाने जगाची आर्थिक गाडी घसरलीपणया संकटकाळात अर्थचक्राचा डोलारा सांभाळण्याचे काम शेतकऱ्यांनी केल्याचे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले कीएक जिल्हा एक उत्पादन आणि त्याला बाजारपेठ मिळावीमालाचा दर्जा चांगला रहावात्याची अधिकाधिक निर्यात व्हावी यासाठी शासनाने विकेल ते पिकेल योजना सुरू केली आहे. संपूर्ण कोकणपट्टा सुंदर आहे. निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. माझे कोकणावरचे प्रेम मी कधीच लपवले नाही. म्हणूनच मी गेल्या वर्षी भराडी देवीच्या दर्शनाला आलो होतो. तेंव्हा कोकणातील योजना आणि व्यथांचा विचार केला. त्यातील अनेक गोष्टी मार्गी लावत असताना कोरोना आला आणि सगळ ठप्प झाले. असे असले तरी कोकणचा विकास मार्गी लावणार म्हणजे लावणारच. माझा कोकण संपन्न झाला पाहिजेत्यासाठी जे करता येईल ते ते करण्याचे वचन भराडी देवीच्या साक्षीने माझ्या कोकणवासियांना माता भगिनींना देतो असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

       भराडी मातेला वंदन करून कोरोना राक्षस नष्ट करून हा माझा सुंदर कोकण आणि महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होऊ दे अशी प्रार्थना करून मुख्यमंत्री पुढे म्हणाले कीआंगणेवाडीच्या जत्रेत कोरोना काळात गर्दी करू नका या केलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल भाविकांना धन्यवाद देतो. माझ्या शक्तीचा कण नि कण महाराष्ट्राच्या भल्यासाठी खर्च होऊ दे असा आशिर्वाद मागताना कोकणच्या विकासासाठी शासन कटीबद्ध असल्याची ग्वाहीही दिली. भराडी मातेची कृपा म्हणून इतके वर्ष मार्गी न लागलेल्या या तीन योजना आज मार्गी लागत आहेतयाचा निश्चित आनंद आहे. आज आपण सर्वजण एकत्र येऊन कोरोना संकटाचा मुकाबला करत आहोत. आपण सगळे सहकार्य करतो आहोत. म्हणूनच कोरोनाची दुसरी लाट आपण थोपवू शकत आहोत असे मुख्यमंत्री यांनी सांगितले. 

        ते पुढे म्हणाले कीआपल्या सर्वांनाच माहीत आहे कीकोकणात पाऊस भरपूर पडतोपूर येतोअतिवृष्टी होतेपण ते संपल्यानंतर सगळ पाणी वाहून समुद्राला मिळतेअनेक ठिकाणी पाऊस पडून गेल्यानंतर उरलेले सगळे वर्ष कोरडे जाते. मग अनेक खलबत होतातयोजना पुढे येतात. पण आज अरविंद सावंतविनायक राऊत यांनी या तीन योजना पुढे आणल्या. त्या कागदावर न ठेवता प्रत्यक्षात येण्यासाठी पाठपुरावा केला. योजनांसाठी पाठपुरावा करून घेतायाला अधिक महत्व आहे. राज्यात अनेक धऱणपाटबंधारे झालेपण अजून काही कामे बाकी आहेत. आता आपण गोसीखुर्द धरणाच्या कामाला गती दिली आहे. आज या तीन पाटबंधारे कामांचे आपण भूमिपूजन ऑनलाईन करतो आहोत. पणधरणाच्या उद्घाटनाला मी तिथे प्रत्यक्ष येईल हे माझे तुम्हाला वचन आहे. अनेकजण स्वतःसाठी काही ना काही मागत असतातपण कोकणातील लोकप्रतिनिधी जनतेचे सेवकविश्वस्त म्हणून काम करत आहेत. स्वतःसाठी काही न मागता जनतेसाठी रुग्णालय आणि इतर गोष्टी मागत असल्याचा मला आनंद असल्याचेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

       यावेळी पालकमंत्री उदय सामंत,खासदार विनायक राऊतअरविंद सावंत यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. तर रोहयो आणि जलसंधारण विभागाचे अपर मुख्यसचिव नंदकुमार यांनी प्रास्ताविकामध्ये या तीन ही पाटबंधारे योजनांची वैशिष्ट्येसाठवण क्षमता आणि खर्च याची माहिती दिली. 


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.