Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, ऑक्टोबर १५, २०२०

छ. शिवाजी महाराज शाकाहारी होते की मांसाहारी होते ?

छ. शिवाजी महाराज शाकाहारी होते की मांसाहारी होते ?

________________________
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
________________________
छ. शिवाजी महाराज शाकाहरी होते की मांसाहारी होते हा प्रश्न ब-याचजणांना पडतो. शिवाजी महाराज हे मिताहारी म्हणजेच शाकाहारी होते असा संदर्भ त्यांचे समकालीन कवी परमानंद यांच्या “श्री शिवभारत “या चरित्रात मिळतो.

आपल्या स्वराज्याच्या ध्येयाला गाठण्यासाठी अहोरात्र झटणा-या मावळ्यांनाही शाकाहार घेणे सक्तीचे होते. शिवरायंच्या गडकिल्ल्यांवर मांसाहार करण्यास प्रतिबंध होता. इतकेच नव्हे तर गडांवरील मुदपाकखान्यामध्ये मांसाहार बनवणेही निषिद्ध होते.

छ. शिवाजी महाराज शाकाहारी होते की मांसाहारी होते ?

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीची नोंद आपल्याला तत्कालीन पुस्तके, प्रवासनोंदी व चरित्रांमध्ये मिळते.
इंग्रज प्रवासी आणि डॉ. जॉन फ्रायर, महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी रायगडावर उपस्थित होता. त्याने आपल्या प्रवासाचे वर्णन करून ठेवले आहे. त्यात मराठ्यांच्या खाण्याबाबतचा मजकूर आढळतो. तो लिहितो की,

"रायरी (रायगड ) वरील आमच्या मुक्कामादरम्यान घडलेला एक प्रसंग मी येथे सांगू इच्छितो . इथल्या लोकांचे जेवण अत्यंत साधे आहे आणि ते तयार करण्यासाठी फारसा खर्च देखील येत नाही. इथल्या लोकांचा परमोच्च आवडीचा पदार्थ म्हणजे खिचडी ( फ्रायर या पदार्थाला cutchery असे म्हणतो ! ) हा खिचडी नावाचा पदार्थ तांदूळ आणि डाळ एकत्र करून , हे मिश्रण लोण्यामध्ये शिजवून तयार केला जातो. या खिचडीवरच या लोकांचे देह पोसलेले असतात. परंतु आमच्या सारख्या तिन्हीत्रिकाळ मांस खाण्याची सवय असलेल्या इंग्रजांचा फार काळ पर्यंत मराठयांची ही खिचडी खाऊन निभाव लागणे अशक्य होते , त्यामुळे आम्ही राजाला ( शिवाजी महाराजांना ) आमच्या समूहातील लोकांना पुरेल एवढे मांस रोज देण्याची विनंती केली. आमची ही विनंती मान्य करून शिवाजी महाराजांनी , गडावर थोड्याफार प्रमाणात असलेल्या मुसलमानांसाठी (फ्रायर Moors असा शब्द वापरतो . Moors म्हणजे मुसलमान ) मांस पुरवणाऱ्या खाटकाला , आम्ही गडावर असे पर्यंत आम्हालाही लागेल तेवढे बोकडाचे मांस (दुसऱ्या कोणत्याही प्राण्याचे मांस गडावर येत नसल्यामुळे ) पुरवत जावे अशी आज्ञा केली.

शिवाजी महाराजांच्या या आज्ञेप्रमाणे हा खाटीक आम्हाला रोज बोकडाचे मांस पुरवू लागला . आम्हाला प्रत्येक दिवसाला साधारण पणे अर्धा बोकड लागत असे . आमच्या या दररोजच्या मागणीमुळे या खाटकाचा धंदा फारच जोमाने चालू लागला ! त्याला या गोष्टीचे एवढे आश्चर्य वाटले की , " एवढे मटण रोज खातंय तरी कोण ? " हे पाहण्याकरता वृद्ध असलेला हा खाटीक , गड चढण्याचे कष्ट सोसून एके दिवशी आम्हाला पाहायला आला ! गेल्या काही वर्षात त्याच्याकडून इतके मांस कोणीच विकत घेतले नव्हते ! याचे कारण म्हणजे या प्रदेशातील लोक फारच कवचित मांसाहार करतात; शिवाय हिंदू लोक ( फ्रायर येथे Gentiles असा शब्द वापरतो . Gentiles याचा अर्थ यहुदी नसलेले लोक असा होतो, सामान्यपणे इतिहासामध्ये हिंदूंना हा शब्द वापरतात ) अजिबातच मांस खात नाहीत आणि मुसलमान किंवा पोर्तुगीज लोक मांस चांगल्याप्रकारे उकडल्याशिवाय किंवा शिजवल्याशिवाय खात नाहीत . आपल्याप्रमाणे ( इंग्रजांप्रमाणे ) मांस फक्त भाजून असे क्वचितच कोणी खात असेल ! पण मला असे वाटते की मांस खाण्याची आपली ही पद्धत चुकीची आहे. खास करून या उष्ण देशामध्ये मांस नीट शिजवून खाल्ल्यास त्याचा पोटाला त्रास होणार नाही , परंतु आपला स्वभाव सतत धावपळ करण्याचा असल्यामुळे , आपण हे मांस शिजवण्याबीजावण्याच्या भानगडीत पडत नाही . पण माझ्या मते आपली पोटं बिघडण्यामागचे हेच कारण असावे हे अनुभवी लोकांच्या लक्षात येईल !"
यावरून आपल्याला असे वाटू शकेल की मराठे/शिवाजी महाराज अजिबात मांसाहार करत नव्हते. पण तसे वाटणे चुकीचे ठरेल. हिंदू सुद्धा थोड्याप्रमाणात मांसाहार करत होते परंतु युरोपिअन लोकांच्या मांसाहार करण्याच्या तुलनेत ते नगण्य होते.मांसाहार हा क्षत्रियांचा आहार आहे. अर्थात महाराज आई भवानीचे भक्त होते,आणि देवीला बोकडाचा नैवेद्य लागतो. म्हणून छत्रपती शिवराय व संभाजी महाराज हे देखील मांसाहार करत असावेत ? असे वाटते.
दुसरा मतप्रवाह पाहु:
राज्याभिषेकाच्या १५ दिवस पूर्वी महाराज्यांनी हा संपूर्ण सोहळा लेखीस्वरूपात मांडावा म्हणून दोन इंग्रज अधिकाऱ्यांना रायगडावर बोलावून घेतले त्याची नावे थॉमस निकोलस आणि हेन्री ऑक्सिनेंन. ज्यावेळी ह्या दोन्ही अधिकाऱ्यांना मांसाहार करायची इच्छा व्हायची तेंव्हा गडाच्या पायथ्यावरुन तो मांसाहार शिजवून आणला जायचा.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,गडावर कधीही कोणी मांसाहार करत नसे इतकेच नव्हे तर गडावर तो शिजवलाही जात नसत अशी नोंद आहे.छत्रपती शिवाजी महाराज हयात असताना कवी परमानंद यांनी ‘श्री शिवभारत’ हे समकालीन चारित्र लिहलं. ह्या चरित्रात कवी परमानंदाने असं लिहलंय कि शिवाजी महाराज हे “मितआहारी” आहेत.मित म्हणजे कमी व आहारी म्हणजे खाणारे . त्यामुळे शिवाजी महाराज हे शाकाहारी होते हे सिद्ध होते.इतकेच नव्हे तर शिवाजी महाराज्यांचे गुरु संत तुकाराम महाराज यांनी शिवाजी महाराज्यांच्या मावळ्यांना प्रेरणा म्हणून ज्या ओव्या आणि अभंग रचले त्यातही असा उल्लेख आहे कि मावळ्यांनी निर्व्यसनी आणि शाकाहारी असायला हवे.
आणखी एक पुरावा पाहु:
बूधभूषणम् ह्या छत्रपती संभाजी महाराजांनी रचलेल्या ग्रंथाच्या तिसऱ्या प्रकरणातील ४१ वा श्लोक यासंदर्भात आहे. यात शंभुराजे म्हणतात –

द्युतं च मांसं च सुरां च वेश्या पापर्दभिचौर्यं परदारसेवा ।
एतानि सप्तं व्यसनानि सप्तं नरं सुघोरं नरकं नयन्ति ।।

अर्थात – जुगार खेळणे, मांस भक्षण करणे, मद्यपान करणे, वेश्यागमन करणे, भ्रष्ट मार्गाने संपत्ती गोळा करणे, चोरी करणे आणि परस्त्रीची सेवा करणे (तिच्याशी संबंध ठेवणे) ही नरकात नेणारी सात दारे आहेत. ह्या श्लोकात छत्रपती संभाजी महाराजांनी स्पष्टपणे मांसाहार करणे हे नरकाचे द्वार असल्याचे म्हटले आहे. मग असे असताना छत्रपती मांसाहार करत होते, असे मानणे धाडसाचे वाटते.
एकुण काय तर ,हिंदू धर्मामध्ये सर्वांनाच कायमस्वरूपी शाकाहाराचे बंधन नाही. ब्राह्मण सोडता अन्य वर्णांना मांसाहाराची मुभा आहे. फक्त काही विशिष्ट दिवसांमध्ये किंवा देवकार्यामध्ये मांसाहार केला जात नाही. महाराज क्षत्रिय होते. दुष्ट, अन्यायी आणि परकीय लोकांविरुद्ध लढणे हे क्षत्रियाचे कर्तव्य आहे. त्यामुळे बलोपासना हे क्षत्रियांच्या कर्माचे एक अंग आहे - त्यामुळे ते कायमस्वरूपी शाकाहारी असण्याचे काहीच कारण नाही.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.