निफन्द्रा ,(प्रतिनिधी )14 :
सावली तालुक्यातील रयतवारी येथील शेतीला पाणी करण्याकरिता गेलेल्या बाप-लेक यांना विद्युत स्पर्श लागल्यामुळे मुलाचा मृत्यु तर वडील जखमी झाले आहेत. नेहमी प्रमाणे शेतीमध्ये भाजीपाल्याला पाणी देण्याकरिता मोटार चालू करण्याकरिता गेला असता मुलाला करंट लागल्यामुळे वडील मुलाला वाचविण्याकरिता प्रयत्न केले असता त्यालाही करंट लागला. त्यामुळे मुलाचा जागीच मृत्यु झाला तर वडील जखमी झाल्यामुळे गडचिरोली येथील दवाखान्यात नेण्यात आले आहे. घटनेची सदर चौकशी व पंचनामा सहायक पोलीस निरीक्षक मस्के, बोलीवार, रूपेश व वाटे एरिया लाइनमैन यांच्या उपस्थित पुढील तपास चालू आहे.