चंद्रपूर /प्रतिनिधी:
राज्यात कोरोनाबाधितांची संख्या चिंताजनक आहे. यामुळे हातावर आणून पानावर खाणाऱ्या गरजूना उपाशीपोटी दिवस काढावे लागू नये म्हणून लोकसभा क्षेत्राचे खासदार बाळू धानोरकर यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी लोकसभा क्षेत्रातील चंद्रपूर, बल्लारपूर, वरोरा, राजुरा, भद्रावती,वणी, घाटंजी येथील पाच हजार गरजूना भोजन वितरित करण्यात आले.
दररोज 05 हजार गरजुना अन्नाची पाकिटे वाटप करण्यात येत आहे. संपूर्ण देशात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला असताना, धानोरकर दाम्पत्याने गरजू व गोरगरीब अडकलेले मजूर यांना दोन वेळच्या जेवणाची सोय करण्याचे आवाहन केले होते व चार दिवसांपासून चालू केलेल्या या उपक्रमास दिवसेदिवस वाढते गरजु पाहता दररोज 5 हजार जेवणाचे पॉकेट पुरवण्याचे संकल्प खासदार बाळूभाऊ धानोरकर व आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केला आहे.
यात वरोरा तालुक्यात राजू महाजन, राजू चीकटे, गजानन मेश्राम, सुभाष दांडले तर भद्रावती येथे नगराध्यक्ष अनिल धानोरकर, प्रफ्फुल चटकी ,विनोद वानखेडे,व सर्व नगरसेवक ,वणी येथे माजी आमदार कासावार साहेब यांच्या नेतृत्वात विवेक मांडवकर ,ओम ठाकूर ,राजू मालेकर , प्रमोद निकुरे, घाटजी आर्णी येथे आरीज बेग, पालाश बोढे, निखिल देठे ,राजुरा येथे अरुण धोटे यांच्या मार्गदर्शनात तर बल्लारशाह व चंद्रपूर येथे रामू तीवारी,गोपाल अमृतकर संतोष लहमगे, करीम भाई ,घनश्याम मूलचनदानी अशोक मत्ते या सर्व काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून गरजुना जेवणाची पॉकेट पोहचवण्यासाठी परिश्रम घेत आहे. कोणीही गरजू भुकेल्या पोटी झोपता काम नये याची काळजी घेण्याचे आवाहन खासदार बाळू धानोरकर यांनी केले आहे