Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, एप्रिल ०६, २०२०

कोरोनाची लक्षणे दिसू लागल्यास त्वरित शासकीय यंत्रणेशी संपर्क साधा:विजय वडेट्टीवार

Navabharat शराबबंदी की जल्द होगी समीक्षा ...
चंद्रपूर/प्रतिनिधी:
 जगासह देशाला विळखा घातलेल्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संशयित व्यक्तींची माहिती शासकीय यंत्रणेला त्वरित कळवावी,नागरिकांनी प्रशासनाच्या नियमांचं पालन करावे, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन विकास मंत्री श्री. विजय वडेट्टीवार यांनी केले. 

चंद्रपूर जिल्ह्यात एकही पॉझीटीव्ह रुग्ण आढळून आला नसला तरी कोरोनाची लक्षणे दिसू लागल्यास त्वरित शासकीय यंत्रणेशी संपर्क साधा. अशा नागरिकांनी घाबरून जाऊ नये, या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी त्यांनी स्वताहून पुढे यावे तसे केले तर या विषाणूचा प्रसार रोखण्यास मदत होईल असे वडेट्टीवार म्हणाले. आम्ही तुमच्यासाठी घराबाहेर आहोत पण तुम्ही घरातच थांबा असा भावूक संदेश गेल्या कित्येक दिवसांपासून डॉक्टर व पोलिसांकडून देण्यात येतोय.

पण अजूनही काहींना करोनाचे संकट किती गंभीर आहे याची जाणीव नाहीये. रस्त्यावरील गर्दी काही प्रमाणात कमी झाली असली तरी अजूनही काही नागरिक बेपर्वाईने वागताना दिसत आहेत. राज्यात दिसागणिक कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून मृत्यूंची संख्याही वाढत आहे हि चिंतेची बाब असून आता तरी जबाबदारीने वागा असं आवाहन वडेट्टीवार यांनी नागरिकांना केले आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नागरिकांना (५ एप्रिल) रोजी रात्री नऊ वाजता नऊ मिनिटांसाठी घरातील विजेवर चालणार प्रकाशदिवे बंद करून मेणबत्ती, दिवे, मोबाईलची टॉर्च किंवा फ्लॅश लावायला सांगितले असताना अनेकजण रस्त्यावर झुंडीने उतरले, फटाके वाजवले हे अशोभनीय वर्तन असून यापुढे तरी सर्वांनी जबाबदारीने वागले पाहिजे, अशी अपेक्षा वडेट्टीवार यांनी व्यक्त केली आहे.

कोरोनाविरुद्धच्या लढाईत राज्यातील आत्यआवश्य्क सेवेतील कर्मचारी हे आपल्या जीवाची पर्वा नकरता कोरोनाग्रस्तानच्या मदतीसाठी तत्पर असलेले पाहायला मिळत आहेत. मात्र कोरोनाग्रसत्तांच्या संपर्कात आल्याने त्यांच्यात कोरोनाचा संसर्ग दिसू लागला आहे,

 ही बाब चिंताजनक आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईत यशस्वी होण्यासाठी घरात थाबनणे, आणि लक्षण आढळून आल्यास त्वरित शासकीय यंत्रणेशी संपर्क साधने हाच प्रभावी मार्ग असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले.कोरोनाच्या लढाईत आपण सर्व एक आहोत ही बाब कोरणाविरुद्धच्या लढाईत आपल्याला यश मिळवून देईल असा विश्वासही वडेट्टीवार यांनी व्यक्त केला आहे. 
कोरोनाची लक्षणे दिसू लागल्यास त्वरित शासकीय यंत्रणेशी संपर्क साधा. अशा नागरिकांनी घाबरून जाऊ नये, या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी त्यांनी स्वताहून पुढे यावे तसे केले तर या विषाणूचा प्रसार रोखण्यास मदत होईल. विजय वडेट्टीवार, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन विकास मंत्री

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.