Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, मार्च २७, २०२०

घरांचे प्रवेशद्वारही झाले निर्जंतुकीकरण




राजुरा नगर परिषदेचा उपक्रम

राजुरा/ प्रतिनिधी

कोरोणा विषाणूंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राजुरा नगरपरिषदेने ठोस पावले उचललेली आहेत. शहरातील प्रत्येक नागरिकांचे प्रवेशद्वार निर्जंतुकीकरण करण्यासाठी आरोग्य विभागाने मोहीम सुरू केली आहे. आठवडी बाजारातील शेडचे निर्जंतुकीकरण नगरपरिषदेने केले.

राजूरा शहरात शनिवारला भरणारा आठवडी बाजार बंद झाल्यानंतर दैनिक भाजी मार्केटमध्ये नागरिकांची प्रचंड गर्दी उसळली होते. त्यामुळे प्रशासनासमोर आव्हान निर्माण झाले होते. विशेष म्हणजे दैनदिन भाजी मार्केट शहराचा मध्यभागी आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्याची खबरदारी घेत नगरपरिषदेने 26 मार्चला दैनिक बाजाराचे स्थलांतरण सोमनाथपुर येथील आठवडी बाजार भरणार्या जागेवर केले. आठवडी बाजाराचे संपुर्ण शेड निर्जंतुकीकरण करण्यात आले. कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शहरातील सर्व शासकीय कार्यालयांचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. शिवाय भाजी मार्केटमध्ये नागरिकांनी सुरक्षित अंतर ठेवूनच भाजीपाला खरेदी करावी. शक्यतोवर गर्दी टाळावी. घरात आपल्या कुटुंबियांसमवेत सुरक्षित थांबावे आवाहन नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी केले आहे.




कोरोणा विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रत्येक नागरिकांचे घराचे लोखंडी प्रवेशद्वारांचे निर्जंतुकीकरण करण्याची मोहीम सुरू केलेले आहे. याअगोदर आरोग्याच्या दृष्टीने शासकीय कार्यालये, बँक, बस स्टॉप, दवाखाने यांचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. नागरिकांनी घरी ही स्वच्छता पाळावी. शासनाच्या आदेशाचे पालन करावे.
संकेत नंदवंशी,
पाणी पुरवठा व आरोग्य अभियंता, नगरपरिषद राजुरा..


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.