Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, मार्च १२, २०२०

रामाळा तलाव खोलीकरण करण्याची इको-प्रो ची मागणी

रामाळा तलावातील पाणी कमी झाल्याने उर्वरीत पाणी सोडुन खोलीकरणास संधी
चंद्रपूर/प्रतिनिधी:
 शहरातील एकमेव ऐतिहासिक गोंडकालीन रामाळा तलावाचे खोलीकरण व सौदर्यीकरणाची मागणी इको-प्रो ने जिल्हाधिकारी यांचेकडे केलेली आहे. यासदर्भात इको-प्रो चे अध्यक्ष बंडु धोतरे यांनी जिल्हाधिकारी कुणाल खेमणार यांना निवेदन देत, सध्या तलावाचे कमी होत असलेले पाणी याकडे लक्ष वेधत तलाव खोलीकरणास वाव असुन यांसदर्भात त्वरीत निर्णय घेण्याची विनंती करण्यात आली.

यापुर्वी सुध्दा रामाळा तलाव खोलीकरण व सौदर्यीकरण बाबत वेळोवेळी निवेदन देण्यात आलेली आहेत. मागील दोन महिन्याच्या कालावधीत रामाळा तलावातील पाणी लिकेजेस मुळे मोठया प्रमाणात तलावाबाहेर गेलेले असुन फार अल्प प्रमाणात पाणीसाठा असल्याने, उर्वरीत पाणी सोडुन तलावाचे खोलीकरण व सौदर्यीकरणास मोठी संधी आहे. तेव्हा सदर तलाव खोलीकरण करण्यास व तलावातील गाळ काढुन वहन करण्याच्या कामास स्थानिक उदयोगांच्या ‘सामाजीक दायित्व निधीतुन’ निधी उपलब्ध करून त्वरीत कामास सुरूवात करण्यात आल्यास मार्च महिन्यात पाणी सोडुन येत्या एप्रील, मे व जुन महिन्यात सदर काम करणे शक्य होईल. रामाळा तलावाचे सौदर्यीकरणाचा प्रस्ताव सुध्दा अनेक वर्षापासुन मागे पडलेला असुन खनिज विकास निधीतुन या प्रस्तावास मंजुरी प्रदान करून हा प्रश्न कायमचा निकाली काढण्याची गरज निर्माण झालेली आहे.
रामाळा तलावात येणारे नाल्याचे सांडपाणी वळती करून, तलाव संवर्धनासाठी व्हावे प्रयत्न
वर्ष 2008 मध्ये रामाळा तलाव मध्ये इकाॅर्नीया या जलीय वनस्पतीने थैमान मांडले होते. यावेळी इको-प्रो च्या रामाळा तलाव स्वच्छता अभियानास प्रशासनाचा पुढाकार योग्य मदत आणि विवीध संस्था-संघटना यांच्या श्रमदानातुन रामाळा तलाव स्वच्छ करण्यात आलेला होता. या तलावाचे पुर्ण पाणी सोडण्यात आल्यानंतर तलावास सुकवुन इकाॅर्नीया पुर्णपणे काढण्यात आली होती. मात्र यावेळेस वेळ आणि निधीची कमतरता यामुळे रामाळा तलावाचे खोलीकरण करणे शक्य झाले नव्हते. यंदा तलावातील पाणी कमी होत असल्याने ही मोठी संधी असुन प्रशासनाने खोलीकरणाच्या कामास त्वरीत सुरूवात करण्याची गरज आहे.
ऐतिहासिक रामाळा तलाव प्रदुषणापासुन मुक्त करित, सौदर्यीकरणाची आवश्यकता
ऐतीहासिक गोंडकालीन रामाळा तलाव आज अनेक समस्यांना समोर जात आहे, त्या सोडविण्याची गरज आहे.
1. रामाळा तलाव शहरातील सर्वात मोठे सांडपाणी जमा होण्याचे केेंद्र झाले आहे.
2. शहरातील मुख्य मच्छीनाल्याच्या एक भाग जो झरपट नदीस मिळतो तो सरळ तलावात येतो.
3. यामुळे तलावातील या घाण पाण्यावर जगणारी अनेक जलीय वनस्पती वाढत असते.
4. सोबत तलावानजीक राहणाऱ्या नागरीकांना या पाण्याच्या दुर्गधी आणी आजांराचा सामना करावा लागतो. मागील हप्ताभरापासुन या दुर्गधीची तिव्रता अधिक झालेली दिसुन येते.
5. यावर ‘वाॅटर ट्रिटमेंट प्लाॅन्ट’ बसविण्याची गरज असतांना अदयापही व्यवस्था करण्यात आलेली नाही.
6. स्थानीक नागरीकांचे सांडपाणी सुध्दा सरळ तलावात जात असते. वस्तीतील सांडपाणी वाहुन जाणारी व्यवस्था योग्य करण्याची गरज आहे.
7. लगतच्या रेल्वे मालधक्कावरून रासायनीक खते चढ-उतार होत असल्याने जमीनीवर पडणारे युरीया, सल्फेट सारखी खते पावसाच्या पाण्यासोबत वाहुन तलावात येत असतात.
8. तलावाच्या पच्छिम दिशेस अतिक्रमणाची समस्या कायम असुन त्या बाजुस संरक्षण भिंतीचे बांधकाम अदयापही झालेले नाही.
9. गेल्या शेकडो वर्षातील वाहुन आलेला गाळ, आणि लोकवस्ती झाल्यानंतर नाल्यातुन सांडपाणी सोबतचा नालीचा गाळ कधीच काढण्यात आलेला नाही.
10. सातत्याने दरवर्षी होणारे गणेश व दुर्गा मुर्ती विसर्जन यामुळे जमा होणारी माती याचा थर वाढतच चालला आहे.
11. खोलीकरणानंतर पावसाचे पाण्याने तलाव भरणे शक्य नसल्यास वेकोली चे सातत्याने भुगर्भातील फेकण्यात येत असलेले पाणी तलावाकडे वळविणे सहज शक्य आहे.
12. ‘स्वच्छ भारत अभियानास’ साथ म्हणुन ‘स्वच्छ चंद्रपूर-सुंदर चंद्रपूर’ करीता या तलावाचे खोलीकरण अगत्याचे झालेले आहे.
या सर्व समस्या सोडविण्याच्या दृष्टीने, आपला ऐतिहासिक वारसा संरक्षणाच्या दृष्टीने तसेच शहरातील अत्यंत महत्वाचे विस्तीर्ण असे जलस्त्रोत कायमस्वरूपी संवर्धन करण्याच्या दृष्टीने व्यापकपणे कार्य करण्याची गरज आहे. तसेच या रामाळा तलावाचे सोदर्यीकरण करून पर्यटन दृष्टया विकसीत करण्याची इको-प्रोची मागणी आहे. त्यासंदर्भात लगेच पावले उचलुन सध्या योग्य वेळ असल्याने लगेच तलावाचे उर्वरीत पाणी सोडुन तलाव लवकर सुकविण्यात आल्यास खोलीकरणाच्या कामास सुरूवात होऊ शकते. यासोबत तलावाचे सौदर्यीकरणास सुध्दा मोठी संधी निर्माण होउ शकते अशी आशा इको-प्रो चे बंडु धोतरे यांनी व्यक्त केली आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.