Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, जून १०, २०१९

चंद्रपुरात महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मारहाण

मारहाण करणाऱ्या तिघांविरोधात सरकारी कामात अडथळा 
आणणे ई,कलमा अंतर्गत गुन्हा दाखल 
ललित लांजेवार/नागपूर(९१७५९३७९२५):
चंद्रपुरात महावितरण कंपनीच्या शास्त्री  नगर कार्यालयातील कर्मचाऱ्यांना रविवारी रात्री 3 लोकांनी मारहाण केली,चंद्रपूर विभागातील उपविभाग क्रमांक 2,शास्त्रीनगर शाखा कार्यालयात कार्यरत कर्मचारी पी.एस.राऊत व एस.के.गायकवाड यांना स्थानिक शामनगर गणपती चौक परिसरात मधील इमरानं,जावेद शेख व शेरकी नामक तीन इसमांनी दिनांक ०९/०६/२०१९ रोजी रात्री १०:१५ वाजता वीजपुरवठा खंडित झाल्याच्या कारणावरून मारहाण केली. 

मारहाण झाल्यावेळी ज्यांना मारहाण झाली ते पी.एस.राऊत व एस.के.गायकवाड कार्यालयात उपस्थित होते, तर तक्रार निवारण तथा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात साठी अशोक गायकवाड हे वरिष्ठ तंत्रज्ञ व चिवंडे नामक विद्युत सहाय्यक हे दोघे हे गेले होते. 
त्यांनी शामनगर मधील वीजपुरवठा लगेच पूर्ववत केला होता. परंतु गणपती चौक शामनगर मधील इमरानं जावेद व शेरकी यांनी वीज गेल्यावर लगेच शास्त्री नगर कार्यालय गाठत पाण्याची कॅन,खुर्च्या आदी तोडत, सामान फेका फरक करत कार्यालयात उपस्थित कर्मचारी पी.एस.राऊत व एस.के.गायकवाड यांना मारहाण केली. तसेच अर्वाच्य भाषेत शिव्या देत जीवे मारण्याची धमकी दिली.
ramnagar police station chandrapur साठी इमेज परिणाम
या घटनेनंतर रविवारी रात्री रामनगर पोलीस स्टेशन येथे चांगलीच गर्दी जमली होती.सध्या उन्हाळा असल्याने इलेक्ट्रिसिटी कंझमशन जास्त होते,अशा परिस्थितीत सुरू विद्युत प्रवाहावर लोड येतो व वीज खंडित होते,तर कधी पावसाळ्यात वादळ वाऱ्याने वीज खंडित होते,मात्र चंद्रपूरचा उकाळा बघता सध्या शहरात विजेचा वारंवार लपंडाव सुरू आहे.त्यामुळे वीज खंडित झाल्याबरोबर लोकांची चिडचिड होते,व त्याचे मारहाणीत रुपांतर होते.

या मारहाणी नंतर रामनगर पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या विरोधात भा.द.वि. च्या 353, 332, 504,505 अंतर्गत गुन्हा अखेर दाखल करण्यात आला आहे. अशा घटनेमुळं महावितरण कर्मचाऱ्यांचे मानसिक मनोबल कमी होते. अशावेळेस मारहाण करणाऱ्या व्यक्तीस कठोर शिक्षा होणे आवश्यक असते.कर्तव्य पर्यंत पडतांना त्यांना असामाजिक तत्त्वांना सामोरे जावे लागते .त्यामुळे अशा मारहाणीच्या तसेच सरकारी कामात अडथळा आणण्याच्या घटनात दोषींवर कठोर कारवाई अपेक्षित आहे, या मारहाणीच्या घटनेचा तपास सुरू असल्याकारणाने वृत्त लिहिस्तोवर कोणालाही अटक करण्यात आलेली नव्हती.
महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी शहरातील अनेक डीपीचे मेंटेनन्स केले,मात्र याची माहिती कोणत्याही रजिस्टर मध्ये नोंद नसल्याने कोणत्या डीपीचे मेंटेनंस केले आहे. त्याची माहिती अन्य कर्मचाऱ्यांना मिळत नाही. त्यामुळे नेमका कोणत्या ठिकाणाहून लाईन गेली व कोणत्या डीपीचे मेंटेनन्स झाले किंवा नाही झाले याची नोंद नसल्याने आणखी महावितरण यांच्या कर्मचाऱ्यांची मगजमारी वाढलेली आहे.
रविवारी रात्री तुकुम परिसरातील काही भागात लाईन नसल्याने महावितरणच्या कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली होती व मेंटेनन्स नसलेल्या डीपीची तात्काळ दुरुस्त करून लाईट पूर्ववत करण्यात आली होती, मात्र या डीपीचे मेंटेनन्स झालेले आहे किंवा नाही याची माहितीच नव्हती.
शासकीय कामकाजात अडथळा आणणार्‍यांना कडक कारवाईला सामोरे जावे लागावे म्हणून राज्य सरकारने भा.द.वि. कलम 332 आणि 353 मधील तरतुदी अधिक कठोर केल्या आहेत. कर्मचारी आपली कर्तव्ये पार पाडत असताना त्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. प्रसंगी मारहाणही होते. अशा घटना घडू नयेत, यासाठी भारतीय दंडविधान कलम 332 आणि 353अन्वये त्यांना संरक्षण देण्यात आले आहे.
सर्व प्रकारचे पोल्ट्रीफीड उपलब्ध




SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.