Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, जून २६, २०१९

काटोल विभागात कृषी पंपाच्या वीज जोडणीचे कामे प्रगतीपथावर

नागपूर/प्रतिनिधी:

काटोल विभागात शेतकऱ्यांना कृषी पंपाची जोडणी लवकर मिळावी यासाठी महावितरणकडून पुढाकार घेण्यात आला असून आतापर्यंत येथील २६७ शेतकऱ्यांना शेती पंपासाठी उच्चदाब वीज वितरण प्रणाली मार्फत वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत.

महावितरणच्या काटोल विभागात कळमेश्वर, काटोल, नरखेड या तालुक्यांचा समावेश होतो. येथे शेती पंपासाठी ९४२ शेतकऱ्यांनी महावितरणकडे अर्ज केले होते. कंत्रादारामार्फत वीज जोडणीचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. यासाठी कार्यादेश जारी  करण्यात आले आहेत. 

नरखेड उपविभागात७९ काटोल उपविभागात ३३, जलालखेडा उपविभागात६३, कोंढाळी  उपविभागात ५२, सावरगाव उपविभागात ४० शेतकऱ्यांना आतापर्यंत शेतीपंपासाठी वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांना दर्जेदार आणि खात्रीशीर वीज पुरवठा मिळावा यासाठी २७६ नवीन रोहित्रांची उभारणी या भागात करण्यात आली आहे. 

उर्वरित शेतीपंपांना या वर्ष अखेरपर्यंत जोडणी देण्याचे नियोजन महावितरणकडून करण्यात आले आहे

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.