Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, मे १५, २०१९

रस्त्यावरील बांधकाम धुळीमुळे अपघातात वाढ

छावा संग्राम संघटनेतर्फे रस्त्यांवरील विविध समस्यांबाबत अडयाळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन

भंडारा /प्रतिनिधी

नॅशनल हायवे भंडारा - अडयाळ - पवनी दरम्यान सुरू असलेल्या रोडच्या बांधकामा दरम्यान उडत असलेली धुळीमुळे अपघात मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. व यावर संबोधित ठेकेदारांकडून नजरअंदाज केली जात आहे.

अश्या अनदेखा कामामुळे भविष्यात या रस्त्यावर अपघात झाल्यास संबंधित कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात यावे रोडवर वेळोवेळी टॅंकर ने पाणी मारण्यात यावे कामासंबंधी रस्त्यांवर खोल खड्डे केले आहेत त्या ठिकाणी सुरक्षारक्षक नेमावेत या बाबात आज अडयाळ पोलीस स्टेशन मधील पोलीस निरीक्षक श्री ढोबळे सर यांना निवेदन देण्यात आले. 

यावेळी डोबळे सरांनी लगेच कंपनीतील वरिष्ठ कर्मचारी यांना बोलावून निवेदनाद्वारे कळविण्यात आलेले मुद्दांबद्दल सांगुन कंपनीला व कर्मचारींना नोटीस बजावली.

भविष्यात जर एखादी घटना घडल्यास गुन्हा दाखल करुन आरोपी बनविण्यात येणार असे बजावून सांगितले व 149 कलम अंतर्गत नोटीस बजावली.

यावेळी छावा संग्राम चे अध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य सुभाष आजबले, बाळु ठवकर, शिवा गायधने, मुनीर शेख, विनोद गायधने, राहुल खोब्रागडे, विनोद गंधे, चिंतामन वाघमारे, विक्की पचारे व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.