चंद्रपूर/प्रतिनिधी:
जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे.या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी जिल्ह्यातील काही दारूतस्कांसह १३ सराईत गुंडांवर पोलीस प्रशासनाने तडीपारीची कारवाई केली.
सराईत गुंड व दारू तस्करतस्करांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. परंतु त्यांच्या कारवाया थांबल्या नाही. परिणामी, मुंबई पोलीस कायद्यान्यये तडिपारीचा आदेश देण्यात आला आहे. तडिपार केलेल्या आरोपींमध्ये वरोरा, घुग्घुस, भद्रावती,चंद्रपूर शहर, सिंदेवाही येथील दारूतस्कर व गुंडाचा समावेश आहे.
दारूबंदीनंतर जिल्ह्यात अनेक दारू तस्कर सक्रिय झाले आहेत.तस्करांवर दहापेक्षा अनेक गुन्हे दाखल विविध ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांकडून वारंवार कारवाई होत असतानाही दारू तस्करांकडून तस्करी थांबली नाही. काही गुंडां कडून निवडणूक कालावधीत शांतता आणि सुरक्षेला धोका होण्याचा संशय आला.त्यामुळे पोलीस अधीक्षकांनीआरोपींवर तडीपारीची कारवाई केलीआहे.
ठाणेनिहाय आरोपी
वरोरा पोलीस ठाणे: मर्नोहर रायण दाईकर, यात्रा वटे वरीस, साजिदअजीज शेख कॉलरी वॉर्ड वरोरा, राजुरा उर्फ शंकर वाटमोडे रा. नागरी, शेख इब्राहिम शेख आजाम रा. टेपुर्डा सुभाश कालू पवार यात्रा वॉर्ड वरोरा,
घुग्गुस ठाणे : सलीम नर्ईमुदीन खान रा. अमराई वॉर्ड चंद्रपूर
चंद्रपूर शहर पोलीस ठाणे: भारती उर्फ मुस्कान सुरेश खेर रा. भिवापूर
भिवापूर ठाणे: जगदिश आनंदराव रापटेके रा. मालेवाडा
पोलीस ठाणे भद्रावती: सुधीर बंडू दोहतरे रा. चंदखनेडा, प्रवीण मंगल कटारे,शिवाजीनगर भद्रावती
पोलीस ठाणे सिंदेवाही: माणिक वासुदेव गेडाम रा. आंबेडकर वार्ड, धर्मेद्र देवाजी मेश्राम रा. नवरगाव सिंदेवाही