Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, एप्रिल १९, २०१९

वर्ध्यात गुरांच्या गोठयाला भीषण आग;६ जनावरांचा आगीत होरपडून मृत्यू

उमेश तिवारी/कारंजा (घाडगे):

कारंजा तालुक्यातील पार्डी गावात शुक्रवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास गुरांच्या गोठयाला भीषण आग लागली. या घटनेत ६ जनावरांचा मृत्यू झाला तर ८ जनावरे गंभीर जखमी झालीत.या लागलेल्या आगीत  मुकुंदराव चाफले यांचे ३ जनावर,दिनबाजी सय्याम यांची २ जनावरांचा या आगीत होरपडून मृत्यू झाला,  


तर दोघांचेही ८ जनावरे या आगीत भाजले गेले.याच सोबत नामदेव कोडापे यांचे पेरनियंत्र,कुटार व  बंडी आगीत जळुन खाक झाली, तर किसना मर्सकोल्हे, शिवराम भलावी, महादेव कुंभारे, यांची शेती उपयोगी साहित्य आगीत खाक झाले. 

                        
हि आग दुपारी २ वाजता च्या दरम्यान लागल्याची गावकऱ्यांनी सांगितले,,जवळ अग्निशमन दल नसल्याने लोकांनीच आग विझवण्यास सुरवात केली.अडीच तासाने ४.३० वाजता आर्वी आणि आष्टीचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि आग पूर्णपणे विझवण्यात आली. घटनास्थळी तळेगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार व तलाठी यांनी भेट दिली व पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या मार्फत जखमी जनावरांवर उपचार करण्यात आले.या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पोल्ट्री फीड 


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.