चंद्रपूर शहरातील बालाजी वॉर्ड भागात शनिवारी सकाळच्या सुमारास अस्वल दिसल्याने एकच खळबळ उडाली. शहरातील बालाजी वॉर्ड परिसर हा दाट लोकवस्तीचा परिसर असून याच भागातील एका घरानजीक अस्वल लपून बसल्याचे दिसताच गावभर बोंब झाली. NGO व वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले त्यांनी अस्वलाला भूलीचे इंजेक्शन देऊन पकडण्यात आले.चंद्रपूर शहराला लागून जंगल आहे. पाणी, भक्ष्य किंवा अन्य कारणामुळे वन्यप्राणी अनेकदा शहरात येतात.सध्या उन्हाळा सुरु झाला असून शहरात उन तापू लागले आहे.त्यामुळे शहरानजीकच्या वस्तीत जंगली प्राणी भटकू लागतात,अशीच भटकत भटकत हि अस्वल देखील या परिसरात आली अस्वली असा अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांसह इको-प्रो आणि हॅबीटॅट कॉन्सरवेशन सोसायटीचे सदस्य तसेच काही स्थानिक नागरिक या ठीकानी उपस्थित झाले.या अस्वलीला बघण्यासाठी परिसरात चांगलीच गर्दी जमली होती.अथक परिश्रमानंतर दहशद निर्माण करणाऱ्या अस्वलाला बेशुद्ध करून पकडण्यात वनविभाग व NGO ला यश आल्याने स्थानिकांचा जीव भांड्यात पडला.
महेश महाशयाने लावली जिवाची बाजी
सावधानीसाठी दंगा नियंत्रण पथकाला पाचारण करण्यात आले.मात्र या चवताळलेल्या अस्वलीला जर का वेळेवर महेशने पकडले नसते तर एखादी अनुचित प्रकार नक्कीच घडला असता असे या विडिओच्या माध्यमातून दिसून येते,महेश हे कुठले शासकीय कर्मचारी नाही मात्र या अस्वलीला पकडण्यासाठी महेशने धाडस दाखविले व आपल्या जीवाची बाजी लावत अस्वलीला दाबून धरले.महेश हे शहरात युवामित्र फाउंडेशन चालवतात व विविध सामाजिक कार्यक्रम करीत असतात,या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होताच महेशचे सर्वत्र कौतुक होऊ लागले,सोशल मीडियावर महेशवर अभिनंदनाचा वर्षाव होऊ लागला.
मानव-वन्यजीव संघर्षांचा इतिहास शेकडो वर्षांचा आहे. ज्या भागात जास्त जंगल आहे त्या भागात प्राण्यांची संख्या वाढली पण अधिवासाचे क्षेत्र कमी झाले. त्याचा परिणाम प्राणी जंगलाबाहेर पडण्यात झाला आणि या संघर्षांत वाढ झाली.त्याला कारण मानवाचा वन्यप्राण्यांच्या अधिवासात प्रवेश, बेसुमार वृक्षतोड, त्यातून घटत गेलेले जंगलाचे प्रमाण आणि वेगाने विस्तारत असलेले नागरी जीवन. यामुळे हा संघर्ष सध्या वन्यप्रान्यांना जितका घातक होत आहे तितकाच माणसाच्या जीवाला देखील धोका निर्माण होऊ लागला आहे.