Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, मार्च १३, २०१९

वाडीतील डॉ. आंबेडकर नगरात दुषित पाण्यामुळे तिसरा मृत्यू


वाडी (नागपूर ) / अरूण कराळेयेथील डॉ . आंबेडकर नगरमधील कावीळच्या आजाराने दोघांचा मृत्यू झाला असुन मंगळवार १२ मार्च रोजी अजून एका महिलेचा कावीळच्या आजाराने मृत्यू झाला आहे . कावीळ मुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या तीन झाली आहे . त्यामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे . कल्पना राऊत वय ३० रा . डॉ .आंबेडकर नगर असे कावीळच्या आजाराने मृत्यू पावलेल्या महीलेचे नाव असून कल्पना दोन वर्षापासून माहेरी होती.तिला कावीळ झाला होता . कावीळच्या अनेक प्रकारचे औषधी ग्रहण केल्याने कल्पनाच्या किडनीवर परीणाम झाला व ती मृत्युमुखी पडली . दुषीत पाणी पुरवठा केल्यामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून याला वाडी नगर परिषदचे प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष संतोष नरवाडे यांनी केले . संतोष नरवाडे हे सुद्धा डॉ .आंबेडकर नगर मध्येच राहत असून माझ्या घरी सुध्दा दुषित पाणी येत असल्याची माहीती तभाशी बोलतांना दिली मंगळवार १२ मार्च रोजी वाडीतील दूषित पाण्याने घेतला महेशचा बळी ही बातमी तरूण भारत मध्ये प्रकाशित होताच नगर परिषद विभाग खडबळून जागा झाला. नगराध्यक्ष प्रेम झाडे यांनी सुध्दा डॉ . आंबेडकर नगर मधील तीन्ही मृतांच्या नातेवाइकांच्या घरी भेट दिली . दुषित पाण्याची माहिती जाणून घेतली .यानंतर पाण्यात ब्लीचिंग पावडर टाकल्या नंतर पाणी पुरवठा करण्यात येईल अशी माहीती नगराध्यक्ष प्रेम झाडे यांनी दिली.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.