चंद्रपूर - मागील दोन वर्षात 13 बळी घेणाऱ्या हल्लेखोर वाघिणीला जेरबंद करण्यासाठी पांढरकवडा येथे वनविभागाची चमू दाखल झाली आहे. शिकारीचे गुन्हे दाखल असलेल्या नवाब शूटरऐवजी वाघिणीला नागरिकांच्या हितासाठी बेशुद्ध करून पकडण्याच्या मागणीवर चंद्रपूर येथील इको प्रो संस्थेसह विविध स्वयंसेवी संस्थांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन चर्चा केली.
मागील दोन वर्षात 13 बळी घेणाऱ्या या वाघिणीला करण्याचे आदेश वन विभागाने दिले होते. त्या आदेशाविरुद्ध उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्यानंतर न्यायालयाने हल्लेखोर वाघीण धोकादायक असल्याने तिला योग्य असल्याचा निर्वाळा दिला होता. त्याविरुद्ध काही संस्थांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयानेही या प्रकरणात ठार करण्याचे आदेश दिले. त्यामुळे संघटना रस्त्यावर उतरलेल्या आहेत. दोन दिवसापूर्वीच नागपूर येथील काही संघटनांनी संविधान चौकात चेहऱ्यावर वाघाचे रेखाटने करून निदर्शने केली.
यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथील वाघीण प्रकरणात मोठा गदारोळ झाल्यानंतर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या प्रकरणात लक्ष घातले आहे. वनविभागाचे अख्ख्ये मुख्यालय पांढरकवडा येथे दाखल झाले असून, त्यांच्या आदेशानुसार वाघिणीला जेरबंद करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करण्यात येणार आहे.
केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री मनेका गांधी यांचा हस्तक्षेप झाल्यावर हैदराबादचा शूटर नवाब अली खान व मध्य प्रदेशातून आली टिम परत गेल्याने सुरू असलेल्या या मोहिमेविषयी संभ्रम निर्माण झाला होता. प्रधान मुख्य वनसंरक्षक मिश्रा यांनी वन्यजीव विभागाचे अपर मुख्य संरक्षक सुनील लिमये सोबत पांढरकवडा येथे दौरा केला आहे.
Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads
रविवार, सप्टेंबर २३, २०१८
Author: खबरबात
खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.
या बातम्यादेखील नक्की वाचा
जिल्ह्यात नव्याने 110 पॉझिटीव्ह; आणखी दोघांचा मृत्यू यवतमाळ दोघांचा मृत्यू; 31 जणांना सुट्टी
सावली तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मुख्याध्यापक संघाचा उपक्रमनिफद्रा (रविंद्र कुडकाव
अत्याधुनिक शस्त्रे कोणी पुरविली? ट्रायबल फोरम ने प्रश्न केला उपस्थित Tribal Forum मणिपूर राज्यातील 'त्या' नराधमांना फासावर लटकवा!ट्
किल्ला स्वच्छता अभियान पाहण्यासाठी पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांना निमंत्रण चंद्रपूर/प्रतिनिधी:राज्यातील गड-किल्ले स्वच्छता स
वर्धा नदीत दोघी चुलत बहिणींनी घेतली उङी; एकीचा मृत्यू, एक बचावली घुग्घूस : धरणाचे पाणी सोडल्याने वर्धा नदीच्या प
वणीतील पायाभूत सोयीसुविधेकरिता २१ कोटी | वणी तालुक्यातील पायाभूत सोयीसुविधेकरिता निधी कमी
- Blog Comments
- Facebook Comments