Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, सप्टेंबर १९, २०१८

चंद्रपूर जिल्हयातील सात गावांचा डॉ.शामप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेमध्ये समावेश

चंद्रपूर/प्रतिनिधी:

वनावरील अंवलबीत्व कमी करण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या डॉ.शामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेअंतर्गत चंद्रपूर जिल्हयातील सात गावांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये विचोडा, छोटा नागपूर, आंबोरा, चारगांव, पडोली, ताडाळी, मोरवा आदी गावांचा समावेश आहे.
वना लगतच्या गावामध्ये तेथील जन, जल, जंगल, जमिन या संसाधनाचा शाश्वत विकास साधून उत्पादकता वाढविणे. गावक-यांची वनावरील निर्भरता कमी करणे, शेतीला जोड धंदे निर्माण करणे, पर्याय रोजगार उपलब्ध करुन देणे या माध्यमातून मानव व प्राणी संघर्ष कमी करणे, यासाठी राज्य शासनाने डॉ.शामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजना सुरु केली आहे. चंद्रपूर तालुक्यात अनेक गावांमध्ये वाघ व अन्य हिस्त्र वन्य प्राणी यांचा वावर वाढल्यामुळे शेतीतल्या कामावर विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळे या गावांचे वनावरील अंवलबींत्व कमी करणे आवश्यक आहे. त्यासाठी या गावांचा डॉ.शामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेअंतर्गत समावेश करण्यात आला आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.