Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, एप्रिल २३, २०१८

कार्यक्रमातील जेवणातून शेकडो लोकांना विषबाधा

चंद्रपूर/प्रतिनिधी:
राजुरा तालुक्यातील चिंचोली येथील एका देवादेवीच्या समारंभातील जेवणातून जवळपास १०० लोकांना विषबाधा झाल्याचे उघडकीस आले आहे.
तालुक्यातील चिंचोली येथील सुधाकर चौधरी यांचे घरी रविवारी रात्री देवादेवीचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमासाठी गावातील नागरिक तसेच अन्य नातेवाईक देखील उपस्थित होते,या कार्यक्रमात नागरिकांनी भोजनाचा आस्वाद घेतला मात्र अवघ्या काही वेळातच त्यांच्या प्रकृतीत बिघाड होत डोकं दुखी व पोट दुखी सुरु झाली,अश्या पद्धतीचा त्रास हा संपूर्ण जेवणाऱ्या मंडळींना झाल्याने अशे शेकडो लोक वेगवेगड्या ठिकाणी डोके-पोट धरून बसले होते,त्या नंतर अनेकांना उलट्या देखील झाल्या हा संपूर्ण प्रकार लक्षात येताच तत्काळ काही लोकांनी स्थानिक आरोग्यकेंद्रात भरती करण्यात आले. मात्र रुग्णांची संख्या वाढतच जात असल्याने इतर रुग्णांना राजुरा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले,मात्र हा संपूर्ण प्रकार कशामुळे घडला याचा शोध घेणे सुरु आहे .या सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉ.कुलमेथे यांनी सांगितले.




SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.