Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, डिसेंबर ०१, २०१७

सिकलसेल रोगाने तरुणाचा मृत्यू


देसाईगंज / प्रतिनिधी - येथिल राजेंद्गवार्डातील सागर व्यंकटराव  भांडारकर वय ३५ वर्ष यांचे सिकलसेल  या आनुवांषिक तथा कधीही बरा न होणार्या धुरंधर आजाराने रात्री निधन झाले आहे.

 अतिदुर्गम,आदीवासीबहूल गडचिरोली जिल्ह्यात एकुण लोकसंख्येच्या १७ टक्के रुग्ण सिकलसेल या आनुवांषिक तथा कधीही बरा न होणार्या धुरंधर आजाराने ग्रासले असल्याचा अनुमान गडचिरोली जिल्ह्यात कार्यरत स्वंयसेवी संस्था सर्च ,बि.जे.मेडीकल कॉलेज  पुणे,व इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज यांनी संयुक्तपणे गडचिरोली जिल्ह्याील आजाराबाबत सन १९८८ -८९ ला संशोधन करून धक्कादायक अहवाल दिला होता .

आता सिकलसेल या आनुवांषिक आजाराला राष्ट्रीय कार्यक्रमात समावेश करण्यात आले असुन राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात करोडो रुपये खर्च केल्या जात आहे.मात्र अद्याप गडचिरोली या अतिदुर्गम व आदीवालीबहुल जिल्ह्यात सिकलसेल या आनुवांषिक तथा कधीही बरा न होणार्या धुरंधर आजाराने किती रुग्ण ग्रासले आहेत ही आकडेवारी गुलदस्त्यातच आहे *****


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.