Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, डिसेंबर ०५, २०१७

बाबासाहेबांच्या चळवळीचे वारस कोण..?

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त लेख...


     आज ६ डिसेंबर,विश्वरत्न भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच महापरिनिर्वाण दिन,त्यांनी ६ डिसेंबर १९५६ ला वयाच्या ६५ व्या वर्षी आपला अखेरचा स्वास घेऊन समस्थ भारतवासींना पोरकं करून गेले,त्यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्ताने त्यांच्या नावाने मिरवणारे अनुयायी त्यांच्या विचारणाचे पालन करून,चळवळ चा वारस होत आहेत का, का बाबासाहेब आंबेडकरांनी उभारलेली चळवळ मंद पडली? असा प्रश्न माझ्या सारख्या सामन्य कार्यकर्त्यांना पडणे साहजिकच आहे.
     भारताच्या घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जातिभेदाच्या दाहकतेचे चटके सहन करून जातिनिर्मूलनासाठी लढा दिला. मात्र, अजूनही मनातून जात जात नाही हे प्रत्ययाला येत आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते, ‘परिवर्तनाची प्रक्रिया गतीमान होण्यासाठी समाजमनात परिवर्तनवादी विचार रूजणे आवश्यक आहे’ हे डॉ. बाबासाहेबांचे मौलिक विचार प्रत्येक कार्यकर्त्यांनी आत्मसाथ केले पाहिजे,समाज परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल करत असलेल्या थोतांड गप्पा आजचे राजकीय पुढारी करतांना दिसतात,मात्र परिवर्तन म्हणजे काय.?हा प्रश्न या पुढाऱ्यांना विचारल्यास दोनाचे चार होतात,म्हणजे समाजाला दिशाभूल करून,बाबासाहेब आबेडकरांनी उभारलेली राज्यघटनेच्या बळावर तुम्ही नेते लोक आम्हा सामान्य जनतेस अजूनही गुलामीत ठेवण्याचं षडयंत्र रचता हे पाहून मला वाटते बाबासाहेब तुमचा अनुयायी अत्ता चळवळीचा वारस राहिला नाही ,तुम्ही दिलेल्या शिका संघटित व्हा! आणि संघर्ष करा! असा मोलाचा संदेश. मात्र या संदेशाचे पालन न करता आजही स्वत:ला आंबेडकरी अनुयायी म्हणून मिरवत असतात. त्यामुळे समाजामध्ये राडा करून पुढे काय करणार? असा माझ्यासारख्या अनेक सर्वसाधारण आंबेडकरी कार्यकर्त्यांमध्ये ‘आंबेडकरी चळवळ कुठे निघाली?’ हा प्रश्न निर्माण झाला आहे.
     आम्ही शिक्षण घेतलोत,कुठलाही कुटुंब अशिक्षित च्या दारात राहिले नाहीत,सर्व सामान्य जनता देखील शिक्षणाचा घोट घेत आहेत,समाजासाठी एकवटत आहेत, मात्र संघटित होतांना एक अहंकार आमच्या मनामनात भरलेला दिसतोय म्हणून संघटित होतो खरे,पण संघर्षच्या नावाने बोबाबोंब आहे,आम्हाला चळवळीचा वारस नाही तर त्या चळवळीचा पुढारी होण्याचे स्वप्न आम्ही उरावर्ती बाळगत आहोत,म्हणूनच आज कित्येक समाज अन्याय अत्याचारांना सामना करतानाचे चित्र दिसत आहेत,आमच्या समाजावर अन्याय होतोय, मग समाजातला एखादा पुढारी समोर होतो आणि एखाद संघटन स्थापित करतो,संघटनेत अध्यक्ष,उपाध्यक्ष, सचिव सदस्य सारख्या पदभरती होते आणि संघर्षाला सुरवात केल्यास कालांतराने आमच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांना पदाची लालूच लागते अन तो दुसरा संघटन स्थापित करून,त्यांच्या पदाचा राजा होतो आणि करतो संघर्ष,केवळ स्वार्थासाठी हा क्रम आज देश्यातल्या प्रत्येक समाजात चालू आहे, बाबासाहेबांनी संघटित व्हा म्हटलेत,असे स्वतंत्र संघटित व्हा असे नाही,अश्याने समाजाचे प्रश्न सुटत नसून उलट वाढत चालले आहेत,शिक्षण घेतलोत आकडेवारीची ओळख व्हावी म्हणून..?,संघर्ष करतोय,स्वार्थ निर्माण करून या देशातल्या नागरिकांना लुबाडण्यासाठी,ही कसली मनोवृत्ती नेता होतो समाज हिताच्या गोष्टी फक्त भाषणा पुरतेच,जात धर्म वंश अश्या बुरसटलेल्या विचारांनी एखादा नेता जर आम्हला समाज कार्य शिकवीत असतील तर ते देश्याच्या सविधानाचे पाईक नाहीत, बाबासाहेब तुमच्या अनुयायांकडे आज ना तुमच्या विचारांचा घर आहे न तुमच्या अस्तिवाची त्यांना जाणीव..
   बाबासाहेबांच्या जिवनातील एक प्रसंग,बाबासाहेब शांतपणे एक कोपऱ्यात बसून समाजाच्या पुढील भवितव्याचा चिंतन करत होता,तेव्हा त्यांच्या डोळ्यात पाणी पाहून एका अनुयायांनी त्यांना विचार बाबासाहेब आम्ही काय पाहत आहोत,तुमच्या डोळ्यात पाणी?,तेव्हा बाबासाहेब उत्तर देत म्हटले, "गड्या मी दूर दूर पाहत आहे माझ्या चळवळीचा वारस मला कोणी दिसत नाही,हे सर्व उभारलेली चळवळ अत्ता माझ्या नंतर नामशेष होणार का? ही भीती वाटत आहे," हे त्यांचे शब्द आहेत,हे नानक चंद रत्तू यांनी हे शब्दबद्ध केलेत,ह्यावरुन बाबासाहेबांची दूरदृष्टीची जाणीव होते,बाबासाहेब गेले याचा अर्थ त्यांची चळवळ संपली असे नाही,त्यानी उभारलेली अस्पर्शता, जाती भेद,धर्म भेद अश्या बुसरलेल्या विचारावरील चळवळ आज मंद पडली आणि अश्या विचारांचा जागर आज या देश्यात झपाट्याने वाढत चालली आहे, अनेक ठिकाणी जातीय दंगली होतांना दिसत आहेत,अनेक ठिकाणी धर्म द्वेष,प्रांत द्वेष या माध्यमातून हा मानव एकमेकांना संपवित निघाला आहे,आजही ते अस्पर्शता संपली नाही,आजही वर्णव्यवस्था आहे, या वर कुठे तरी आपण चिंतन केले पाहिजे,आणि समस्थ समाजांनी बाबासाहेबांच्या चळवळीचा पाईक होऊन अन्यायावर लढा उभारला पाहिजे तरच खऱ्या अर्थाने भारतरत्न विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवान ठरेल.
 
लेखक :- श्रीपाद नागनाथ राऊतवाड
             मो.८००७८७००२६
             नांदेड.
 

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.