Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

समीती लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
समीती लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, मार्च १८, २०१८

रामटेक बाजार समीतीचे मुख्यप्रशासक कोल्हेंची नियुक्ती रद्द करा

रामटेक बाजार समीतीचे मुख्यप्रशासक कोल्हेंची नियुक्ती रद्द करा

युवक कॉंग्रेसने केली घोषणाबाजी,पालकमंत्र्यांचा पुतळा जाळला 
रामटेक तालुका प्रतिनिधी-
नियमबाहय नियुक्ती रद्द झालीच पाहीजे,नही चलेगी....नही चलेगी तानाषाही नही चलेगी,पालकमंत्री मुर्दाबादच्या घोषणा देत रामटेक विधानसभा युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रामटेकच्या कृषी उत्पन्न बाजार समीती कार्यालयाच्या आवारासमोर दिनांक 18 मार्च 2018 रोजी दुपारी 1 वाजताच्या सुमारास सुमारे अर्धा तास प्रचंड घोषणाबाजी केली.यानंतर युकॉंचे जिल्हा महासचिव सचिन किरपान यांच्या नेतृत्वात पालकमंत्री यांच्या पुतळयाचे दहन करण्यात आले.   
         याप्रकरणी सविस्तर वृत्त असे की, रामटेक कृषी उत्पन्न बाजार समीतीचे मुख्यप्रशासक अनिल लक्ष्मणजी कोल्हे हे व्यवसायाने शिक्षक आहेत मात्र त्यांनी आपण शिक्षक असल्याची माहीती शासनाला सादर केलेल्या शपथपत्रातून लपविली व त्यामुळे त्यांची नियुक्ती मुख्यप्रशासक या पदावर करण्यांत आली.त्यांनी आपला धंदा शेती असल्याची अर्धसत्य माहीती देवून हे पद लाटले या प्रकरणाची चौकशी नागपुरचे जिल्हा उपनिबंधक यांचे आदेशानुसार रामटेकच्या सहायक निबंधक भारती काटुळे यांनी चौकशी केली व तसा अहवाल जिल्हाउपनिबंधक नागपुर यांना पाठविण्यांत आला मात्र कारवाई झाली नाही.एका संघटनेने यासाठी दोन दिवस आमरण उपोशनेही केले मात्र पारदर्षक कारभार असल्याचा दावा करनाऱ्या या राज्य सरकारने कोल्हे यांना हटविले नाही याप्रकरणी स्थानीक आमदार व पालकमंत्री कोल्हे यांना अभय देत असल्याचा आरोप किरपान यांनी यावेळी पत्रकारांशी बोलतांना केला.आम्ही पालकमंत्री यांना भेटण्यासाठी आलो होतो मात्र ते येणार नसल्याचे कळलेकदाचित आम्ही आंदोलन करणार हे कळल्याने ते आले नसावेत त्यामुळे आम्ही याठीकाणी त्यांच्या पुतळयाचे प्रतिकात्मक दहन करून निदर्षने केल्याचे किरपान यांनी यावेळी सांगीतले.
 रामटेक तालुका कृषी उत्पन्न बाजार समीतीवर निवडणूक न घेता वारंवार प्रशासक मंडळ लादण्याचाही त्यांनी यावेळी निषेध केला.विद्यमान परीस्थितीत या भागातील शेतकरी अतिशय अडचणीत आहेत.त्यांना या सरकारने मदतीचा हात दिला पाहीजे मात्र हे सरकार शेतकऱ्यांना  न्याय देवू शकले नसल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.यावेळी सवश्री देवेंद्र डोंगरे,मनोज नौकरकर,चेतन ईखार,स्वप्नील श्रावणकर व संदीप ईनवाते यांचेसह रामटेक विधानसभा क्षेत्रांतील युवक कॉगेंसचे कार्यकर्ते हजर होते.