Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

समाज लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
समाज लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, फेब्रुवारी १७, २०१८

 आदिम समाजाचा आक्रोश मोर्चा धडकला जिल्हाधिकारी कार्यालयावर

आदिम समाजाचा आक्रोश मोर्चा धडकला जिल्हाधिकारी कार्यालयावर

चंद्रपूर/प्रतिनिधी:
विविध प्रलंबित मागण्यांना घेऊन शनिवारी आदिम समाजाचा मोर्चा चंद्रपूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर धड़कला. राष्ट्रीय आदिम कृति समिति द्वारा मध्य नागपुरचे आमदार विकास कुंभारे यांच्या नेतृत्वात दुपारी दोन वाजताच्या सुमारास गिरनार चौकातुन निघालेला हा मोर्चा शासनाविरोधी नारेबाजी करत शहराच्या मुख्य मार्गाने होत जिल्हाधिकारी कार्यालवर जाऊन धड़कला.  

  शासन नियम व वेळोवेळी उच्च व सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार महाराष्ट्र परिपत्रकानुसार कोष्टी हा व्यवसाय आहे. त्यामुळे कोष्टी या नावाखाली हलबा हलबीचे वैधता प्रमाणपत्र न नकारता ते देण्यात यावे,  गोवरी,हलबा,माना, व इतर अन्याग्रस्त जमतींना सुलभतेने प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र देण्यात यावे,  सर्वोच्च न्यायालयाच्या 6 जुलै 2017 च्या निर्णयाविरोधात वेगवेगळ्या ठिकाणी पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आल्या आहे. त्यामुळे या निर्णयाचा आधार घेऊन कोणत्याही कर्मच्याऱ्यावर कार्यवाही करण्यात येऊ नये या मागण्यांसह ईतर मागण्यांच्या पुर्ततेसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता.  या दरम्यान मोर्च्यात दाखल झालेल्या सहभाग्यानी  महानगर पालिका समोरिल महात्मा गांधी यांच्या पूतळयाला  पुष्पमार्लपन करून अभिवादन केले. हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचाच शिष्ट मंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले आहे.या मोर्च्यात हजारो समाज बांधव व भगिनी सहभागी झाल्या होत्या.

मंगळवार, नोव्हेंबर २१, २०१७

धनगर समाजाचा हिवाळी अधिवेशनावर हल्लाबोल मोर्चा

धनगर समाजाचा हिवाळी अधिवेशनावर हल्लाबोल मोर्चा

वरोरा/ भद्रावती (प्रतिनिधी) :  मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनी निवडणु कीपूर्वी व निवडणूकी नंतर महाराष्ट्रात भाजपची सत्ता आल्यानंतर धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षनाची अमलबजावणी करण्याचे ठोस आश्वासन देऊनही त्यांची अजूनपर्यंत पूर्तता केली नाही. याउलट TISS ( टाटा इन्स्टिट्यूट ऑफ  सोशल सायन्सेस)  या संस्थेकडून सर्व्हेक्षण करून अहवाल मागविला आहे. त्याची गरज नसून समाजाचा विरोध आहे.  धनगर समाज राज्यातील अनुसूचित जमातीचे यादीत ३६ क्रमांकावर असून देखील धनगर समाजास सवलती पासून वंचित ठेवण्याचे महाराष्ट्र सरकारचे हे कटकारस्थान आहे . असे  नागपूर चेधनगर समाज जिल्हाध्यक्ष रमेश पाटील चंद्रपूर जिल्याच्या दवऱ्या दरम्यान वरोरा - भद्रावती बैठकीत बोलत होते.  करिता महाराष्ट्र राज्यातील धनगर समाजाचा एसटी आरक्षण अमलबजावणी समूहिक नेतृत्वात हल्लाबोल मोर्चाचे  आयोजन दि. ११ डिसेंबर२०१७ ला ११ वाजता हिवाळी अधिवेशनावर धडकणार आहे.  मोर्चा यशवंत स्टेडियम, नागपूर येथून निघणार असून या मोर्चा ला जिल्यातून जास्तीत जास्त धनगर समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन  माजी आमदार हरिदास भदे, अध्यक्ष रमेश पाटील, ज्ञानेश्वर घायवड, पुरुषोत्तम घायवड, देवराव ठमके, गुलाबराव चिडे, रमेश उरकुडे, अमित ठमके, पंढरीनाथ बोधे, श्रीहरी घोटकर, पुंजराम तुरके. यांनी केले.

गुरुवार, नोव्हेंबर १६, २०१७

धनगर समाजाला ST आरक्षण मिळवून देण्यास तटस्थ - शरद पवार

धनगर समाजाला ST आरक्षण मिळवून देण्यास तटस्थ - शरद पवार



चंद्रपूर/ प्रतिनिधी:
निवडणुका आल्या की विविध राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यांचे प्रसिध्दीकरण होते आणि विविध राजकीय पक्ष जनतेपर्यंत पोहचुन जनतेला खूष करणारी आश्‍वासने देण्याची स्पर्धा सुरू करतात. अर्थात आपण सत्तेवर आल्यानंतर काय करू हे सांगण्यात गैर करत नाही. शरद पवारांनी देखील धनगर समाजाला प्रश्न पडेल असा प्रश्न  करत आश्वासनही दिले आहे.भाजपला तुम्ही धनगर समाजाने मत दिले मात्र आश्वासनाव्यतीरीक्त तुम्हाला क़ाय मिळाले?अशी प्रतिक्रिया धनगर समाजाचे निवेदन स्वीकारताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली.

शरद पवार हे दोनदिवसीय चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी विविध पक्षांकडून त्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. सोबतच धनगर समाजानेही समाजावरील अन्याय दूर करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना चंद्रपूर येथील शासकीय विश्रामगृहात भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी त्यांनी धनगर समाजाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अनुसूचित जमातीत आरक्षण मिळवून देण्यास पूर्ण तत्पर आहे व आम्ही तुम्हाला आरक्षण मिळवुन देणार आहोत. असे आश्वासनही धनगर समाजाचा पदाधिकाऱ्यांना दिले.

यावेळी निवेदन व बैठकीस धनगर समाजाचे देवराव ठमके, प्रा. अमित ठमके, शिरीष उगे, दिनेश चामाटे, पी.जे. टोंगे, प्रामुख्याने उपस्थित होते.

मात्र पवारांनी दिलेले हे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आल्यावर पूर्ण करेल काय की हे ही हवेतच विरेल याकडे सर्वांचे लक्ष लागले राहणार आहे.

रविवार, नोव्हेंबर १२, २०१७

राष्ट्रवादी आेबीसी सेलचे जनजागृती अभियान

राष्ट्रवादी आेबीसी सेलचे जनजागृती अभियान

नागपूर/प्रतिनिधी- प्रदेशाध्यक्ष आमदर सुनील तटकरे, विधिमंडळाचे गटनेते अजीत दादा पवार यांच्या सुचनेनुसार राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे यांनी संघटनात्मक समन्वयासाठी व ओबीसी जनजागृती अभियान रथयात्राी तयारी, नियोजनासाठी खालील मान्यवरांची निरीक्षक म्हणून नियुक्ति केली कृपया नोंद घ्यावी • गडचिरोली - श्री वामनराव झाडे - ९४२२१३६६९९ • चंद्रपुर -  श्री सतीश ईटकेलवार - ९९२३०११९९९ • यवतमाळ - श्री हिराचंद बोरकुटे - ९४०५१५४४४३ • वर्धा - श्री उत्तम गुल्हाणे - ९८५०९१३५३३ • गोंदिया - श्री नरेश अरसडे - ९४२२११७२४१ • भंडारा - श्री अविनाश गोतमारे - ९८११३१५७१ • ऩागपुर - श्री ईश्वर बाळबुधे - ९८२२२२५५८१ • अमरावती - श्री गोविन्द भेराणे - ९४२१८३६१२५ • अकोला - श्री मंगेश भटकर - ७७६९८०४६७८ • वाशीम - श्री राजु गुल्हाणे • अहमदनगर - अॅड सचिन औटे - ९९२१९१२७४२ • धुळे - श्री उमेश सोनवने ९८९०९३४९६२

 थंडीत गारठलेल्या बेघर गरजवंतांना भूमिपुत्रांनी दिली मायेची ऊब

थंडीत गारठलेल्या बेघर गरजवंतांना भूमिपुत्रांनी दिली मायेची ऊब

चंद्रपूर / (ललित लांजेवार)
 सध्या सर्वत्र कडाक्याची थंडी आहे. या कडाक्याच्या थंडीत जे बेघर, गरीब आहेत, अशा गरजवंतांना चंद्रपूरच्या "भूमिपुत्र एकता युवा बहुद्देशीय संस्था" यांनी सामाजिक  पुढाकार घेऊन थंडीत गारठणाऱ्या गरजु आणि बेघर लोकांना ब्लैंकेटचे वाटप करून मायेची ऊब दिली आहे.

ज्यांना घर आहे जे आर्थिक दृष्ट्या सधन आहेत, अशे व्यक्ती कडाक्याच्या थंडीत उबदार कपड्याने स्वतः चे संरक्षण करतात, मात्र ज्यांना निवारा नाही. ज्यांना पुरेसे वस्त्र नाहीत, जे रस्त्याच्या कडेला  उघड्यावर जीवन व्यतीत करतात अशांचे काय ? याचा सहानुभूती पूर्वक विचार करीत शहरातील रस्त्याच्या कडेला उघड्यावर थंडीच्या कडाक्यात वास्तव्य करणारे, सरकारी रुग्णालयात उपचारार्थ दाखल रुग्ण, मंदिराच्या परिसरात असणाऱ्या गरिबांन, बसस्थानकात व परिसरात रात्र घालवणारे यांना थंडीत संरक्षण मिळावे, त्यांना मायेची ऊब मिळावी यासाठी" भूमिपुत्र एकता युवा बहुउद्देशीय संस्था" यांच्यामार्फत चंद्रपूर शहराच्या विविध ठिकाणी रात्री थंडीत ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले.
.हल्ली वाढदिवस साजरा करण्याचे मोठ्या प्रमाणावर फॅड आलेले आहे. वाढदिवस कुटुंबात साधेपणाने साजरा केला, तर काहीच हरकत नाही. मात्र, अनेक लोक आपला वाढदिवस हजारो, लाखो रुपये  खर्च करून मोठमोठे बॅनर, कटआऊट लावून, मित्रमंडळी, कार्यकर्त्यांना मोठमोठ्या हॉटेल- धाब्यांवर रंगीत- संगीत भोजन घालून, रात्री बारा वाजता फटाक्‍यांची आतषबाजी करत अगदी वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करताना दिसतात. अपवादाने कोठेतरी रुग्णालयात फळ वाटप, अंध शाळेत खाऊ, साहित्य वाटप केले जाते.

मात्र या भूमिपुत्र बहुउद्देशीय संस्थेच्या  पदाधिकारी सदस्यांचे वाढदिवस हे नेहमी इतरांपेक्षा वेगळे करण्याचे ठरवीतात.वाढदिवस असले की हे लोक केक कापण्यापेक्षा, फिरायला जाण्यापेक्षा, हॉटेलमध्ये पार्टी करण्यापेक्षा, पैसे काढून गरजवंतांना नेहमीच वेगवेगळ्या पद्धतीने मदत करत असतात .अशीच मदत थंडीतल्या दिवसात गरजवंतांना आर्थिक मदत ,भुकेल्यांना अन्न निवारा, हरवलेल्या निवारा, अशा माध्यमातून शनिवारी बस स्थानक परिसरात केली आहे . बसस्थानकात पोचायला एका गरीब महिलेला उशीर झाला त्यामुळे तिच्या गावाकडे जाणारी बस ही निघून गेली होती आता तिला बस स्थानकात रात्र घालवण्या शिवाय पर्याय उरलेला नव्हता. हे बघून भूमिपुत्र संस्थेचे सदस्यांनी तिची विचारपूस केली यानंतर तिच्या खानपानाची व निवाऱ्याची व्यवस्था ही करून देण्यात आली.
अश्या या मानुसकीची जाण ठेऊन सहकार्य करणाऱ्यांनमध्ये  चंद्रपुरचे शेकडो लोक दिवसेंदिवस संस्थेसोबत जोडली जात आहे. या संपूर्ण ब्लँकेट वाटप कार्यक्रमात चंद्रपूरच्या विविध क्षेत्रांतून असलेले नागरिक जोडून आहेत त्यात तनुजा ताई बोढाले , लक्ष्मीकांत धानोरकर , विकास हजारे , विठ्ठल रोडे, रुपेश ठेंगणे, सामाजिक कार्यकर्ते श्री संतोष ताजणे, मनोज गोरे, महेश गुंजेकर, वसंता उमरे , किशोर तुराणकर, गणेश पाचभाई, रोशन आस्वाले, सुरेश वडस्कर, निलेश पौनकर, प्रवीण सोमलकर, नीतेश धानोरकर, अमोल मोरे, राकेश लांडे, विशाल लोहे, विकास हजारे, गुंजन ताजणे, विनोद गोवरदीपे, हितेश गोहोकर, प्रणय काकडे, मयुर मदनकर, सुजित निकोडे, करण नायर , मयुर कुळमेथे, सुबोध उरकुंडे, सुरज गेडाम, पवन मूलकलवार या सर्वांचे मोलाचे योगदान आहे.