Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मुल लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मुल लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, सप्टेंबर १२, २०१८

राष्ट्रीय वृद्धापकाळ आरोग्य शुश्रूषा अभियानांतर्गत पहिले पथदर्शी केंद्र मुल येथे

राष्ट्रीय वृद्धापकाळ आरोग्य शुश्रूषा अभियानांतर्गत पहिले पथदर्शी केंद्र मुल येथे

चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येपहिले पथदर्शी केंद्र  
पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते 14 सप्टेंबरला लोकार्पण
चंद्रपूर/प्रतिनिधी:
 केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांचे पहिले पथदर्शी प्रयोग आपल्या जिल्ह्यात करणारे राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आता राष्ट्रीय वृद्धापकाळ आरोग्य शुश्रूषा कार्यक्रमांतर्गत पहिले शुश्रुषा केंद्र चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 14 सप्टेंबरला मूल येथील आरोग्य उपकेंद्रात पूर्णतः वरिष्ठ नागरिकांच्या आरोग्यासाठी समर्पित या केंद्राची सुरूवात होणार आहे. हा पथदर्शी प्रकल्प असून हळूहळू चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व तालुक्याच्या ठिकाणी हे केंद्र सुरू करण्यात येणार आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभाग, चंद्रपूर जिल्हा प्रशासन, टाटा ट्रस्ट व जनसेवा ग्रामीण विकास व शिक्षण प्रतिष्ठान या स्वयंसेवी संस्थेमार्फत हा प्रकल्प जिल्ह्यांमध्ये सुरू होत आहे. जनसेवा या स्वयंसेवी संस्थेने यासंदर्भात मूल येथे गेल्या चार महिन्यांपासून सर्वेक्षण केले आहे. तर टाटा ट्रस्टमार्फत भारतात अनेक ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याबाबत काळजी घेण्यासाठी राज्य सरकारसोबत राष्ट्रीय वृद्धापकाळ आरोग्य शुश्रूषा कार्यक्रम राबविला जात आहे. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने चंद्रपूर जिल्ह्यातील या अभिनव प्रयोगासाठी एक सामंजस्य करार टाटा ट्रस्ट यांच्यासोबत केला आहे. या करारानुसार टाटा ट्रस्ट आणि सार्वजनिक आरोग्य विभाग यांनी संयुक्तरीत्या वरिष्ठ नागरिकांच्या आरोग्याची काळजी करणाऱ्या या प्रकल्पावर काम करायचे आहे.
या प्रकल्पामधील प्रशिक्षण, मनुष्यबळाची उपलब्धता, जनतेमध्ये जागरूकता निर्माण करणे, ज्येष्ठ नागरिकांची संख्या, त्यांना आवश्यक असलेल्या वैद्यकीय मदतीची विभागणी, त्यासंदर्भातील माहिती गोळा करणे यासाठी टाटा ट्रस्ट जनसेवा या संस्थेची मदत घेत आहे. या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी व वेळोवेळी आवश्यक मार्गदर्शन करण्यासाठी एका सुकाणू समितीची देखील स्थापना करण्यात आली आहे. त्यामध्ये अध्यक्ष म्हणून नागपूरचे उपसंचालक आरोग्य सेवा असतील, तर चंद्रपूरचे जिल्हा शल्यचिकित्सक हे सदस्य सचिव असतील. याशिवाय जिल्हाधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, अतिरिक्त संचालक आरोग्य सेवा व टाटा ट्रस्टने नियुक्त केलेले प्रतिनिधी या सुकाणू समितीमध्ये असतील. महिन्यातून एकदा या सुकाणू समितीची बैठक होणार आहे.
60 महिन्यासाठी हा करार करण्यात आला असून जिल्हास्तरावर जिल्हा शल्य चिकित्सक चंद्रपूर यांना नोडल ऑफिसर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. ज्येष्ठ नागरिकांना उपचार केंद्रापर्यंत पोहोचवणे, त्यांच्या आरोग्याची तपासणी करणे शक्य नसेल, तर त्यांना आरोग्य केंद्रापर्यंत पोहोचण्यास मदत करणे, त्यांना औषधोपचार देणे, आवश्यकतेनुसार फिजिओथेरपिस्टकडून सल्ला देणे, उतारवयात येणाऱ्या दृष्टिच्या आजारासाठी नेत्र तज्ञांची मदत करणे, ज्येष्ठ नागरिकांवर सुलभ उपचार करण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षित करणे, जेस्ट नागरिक ज्यांच्या घरात आहे. अशा घरातील व्यक्तींना केसांची काळजी घेण्यासाठी मदत करणे सक्षम करणे, रुग्णांच्या प्रकृतीनुसार त्यांना जिल्हास्तरीय अथवा विभागस्तरीय अद्ययावत रुग्णालयात इलाजासाठी पाठविणे आदी उपक्रम या कार्यक्रमामध्ये राबविले जाणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये हा पहिला प्रयोग आहे. मूल येथील जिल्हा आरोग्य उपकेंद्रांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी ही सुविधा उपलब्ध केली जात आहे. सध्या अस्तित्वात असणाऱ्या यंत्रणेला बळकट सक्षम आणि आणखी लोकाभिमुख करून ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणारा हा प्रकल्प मूल येथील पथदर्शी प्रकल्पाच्या यशस्वीतेवर जिल्हाभरात राबविण्यात येणार आहे.

रविवार, मे २०, २०१८

वाहनाच्या धडकेत अस्वल अन चितळाचा मृत्यू

वाहनाच्या धडकेत अस्वल अन चितळाचा मृत्यू


चंद्रपूर/प्रतिनिधी:
चंद्रपुर जिल्ह्यातील मुल शहरापासून चार किलोमीटर अंतरावर नागपूर रोडवर चित्तेगाव या गावाजवळ अनोळखी वाहनाच्या धडकेत चीतळाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.अध्ण्यात वाहनाने जंगल परिसरातून जात असतांना जोरदार धडक दिली त्यात चीतळाचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरीकडे पाण्याच्या शोधात भटकणाऱ्या अस्वलाचा  मुलवरून १५ किमी अंतरावर असलेल्या केसलघाट नागाळा महामार्गावर अपघात झाला.महामार्गावर वारंवार होणाऱ्या अपघातामुळे वन्य प्राणाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे .
-----------------------------------------------------------------------             
जाहिरात...
भारतात पहिल्यांदा जागतिक पातळीवरील एक अग्रगण्य कंपनी घेऊन आली, कुक्कुट पालन ,मत्स्य पालन,शेळी पालन,दुध डेअरी यासारख्या संपूर्ण व्यवसायासाठी लागणारे संपूर्ण प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणार अगदी निशुल्क, याच सोबत पशुखाद्य,पिल्ले,औषधी, या सारख्या संपूर्ण goods अतिशय अल्प दरात उपलब्ध ...त्यासाठी संपर्क करा:9175937925 या क्रमांकावर (घरपोच सेवा उपलब्ध).

Gas safety device.
आपके एल.पी.जी गॅस सिलेंडर कि सुरक्षा अब आपके हात 
"सुरक्षित नारी सुरक्षित परिवार"
क्या आप अपने हि घर मे सुरक्षित है ?
दुर्घटना होणे से पहिले सावधानी बरते !
समय कभी बताकर नाही आता....तो इंतजार कीस बात का...
तुरंत मिलीये ..कही देर ना हो जाए !
*कल करेसो आज कर ,आज करे सो अब *
पल मे प्रलय हो जायेगा तो करेंगा कब !
जीवन अनमोल है!और आपका परिवार .........?
विशेषताए...
* सूक्ष्म गॅस लिकेज का परीक्षण.  
* गॅस का परिपूर्ण उपयोय एव गॅस के प्रमाण कि जानकारी गॅस कि बचत अर्थात पैसो की बचत
* किसी कारण होणे वाले गॅस लिकेजपर यह डीवाईस सप्लाई बंद कर देता है. 
आपकी सेफ्टी हि पुरे परीवार कि लाईफ सेफ्टी है..
जो अपने परीवारसे करते है प्यारवह गॅस सुरक्षा यंत्र से कैसे करेंगे इन्कार
तो फिर जल्दी ,आये जल्दी  पाये
संपर्क करे:9175937925,9021527117 

कृपया दिये गये लिंक ओपन करे :  https://youtu.be/IaXlvfNtkpo

मंगळवार, मे ०८, २०१८

शांतिकुंज आणि पृथ्वी कंपनीला आग:लाखोचे नुकसान

शांतिकुंज आणि पृथ्वी कंपनीला आग:लाखोचे नुकसान

चंद्रपूर/प्रतिनिधी:
मुल येथून जवळच असेलेल्या औद्योगिक परिसरात शांतिकुंज सलवंट लिमिटेड आणि  असलेल्या पृथ्वी फेरो अलॉय प्रायव्हेट लिमिटेड या दोन कंपनीला आज मंगळवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास भीषण आग लागली.या आगीत दोन्ही कंपनीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले,५ तासांच्या अथक परिश्रमानंतर हि आग आटोक्यात आणल्या गेली. विशेष म्हणजे या दोन्ही कंपनीमध्ये मरेगांव हे गाव आहे. हि लागलेली भीषण आग वेळीच आटोक्यात आल्याने  गाव वाचले त्यामुळे जीवितहानी टळली या दोन्ही कंपन्या  सध्यस्थिती बंद अवस्थेत आहेत पण दोन्ही कंपन्यांमध्ये रसायन असल्यामुळे आगीने उग्र रूप धारण केले होते. सध्या शेतात  खरीप हंगामाच्या तयारीसाठी मशागतीचे कामे सुरूआहे.अश्यातच शेतातील काडीकचरा हा शेतकरी तणीस टाकून नष्ट करत असतो.त्यासाठी जवळच्या परिसरात आग  होती व वाऱ्याच्या झोतात हि आग कंपनी परियंत आली आणि या दोन्ही कंपनीला आगीने वेढा घातला असे बोलल्या जात आहे.हि लागलेली आग भीषण असल्याने जवळील गावाला देखील खाली करण्याचे सांगण्यात आले होते.
हि आग विजवण्यासाठी चंद्रपूर-बल्लारपूर गडचिरोली आणि मूल येथील अग्निशमन  दलाला बोलाविण्यात 
आले अशी माहिती आहे.  पाच तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. हिरे उपविभागीय अधिकारी खेडकर, राज्य विद्युत विभागाचे अभियंता होणाडे,पोलीस निरीक्षण चव्हाण, घटनास्थळी जातीने हजर होते. 
जाहिरातीसाठी राखीव....
भारतात पहिल्यांदा जागतिक पातळीवरील एक अग्रगण्य कंपनी घेऊन आली, कुक्कुट पालन ,मत्स्य पालन,शेळी पालन,दुध डेअरी यासारख्या संपूर्ण व्यवसायासाठी लागणारे संपूर्ण प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणार अगदी निशुल्क, याच सोबत पशुखाद्य,पिल्ले,औषधी, या सारख्या संपूर्ण goods अतिशय अल्प दरात उपलब्ध ...त्यासाठी संपर्क करा:९१७५९३७९२५ या क्रमांकावर (घरपोच सेवा उपलब्ध)