Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

प्रहार लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
प्रहार लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, सप्टेंबर १६, २०१८

 बालगृहातील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्यावर कठोर कार्यवाही करावी:प्रहारची मागणी

बालगृहातील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्यावर कठोर कार्यवाही करावी:प्रहारची मागणी

 अनाथांचे रक्षकच बनले भक्षक:प्रहार अनाथ संघठन व बच्चू कडू युवा विचार मंचाची मागणी
जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन
चंद्रपूर/प्रतिनिधी:
चंद्रपूर शहरातील बाबूपेठ येथी स्नेहदीप  बालगृहातील अल्पवयीन निराधार मुलीवर  बलात्कार  करणाऱ्या  बंडू  कुत्तरमारे या नराधमास कठोर  शिक्षा देऊन पिडीतेला न्याय द्यावा. तसेच  राज्यातील बालगृहातील सुरक्षा यंत्रणा अधिक बळकट करावी अशा आशयाचे निवेदन प्रहार अनाथ संघठन तथा आ . बच्चू कडू युवा विचार मंच यांच्या तर्फे जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचे मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले.
         चंद्रपूर शहरातील स्नेहदीप बालगृहातील अल्पवयीन निराधार मुलीवर तेथील काळजीवाहक बंडू कुत्तरमारे याने बलात्कार केल्याची घटना ५ ऑगस्ट २०१८ रोजी  बालकल्याण समिती तर्फे  बालगृहाची तपासणी करण्यात आली यावेळी  उघडकीस आली. त्यावरून रामनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . सदर प्रकरण शासनाकडून जलदगती न्यायालयामध्ये चालविण्यात यावे तसेच बालगृहातील मुलींच्या सुरक्षेची जबादारी असणाऱ्या अधीक्षक , संचालक मंडळ , संबंधित प्रशासकीय अधिकारी यांनी हलगर्जीपणा  दाखविल्याने त्यांना सुद्धा सह आरोपी ठरवून त्यांच्या वर हि कार्यवाही करावी . जेणे करून समाजातील इतर अनाथ  निराधार मुलींसोबत अशा प्रकाराच्या घटनांची पुनरावृत्ती होणार नाही . तसेच अशा घटना इतर ठिकाणी घडू नये या करिता राज्यातील सर्व जिल्हातील  बालगृह , अनाथालय , वसतिगृहे यातील सुरक्षा यंत्रणा अधिक बळकट करून जिल्हा पातळीवर शासकीय व निमशासीय, अनाथ संघटनेचे सदस्य घेऊन  समिती स्थापन करावी . सदर प्रकरण येत्या १ महिन्यात जलद प्रक्रिया न्यालयामध्ये न चालविल्यास  प्रहार जनशक्ती पक्षाच्या अनाथ संघटने तर्फे राज्यातील अनाथांना घेवून प्रहार स्टाईल ने आंदोलन करण्यात येईल .असे निवेदनात नमूद केले असून यावेळी प्रहार अनाथ संघठन चे विदर्भ  संघटक अमीत वासनीक.  प्रहार कार्यकर्ते " प्रशांत कारेकर ' संजय तोंगट्टिवार  ,सामाजिक कार्यकर्ते  अजय बोंदगूलवार 'बच्चू कडू युवा विचार मंचाचे संदीप झाडे', निलेश ढवस', नितीन नागरकर, गणेश उराडे,राहुल चौधरी,आशीतोश सातपूते,प्रशांत आडे,आशीष गेडाम तथा आ बच्चू कडू युवा विचार मंचाचे इतर सदस्य  उपस्थित होते.

मंगळवार, जुलै ३१, २०१८

हा तर वडगाव प्रभागावर अन्याय; पप्पू देशमुख यांचा आमसभेत आरोप

हा तर वडगाव प्रभागावर अन्याय; पप्पू देशमुख यांचा आमसभेत आरोप

शहीद बाबूराव थोरात यांच्या कुटुंबीयांना मालमत्त 
 कराची माफी पूर्ववत सुरू ठेवण्याची मागणी
चंद्रपूर/प्रतिनिधी:
दृष्ट सत्ताधारी आणि भ्रष्ट सत्ताधारी कविता सभागृहात
 वाचवून दाखवतांना प्रहारचे नगरसेवक पप्पू देशमुख 
 मौजा दे.गो. तुकूम मधील 8 जागेवरील आरक्षण काढण्याचा विषय आज आमसभेमध्ये आला होता. यावर वडगाव प्रभागाचे  नगरसेवक पप्पू देशमुख यांनी या मुद्द्याला धरून आमसभेत प्रश्नांची सरबत्ती केली.वडगाव प्रभागामध्ये सुद्धा अनेक जमिनीवर आरक्षण आहेत. आरक्षण असलेल्या जमिनीवर रहिवाशी घरे झालेली आहेत. शासनाच्या नियमानुसार 50 टक्केपेक्षा जास्त घरे झालेली असताना व आरक्षणाची गरज नसल्यास अशा प्रकारचे आरक्षण काढण्याची तरतूद आहे.असे पप्पू देशमुख यांचा आमसभेत सांगितले.
या तरतुदीचा वापर करीत मौजा दे गो. तुकुम मधील आरक्षण काढण्याचा विषय महासभेमध्ये घेण्यात आला.मग वडगाव प्रभागात सोबत दुजाभाव का करण्यात येत आहे,वडगाव प्रभागातील नागरिक गुंठेवारीसाठी चकरा मारत आहेत. अशा वेळी वडगाव प्रभागांमधील ट्रक टर्मिनल व इतर आरक्षण जिथे 50 टक्केपेक्षा जास्त निवासी घरे झाली,ही आरक्षणे काढण्याचा विषय का घेण्यात आला नाही.हा वडगाव प्रभागावर अन्याय असल्याचा आरोप देशमुख यांनी यावेळी आमसभेत केला.तसेच वडगाव प्रभागातील गुंठेवारीची आरक्षणे काढण्याचा विषय घेतल्याशिवाय इतर विषयांना स्थगिती द्या अशी मागणी त्यांनी लावून धरली. यावर बराच वेळ गदारोळ झाला  यानंतर वडगाव प्रभागातील पात्र प्रकरणे आरक्षण काढण्यासाठी घेण्यात येतील असे आश्वासन महापौर अंजली घोटेकर यांनी दिले.
 आमसभेमध्ये माजी सैनिकांना मालमत्ता करामध्ये सूट देण्यात आली.मागील आमसभेमध्ये प्रहार चे नगरसेवक पप्पू देशमुख यांनी हा विषय लावून धरला होता. त्यामुळे या आमसभेत अजेंड्यावर चर्चेमध्ये हा विषय घेण्यात आला होता.आमसभेत  सर्वानुमते माजी सैनिकांना मालमत्ता करातून सूट देण्याचा ठराव घेण्यात आला. मात्र त्याच वेळी गोवा स्वातंत्र्य लढ्यातले शहीद बाबूराव थोरात यांच्या वारसदाराला टॅक्स माफी देण्याच्या मुद्द्यावरून पप्पू देशमुख यांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. विशेष म्हणजे शहीद बाबूराव थोरात यांच्या कुटुंबीयांना टॅक्स माफी देण्याचा ठराव चंद्रपूर नगरपालिकेमध्ये घेण्यात आला होता.या ठरावानुसार मागील अनेक वर्षांपासून बाबूराव थोरात यांच्या कुटुंबियांना मालमत्ता करातून सूट देण्यात येत होती.२०१८ मध्ये महानगरपालिकेने शहीद थोरात यांच्या मुलाला ४०००० मालमत्ता कर पाठविला .याबाबत  सभेमध्ये मुद्दा उपस्थित करून शहीद थोरात यांच्या कुटुंबियांना पूर्ववत मालमत्ता करमाफी सुरू ठेवण्याची मागणी देशमुख यांनी केली. यावर सदर प्रकरणाची चौकशी करून निर्णय घेण्याचे आश्‍वासन महापौरांनी दिले.

बुधवार, मार्च ०७, २०१८

 अंबुजा प्रकल्पग्रस्तांची सोनापूर ते चंद्रपूर पदयात्रा धडकली जिल्हाधिकार्यालयावर

अंबुजा प्रकल्पग्रस्तांची सोनापूर ते चंद्रपूर पदयात्रा धडकली जिल्हाधिकार्यालयावर

चंद्रपूर/प्रतिनिधी:

अंबुजा कंपनीकडून होत असलेल्या अन्याय आणि फसवणुकीच्या विरोधात प्रकल्पग्रस्तांनी प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष पप्पु देशमुख यांच्या नेतृत्वात सोनापूर ते चंद्रपूर अशा पदयात्रेला मंगळवारी सुरूवात केली. या पदयात्रेचे ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात आले. मंगळवारी राजुरा एसडीओ कार्यालयासमोर धरणे देवून ही पदयात्रा थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकली आहे.
सोनापूरवरुन जयघोषात निघालेल्या पदयात्रेचे दुपारी गडचांदुरात माजी जि. प. सभापती अरुण निमजे यांनी स्वागत केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते मनोज भोजेकर उपस्थित होते. त्यानंतर राजुरा येथे पदयात्रा पोहचताच भवानी मंदिर संस्थान, संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, आॅटो चालक-मालक संघटना, बार असोसिएशन, गुरुदेव सेवा मंडळ, संघर्ष गृप व टैक्सी चालक-मालक संघटना यांच्याकडूनही स्वागत करण्यात आले. राजुरा वरून निघालेली हि पदयात्रा बल्लारशा मार्गे होत जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन धडकली व धरणे आंदोलन करण्यात आले.
अंबुजा प्रकल्पग्रस्तांनी प्रहार संघटनेच्या नेतृत्वात २० जानेवारीपासून चंद्रपुरात बेमुदत उपोषण सुरु केले आहे. परंतु, उपोषणाची अजुनही दखल घेण्यात आली नाही. उलट दबावतंत्राचा प्रयोग होत असल्याने प्रहारने पदयात्रा काढली आहे. अंबुजा प्रकल्पाकरिता १९९९ मध्ये ५२० प्रकल्पग्रस्त शेतकºयांची १२२६ हेक्टर जमीन अधिग्रहीत करण्यात आली. परंतु, कित्येक प्रकल्पग्रस्तांना अजुनही स्थायी नोकरी आणि योग्य मोबदला दिला नाही. याच अन्यायाविरोधात आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
अंबुजा प्रकल्पग्रस्तांची सोनापूर ते चंद्रपूर पदयात्रा

अंबुजा प्रकल्पग्रस्तांची सोनापूर ते चंद्रपूर पदयात्रा

Sonpur to Chandrapur Padyatra of Ambuja project affected | अंबुजा प्रकल्पग्रस्तांची सोनापूर ते चंद्रपूर पदयात्रागडचांदूर/प्रतिनिधी:
अंबुजा कंपनीकडून होत असलेल्या अन्याय आणि फसवणुकीच्या विरोधात प्रकल्पग्रस्तांनी प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष पप्पु देशमुख यांच्या नेतृत्वात सोनापूर ते चंद्रपूर अशा पदयात्रेला मंगळवारी सुरूवात केली. या पदयात्रेचे ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात आले. मंगळवारी राजुरा एसडीओ कार्यालयासमोर धरणे देवून ही पदयात्रा बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे.
सोनापूरवरुन जयघोषात निघालेल्या पदयात्रेचे दुपारी गडचांदुरात माजी जि. प. सभापती अरुण निमजे यांनी स्वागत केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते मनोज भोजेकर उपस्थित होते. त्यानंतर राजुरा येथे पदयात्रा पोहचताच भवानी मंदिर संस्थान, संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, आॅटो चालक-मालक संघटना, बार असोसिएशन, गुरुदेव सेवा मंडळ, संघर्ष गृप व टैक्सी चालक-मालक संघटना यांच्याकडूनही स्वागत करण्यात आले. या पदयात्रेचा बोंडे मंगल कार्यालयात आज मुक्काम असून बुधवारी राजुरा येथून ही पदयात्रा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. येथे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
अंबुजा प्रकल्पग्रस्तांनी प्रहार संघटनेच्या नेतृत्वात २० जानेवारीपासून चंद्रपुरात बेमुदत उपोषण सुरु केले आहे. परंतु, उपोषणाची अजुनही दखल घेण्यात आली नाही. उलट दबावतंत्राचा प्रयोग होत असल्याने प्रहारने पदयात्रा काढली आहे. अंबुजा प्रकल्पाकरिता १९९९ मध्ये ५२० प्रकल्पग्रस्त शेतकºयांची १२२६ हेक्टर जमीन अधिग्रहीत करण्यात आली. परंतु, कित्येक प्रकल्पग्रस्तांना अजुनही स्थायी नोकरी आणि योग्य मोबदला दिला नाही. याच अन्यायाविरोधात आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

मंगळवार, नोव्हेंबर १४, २०१७

रामटेक  पोलिस स्टेशन समोर दारु विक्रिचे स्टॉल लावू

रामटेक पोलिस स्टेशन समोर दारु विक्रिचे स्टॉल लावू

रामटेक, प्रतिनिधी-  तालुक्यातील अनेक गावात मोठ्या प्रमाणात अवैध दारु विक्री सुरु आहे.
ही अवैध दारु विक्री पोलिसांचा संरकक्षणात सुरु असल्याचा आरोप करत आज प्रहार महिला आघाडी रामटेक तालुक्याचा वतीने पोलिस स्टेशन रामटेक वर धड़क देण्यात आली व् पोलिस उपनिरीक्षक तालिकोटे यांना निवेदन देवून तत्काळ ही  अवैध दारु विक्री बंद करावी अन्यथा पोलिस स्टेशन रामटेक समोर दारु विक्रीचा स्टॉल लावू अशा इशारा प्रहार तर्फे पोलिस स्टेशन ला देण्यात आला.

यावेळी प्रहार रामटेक विधान सभा संयोजक रमेश कारामोरे,तालुका प्रमुख श्रीकांत बावनकुले,युवा आघाडी तालुका प्रमुख प्रयास ठाकुर ,महिला आघाडी प्रमुख लता दोण्डलकर,युवा महिला आघाडी प्रमुख योगिता सोलंकी,कोलितमारा सर्कल प्रमुख राध्येशाम नखाते ,नगरधन येथील सुरेन्द्र बिरणवार,रामदास बावनकुले,राजेश बुरबांदे,काचुरवाहि शाखा प्रमुख गजानन भलमे,वनिता कोकोडे,वंदना कुमरे,इंदु गायधने,सुरेखा खंडाते,गीता पंधराम,रूपलता भलावी सुनीता भोंडे,मीणा उइके,कुसुम सहारे,माया वासनिक,शिलाबाई चवले,कुंदा मोहनकर,कुसुम सहारे,राजकन्या देशमुख,कुंदा पोठभरे,तुलजा पंचभाई ,सकून उईके
इत्यादि प्रहार महिला आघाडी च्या कार्यक्रत्या उपस्तित होत्या