Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

देशमुख लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
देशमुख लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, ऑगस्ट ०६, २०१८

चंद्रपुरात नगरसेवक अन नागरिकांवर आली प्लंबरगिरीची वेळ

चंद्रपुरात नगरसेवक अन नागरिकांवर आली प्लंबरगिरीची वेळ

चंद्रपूर/प्रतिनिधी:
 शहराला विविध प्रभागात खासगी कंपनीकडून पाणी पुरवठा केला जाते. मात्र अनेक ठिकाणी पाईपलाईन लिकेज असल्याने गढुळ पाण्याचा पुरवठा होत आहे. याबाबत पाणी पुरवठा कंपनीकडे अनेकदा तक्रार करूनही दुर्लक्षच केल्याने स्थानिक नागरिक व नगरसेवक पप्पु देशमुख यांनी पुढाकार घेत लिकेज दुरूस्त केले.त्यामुळे प्रशासनाच्या मुजोरकि पणामुळे नागरिकांना आणि नगरसेवकावर चक्क प्लंबरगिरीची वेळ आली आहे, त्यामुळे पाणी पुरवठा कंपनी व मनपा प्रशासनाप्रति नागरिकांत रोष पसरला आहे.
रविवारी सकाळी ७ वाजता वडगाव प्रभागाचे नगरसेवक पप्पू देशमुख यांना दत्तनगर परिसरातील नागरिकांनी फोन करून मागिल अनेक महिन्यांपासून दत्तनगरमध्ये पाण्याचा अनियमित पाणी पुरवठा होत असल्याची तक्रार केली. पाईपलाईन लिकेज असल्याने गढुळ पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांनी सांगितले. तेव्हा नगरसेवक पप्पु देशमुख व नागरिकांनी नागपूर मार्गावरील अंजीकर शोरूम जवळील पुलाखाली असलेला लिकेज शोधून काढला. याबाबत नागरिकांनी उज्वल कन्स्ट्रक्शन या पाणी पुरवठा कंपनीला फोन करून माहिती दिली. मात्र समाधानकारक प्रतिसाद मिळाला नाही. रविवार दिवस असल्यामुळे तांत्रिक कामगार सुद्धा त्वरित येणार नाहीत, याची कल्पना नागरिकांना आली.
त्यामुळे नगरसेवक पप्पु देशमुख व प्रभागातील नागरिक दुर्गेश गिरडकर, गजानन झोडे, केशव दारवणकर, महेंद्र राळे, गुलाबराव पुनवटकर, विश्वनाथ नक्षिणे, खेमराज चिवडे त्यांनी स्वत:च लिकेज दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला. दुर्गेश गिरडकर, गजानन झोडे यांनी आपल्याकडील पाईप दुरूस्तीचे साहित्य आणले. सर्वजण नाल्यात उतरले आणि ज्या ठिकाणी पाईपलाईन लिकेज होती, त्या ठिकाणी दुरुस्तीचे काम सुरू केले.
अशाप्रकारे नागरिकांनी व नगरसेवकाने स्वत: पुढाकार घेऊन लिकेज बंद केला. लिकेजमुळे विनाकारण पाणी वाया जात असल्याची माहिती दिल्यानंतरही उज्वल कंस्ट्रक्शन कंपनीने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप पर्यावरणवादी कार्यकर्ते महेंद्र राळे यांनी केला आहे. शहर अजून पाणीटंचाईच्या धोक्यातून सावरलेला नसताना अशा समस्यांची गंभीर दखल घेणे आवश्यक आहे. मात्र महानगरपालिका प्रशासनही याकडे दुर्लक्ष का करीत आहे, असा प्रश्नही त्यांनी केला आहे.
मनपा व पाणी पुरवठा कंपनीच्या कारभारावर प्रभागातील नागरिकांकडून रोष व्यक्त केला जात असून पालिकेने वेळीच याकडे लक्ष देऊन नागरिकांची होणारी गैरसोय दूर करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
मनपा करत आहे जाणिवपूर्वक दुर्लक्ष
शहरात अजूनही एक दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. दत्तनगर व वडगाव प्रभागातील अनेक ठिकाणी अनियमित पाणी पुरवठा होतो. नागरिकांना पाणी मिळत नसल्याच्या लेखी तक्रारी महानगरपालिका प्रशासनाकडे वारंवार देण्यात आल्या. आमसभेमध्येही हा प्रश्न वेळोवेळी उचलून धरला. परंतु, मनपा प्रशासन पाणीपुरवठा करणाऱ्या कंपनीविरूद्ध कठोर कारवाई करण्यास जाणीवपूर्वक टाळत आहे. विवेकानंदनगर, लक्ष्मीनगर, पीडब्ल्यूडी कॉर्टर, दत्तनगर, सिव्हील लाईन परिसरातील नागरिकांकडून अनेकवेळा लेखी तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र मनपा याकडे दुर्लक्षच करीत असल्याचा आरोप नगरसेवक पप्पू देशमुख यांनी केला आहे. आतातरी पालिकेने पाणी समस्येकडे लक्ष देऊन नागरिकांची होणारी गैरसोय दूर करण्याची मागणी त्यांनी व वॉर्डातील नागरिकांनी केली आहे.


मंगळवार, जुलै ३१, २०१८

हा तर वडगाव प्रभागावर अन्याय; पप्पू देशमुख यांचा आमसभेत आरोप

हा तर वडगाव प्रभागावर अन्याय; पप्पू देशमुख यांचा आमसभेत आरोप

शहीद बाबूराव थोरात यांच्या कुटुंबीयांना मालमत्त 
 कराची माफी पूर्ववत सुरू ठेवण्याची मागणी
चंद्रपूर/प्रतिनिधी:
दृष्ट सत्ताधारी आणि भ्रष्ट सत्ताधारी कविता सभागृहात
 वाचवून दाखवतांना प्रहारचे नगरसेवक पप्पू देशमुख 
 मौजा दे.गो. तुकूम मधील 8 जागेवरील आरक्षण काढण्याचा विषय आज आमसभेमध्ये आला होता. यावर वडगाव प्रभागाचे  नगरसेवक पप्पू देशमुख यांनी या मुद्द्याला धरून आमसभेत प्रश्नांची सरबत्ती केली.वडगाव प्रभागामध्ये सुद्धा अनेक जमिनीवर आरक्षण आहेत. आरक्षण असलेल्या जमिनीवर रहिवाशी घरे झालेली आहेत. शासनाच्या नियमानुसार 50 टक्केपेक्षा जास्त घरे झालेली असताना व आरक्षणाची गरज नसल्यास अशा प्रकारचे आरक्षण काढण्याची तरतूद आहे.असे पप्पू देशमुख यांचा आमसभेत सांगितले.
या तरतुदीचा वापर करीत मौजा दे गो. तुकुम मधील आरक्षण काढण्याचा विषय महासभेमध्ये घेण्यात आला.मग वडगाव प्रभागात सोबत दुजाभाव का करण्यात येत आहे,वडगाव प्रभागातील नागरिक गुंठेवारीसाठी चकरा मारत आहेत. अशा वेळी वडगाव प्रभागांमधील ट्रक टर्मिनल व इतर आरक्षण जिथे 50 टक्केपेक्षा जास्त निवासी घरे झाली,ही आरक्षणे काढण्याचा विषय का घेण्यात आला नाही.हा वडगाव प्रभागावर अन्याय असल्याचा आरोप देशमुख यांनी यावेळी आमसभेत केला.तसेच वडगाव प्रभागातील गुंठेवारीची आरक्षणे काढण्याचा विषय घेतल्याशिवाय इतर विषयांना स्थगिती द्या अशी मागणी त्यांनी लावून धरली. यावर बराच वेळ गदारोळ झाला  यानंतर वडगाव प्रभागातील पात्र प्रकरणे आरक्षण काढण्यासाठी घेण्यात येतील असे आश्वासन महापौर अंजली घोटेकर यांनी दिले.
 आमसभेमध्ये माजी सैनिकांना मालमत्ता करामध्ये सूट देण्यात आली.मागील आमसभेमध्ये प्रहार चे नगरसेवक पप्पू देशमुख यांनी हा विषय लावून धरला होता. त्यामुळे या आमसभेत अजेंड्यावर चर्चेमध्ये हा विषय घेण्यात आला होता.आमसभेत  सर्वानुमते माजी सैनिकांना मालमत्ता करातून सूट देण्याचा ठराव घेण्यात आला. मात्र त्याच वेळी गोवा स्वातंत्र्य लढ्यातले शहीद बाबूराव थोरात यांच्या वारसदाराला टॅक्स माफी देण्याच्या मुद्द्यावरून पप्पू देशमुख यांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. विशेष म्हणजे शहीद बाबूराव थोरात यांच्या कुटुंबीयांना टॅक्स माफी देण्याचा ठराव चंद्रपूर नगरपालिकेमध्ये घेण्यात आला होता.या ठरावानुसार मागील अनेक वर्षांपासून बाबूराव थोरात यांच्या कुटुंबियांना मालमत्ता करातून सूट देण्यात येत होती.२०१८ मध्ये महानगरपालिकेने शहीद थोरात यांच्या मुलाला ४०००० मालमत्ता कर पाठविला .याबाबत  सभेमध्ये मुद्दा उपस्थित करून शहीद थोरात यांच्या कुटुंबियांना पूर्ववत मालमत्ता करमाफी सुरू ठेवण्याची मागणी देशमुख यांनी केली. यावर सदर प्रकरणाची चौकशी करून निर्णय घेण्याचे आश्‍वासन महापौरांनी दिले.

बुधवार, मार्च ०७, २०१८

 अंबुजा प्रकल्पग्रस्तांची सोनापूर ते चंद्रपूर पदयात्रा धडकली जिल्हाधिकार्यालयावर

अंबुजा प्रकल्पग्रस्तांची सोनापूर ते चंद्रपूर पदयात्रा धडकली जिल्हाधिकार्यालयावर

चंद्रपूर/प्रतिनिधी:

अंबुजा कंपनीकडून होत असलेल्या अन्याय आणि फसवणुकीच्या विरोधात प्रकल्पग्रस्तांनी प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष पप्पु देशमुख यांच्या नेतृत्वात सोनापूर ते चंद्रपूर अशा पदयात्रेला मंगळवारी सुरूवात केली. या पदयात्रेचे ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात आले. मंगळवारी राजुरा एसडीओ कार्यालयासमोर धरणे देवून ही पदयात्रा थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकली आहे.
सोनापूरवरुन जयघोषात निघालेल्या पदयात्रेचे दुपारी गडचांदुरात माजी जि. प. सभापती अरुण निमजे यांनी स्वागत केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते मनोज भोजेकर उपस्थित होते. त्यानंतर राजुरा येथे पदयात्रा पोहचताच भवानी मंदिर संस्थान, संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, आॅटो चालक-मालक संघटना, बार असोसिएशन, गुरुदेव सेवा मंडळ, संघर्ष गृप व टैक्सी चालक-मालक संघटना यांच्याकडूनही स्वागत करण्यात आले. राजुरा वरून निघालेली हि पदयात्रा बल्लारशा मार्गे होत जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन धडकली व धरणे आंदोलन करण्यात आले.
अंबुजा प्रकल्पग्रस्तांनी प्रहार संघटनेच्या नेतृत्वात २० जानेवारीपासून चंद्रपुरात बेमुदत उपोषण सुरु केले आहे. परंतु, उपोषणाची अजुनही दखल घेण्यात आली नाही. उलट दबावतंत्राचा प्रयोग होत असल्याने प्रहारने पदयात्रा काढली आहे. अंबुजा प्रकल्पाकरिता १९९९ मध्ये ५२० प्रकल्पग्रस्त शेतकºयांची १२२६ हेक्टर जमीन अधिग्रहीत करण्यात आली. परंतु, कित्येक प्रकल्पग्रस्तांना अजुनही स्थायी नोकरी आणि योग्य मोबदला दिला नाही. याच अन्यायाविरोधात आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
अंबुजा प्रकल्पग्रस्तांची सोनापूर ते चंद्रपूर पदयात्रा

अंबुजा प्रकल्पग्रस्तांची सोनापूर ते चंद्रपूर पदयात्रा

Sonpur to Chandrapur Padyatra of Ambuja project affected | अंबुजा प्रकल्पग्रस्तांची सोनापूर ते चंद्रपूर पदयात्रागडचांदूर/प्रतिनिधी:
अंबुजा कंपनीकडून होत असलेल्या अन्याय आणि फसवणुकीच्या विरोधात प्रकल्पग्रस्तांनी प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष पप्पु देशमुख यांच्या नेतृत्वात सोनापूर ते चंद्रपूर अशा पदयात्रेला मंगळवारी सुरूवात केली. या पदयात्रेचे ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात आले. मंगळवारी राजुरा एसडीओ कार्यालयासमोर धरणे देवून ही पदयात्रा बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे.
सोनापूरवरुन जयघोषात निघालेल्या पदयात्रेचे दुपारी गडचांदुरात माजी जि. प. सभापती अरुण निमजे यांनी स्वागत केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते मनोज भोजेकर उपस्थित होते. त्यानंतर राजुरा येथे पदयात्रा पोहचताच भवानी मंदिर संस्थान, संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, आॅटो चालक-मालक संघटना, बार असोसिएशन, गुरुदेव सेवा मंडळ, संघर्ष गृप व टैक्सी चालक-मालक संघटना यांच्याकडूनही स्वागत करण्यात आले. या पदयात्रेचा बोंडे मंगल कार्यालयात आज मुक्काम असून बुधवारी राजुरा येथून ही पदयात्रा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. येथे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
अंबुजा प्रकल्पग्रस्तांनी प्रहार संघटनेच्या नेतृत्वात २० जानेवारीपासून चंद्रपुरात बेमुदत उपोषण सुरु केले आहे. परंतु, उपोषणाची अजुनही दखल घेण्यात आली नाही. उलट दबावतंत्राचा प्रयोग होत असल्याने प्रहारने पदयात्रा काढली आहे. अंबुजा प्रकल्पाकरिता १९९९ मध्ये ५२० प्रकल्पग्रस्त शेतकºयांची १२२६ हेक्टर जमीन अधिग्रहीत करण्यात आली. परंतु, कित्येक प्रकल्पग्रस्तांना अजुनही स्थायी नोकरी आणि योग्य मोबदला दिला नाही. याच अन्यायाविरोधात आंदोलन सुरू करण्यात आले आहे.