Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

दिन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
दिन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, जुलै ०१, २०२१

डॉक्टर्स डे का साजरा करतात

डॉक्टर्स डे का साजरा करतात

 

 डॉक्टर्स डे का साजरा करतात 
---------------------------------
जगात वेगवेगळया दिवशी डाॅक्टर डे
________________________
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
________________________
डॉक्टरला देवाचं रूप मानलं जातं. अनेक रूग्णांसाठी, त्यांच्या नातेवाईकांसाठी डॉक्टर हा त्यांच्या आयुष्यात आलेला देवदूत असते. त्यांच्या कौशल्याने अनेकांना जीवदान मिळालेले आहे. भारतामध्ये 1 जुलै हा दिवस डॉक्टर्स डे म्हणून साजरा केला जातो.
भारताचे प्रसिद्ध चिकित्सक डॉ विधान चंद्र रॉय यांना श्रद्धांजली आणि सन्मान म्हणून 1 जुलै हा दिवस डॉक्टर्स डे म्हणून साजरा केला जातो. 1991पासुन भारतामध्ये डॉक्टर्स डे साजरा करण्यात  येतो. 4 फेब्रुवारी 1961 साली डॉ विधान चंद्र रॉय यांना भारताचा सर्वोच्च नागरिक सन्मान म्हणजेच 'भारतरत्न' बहाल करण्यात आला आहे.
डॉ. विधान चंद्र रॉय यांचा जन्म 1 जुलै 1882 साली बिहारमधील पटना येथे झाला.

डॉक्टर्स डे का साजरा करतात,Why celebrate Doctor's Day


वैद्यकीय व्यवसाय हा केवळ आर्थिक लाभ पदरात पाडून घ्यायचा धंदा नसून, तो रोग्याला रोगमुक्त करण्यासाठी जीव तोडून करावयाची एक सेवा आहे. व्यवसाय आणि सेवा यात डॉक्टर सेवेच्या बाजूला थोडा जास्त झुकला पाहिजे. रुग्णाविषयी डॉक्टरला वाटणारी आस्था पाहूनच रुग्ण निम्मा बरा झाला पाहिजे. सहृदय माणसाचा स्पर्शदेखील रुग्णाला व्याधीमुक्त करून जातो. तो नुसता डॉक्टर न रहाता त्याच्यासाठी श्रध्दास्थान होवून जातो.
फिजिशियन डॉ विधानचंद्र रॉय हे पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री होते. त्यांच्या दूरदर्शी नेतृत्त्वामुळे रॉय यांना पश्चिम बंगालचे आर्किटेक्ट असेही म्हणतात.
रॉय यांचे शिक्षण कलकत्त्यामध्ये झाले. एमआरसीपी आणि एफआरसीएसची डिग्री लंडनमधून घेतली आहे. 1911 पासून त्यांनी भारतामध्ये वैद्यकीय सेवा देण्यास सुरूवात केली.
🔹जगभरात वेगवेगळे सेलिब्रेशन
जगभरात डॉक्टर्स डेचं वेगवेगळ्या दिवशी सेलिब्रेशन केले जाते. अमेरिकेमध्ये 30 मार्च दिवशी डॉक्टर्स डे सेलिब्रेट केला जातो. यापूर्वी हे सेलिब्रेशन 9 मे रोजी केले जात असे. ईरान, क्युबा या देशात  वेगवेगळ्या दिवशी डॉक्टर्स डे साजरा केला जातो. 
रूग्णांच्या सेवेसाठी 24X7 कार्यरत असणार्‍या डॉक्टर्सना यादिवशी धन्यवाद दिले जातात. त्यांच्या सेवेप्रती या दिवशी आदर आणि आभार व्यक्त केले जातात. याकरिता ग्रिटिंग्स,मेसेज पाठवले  जातात.
डॉक्टराना देवदूत मानले जाते.

__________________________________________

Why celebrate Doctor's Day

 ---------------------------------

 Doctor's Day on different days in the world

 ________________________

 Mahiti seva Group Pethwadgaon

 ________________________

 The doctor is considered to be the form of God.  For many patients, the doctor is an angel to their relatives.  Their skills have saved many lives.  In India, July 1 is celebrated as Doctor's Day.

 July 1 is celebrated as Doctor's Day as a tribute and honor to India's famous physician Dr. Vidhan Chandra Roy.  Doctor's Day has been celebrated in India since 1991.  On February 4, 1961, Dr. Vidhan Chandra Roy was awarded the Bharat Ratna, India's highest civilian honor.

 Dr.  Vidhan Chandra Roy was born on 1 July 1882 in Patna, Bihar.

 The medical profession is not just a business for financial gain, it is a service for the sick.  In business and service, doctors should lean a little more towards service.  The patient should be cured only after seeing the doctor's feelings about the patient.  Even the touch of a kind person cures the patient.  He becomes a place of worship for him, not just a doctor.

 Physician Dr. Vidhan Chandra Roy was the second Chief Minister of West Bengal.  Roy is also known as the architect of West Bengal for his visionary leadership.

 Roy was educated in Calcutta.  MRCP and FRCS degrees are taken from London.  From 1911, he started providing medical services in India.

 वेगवेग Different celebrations around the world

 Doctor's Day is celebrated on different days around the world.  Doctor's Day is celebrated on March 30 in the United States.  Earlier, the celebration was held on May 9.  Doctor's Day is celebrated on different days in Iran and Cuba.

 Thanks to the doctors who work 24X7 for the service of patients.  Respect and gratitude are expressed on this day for their service.  Greetings, messages are sent for this.

 Doctors are considered angels.

१ जुलै कृषी दिन

१ जुलै कृषी दिन

  जुलै कृषी दिन  

____________________________
💫 माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव  💫
____________________________
.         १ जुलै कृषी दिन.... हरित क्रांतीचे प्रणेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या कृषी क्षेत्रातील मोलाच्या योगदानाची आठवण म्हणून त्यांची जयंती महाराष्ट्रात कृषी दिन म्हणून साजरी केली जाते.
महाराष्ट्रात सद्यस्थितीत कृषि क्षेत्रात जी प्रगती झाली आहे, त्यामागे वसंतराव नाईक यांची दूरदृष्टी कारणीभूत ठरली आहे असे म्हटले तरी वावगे ठरू नये.वसंतराव नाईक यांनी त्यावेळची मर्यादित साधने आणि प्रतिकूल परिस्थितीचा सामना करुन राज्यात कृषीक्रांती घडवून आणली. ते हाडाचे शेतकरी होते. ‘शेती आणि शेतकरी’ हे त्यांच्या जिव्हाळ्याचे. अभ्यासाचे विषय राहिले. शेतीला आधुनिक स्वरुप देण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. राज्यात ‘कृषी विद्यापीठां’ची स्थापना केली. शेतकऱ्यांना संकरीत बियाणे उपलब्ध करुन अन्न-धान्याच्या दुष्काळावर मात केली. 1972 च्या दुष्काळाचं संकट त्यांनी आव्हान म्हणून स्विकारलं आणि दुष्काळनिवारणाचा शाश्वत मार्ग दाखवला.

१ जुलै कृषी दिन  , July 1 Agriculture Day


दिवंगत वसंतराव नाईक यांच्या कार्यकाळात महाराष्ट्रात चार कृषी विद्यापीठे सुरु करण्यात आली. या कृषी विद्यापीठांच्या माध्यमातून शेतीमधील आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यां पर्यंत पोहोचले.        
शेतक-याने घाम गाळून पिकवलेल्या कृषी उत्पन्नांना उत्तम बाजारभाव व उत्तम बाजारपेठ मिळवून देण्यासाठी कित्येक आधुनिक शिक्षणक्रम उपलब्ध आहेत. तरुणांनी याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. इथे तुम्हाला थेट मातीत हात घालायची गरज नाही; मात्र तुमच्या मदतीने या क्षेत्राचं पुनरुज्जीवन होऊ शकते हे निश्चित.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट कृषी क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञानाच्या वापरासाठी शेती विषयात उच्चशिक्षण घेणे आवश्यक आहे. हे उच्चशिक्षण म्हणजे दोन अथवा तीन वर्षाची पदवीच असावी असे जरूरी नाही. काही अल्प मुदतीचे अभ्यासक्रमही उपलब्ध आहेत. मार्केटिंग म्हणजे विपणन आणि विक्री हा कुठल्याही उद्योगाचा पाया. तुम्ही जे बनवता ते विकू शकला नाहीत तर कितीही उत्तम उत्पादनाची किंमत शून्य ठरते. शेतीमध्ये सुद्धा हेच तत्त्व लागू पडते. त्यामुळे उत्पादन आणि गुणवत्तेसोबतच, व्यवस्थापन, मार्केटिंग, आणि विक्री याचेही उत्तम मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे.
शेतीकडे एक उद्योग म्हणून पाहिल्यास शेती अधिक फायदेशीर होऊ शकते. कृषी क्षेत्राचा हा मंत्र तरुणांनी एकमेकांना देणं आवश्यक आहे. या क्षेत्रात नवनवीन कल्पनांची गरज आणि वाव दोन्हीही आहेत. कृषी उत्पन्न विकण्यासाठी देखील माहीतगार कुशल व्यक्तींची गरज असते.
आपल्या पूर्वजांनी पारंपरिक पद्धतीने शेती केली आणि त्यातून वर्षानुवष्रे भारत सुजलाम सुफलाम राहिला आहे खरे, मात्र नवीन काळानुसार नवीन तंत्रज्ञानाची आणि संशोधनाची मदत घेऊन शेती करणे अधिक संयुक्तिक ठरणार आहे. कृषी क्षेत्र ओढग्रस्त झालं तरी अखेर ती आपली गरज आहे व आपणच या क्षेत्रात नवनवीन सुधारणा घडवून आणून पुन्हा या क्षेत्राला नवी झळाळी देऊ शकतो. त्यासाठी थोडय़ा बुद्धीची गरज आहे.
____________________________
ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498 
!|! माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव !|!
    ണคн¡т¡ รεvค
.       :::::∴━━━✿━━━∴:::


 July 1 Agriculture Day


 ____________________________

 mahiti seva Group Pethwadgaon

 ____________________________

 .  July 1 Agriculture Day .... The birth anniversary of Vasantrao Naik, the pioneer of green revolution and former Chief Minister of Maharashtra, is celebrated in Maharashtra as Agriculture Day to commemorate his valuable contribution in the field of agriculture.

 It is safe to say that Vasantrao Naik's foresight was the reason behind the progress that has been made in the field of agriculture in Maharashtra at present.  He was a bone farmer.  ‘Agriculture and Farmers’ is their intimacy.  Remained the subject of study.  He made constant efforts to modernize agriculture.  Established ‘Agricultural Universities’ in the state.  Overcame food-grain drought by providing hybrid seeds to farmers.  He accepted the crisis of 1972 as a challenge and showed a sustainable way of overcoming the drought.

During the tenure of the late Vasantrao Naik, four agricultural universities were started in Maharashtra.  Through these agricultural universities, modern technology in agriculture reached the farmers.

 There are a number of modern courses available to help farmers get a better market for their hard-earned agricultural produce.  Young people need to pay attention to this.  Here you don’t have to put your hands directly into the soil;  However, with your help, it is certain that this sector can be revived. You are reading the post of Information Service Group Pethwadgaon.  This higher education does not have to be a two or three year degree.  Some short-term courses are also available.  Marketing is the foundation of any business.  If you can't sell what you make, then the price of any good product is zero.  The same principle applies to agriculture.  Therefore, in addition to product and quality, it is also important to take good guidance in management, marketing, and sales.

 Agriculture can be made more profitable if it is seen as an industry.  It is important for the youth to share this mantra of agriculture with each other.  There is both need and scope for new ideas in this area.  Knowledgeable skilled people are also needed to sell agricultural produce.

 It is true that our forefathers used to cultivate in a traditional way and India has prospered over the years.  Even though the agricultural sector is suffering, it is our need in the end and only we can bring new reforms in this sector and give a new impetus to this sector.  It requires a little ingenuity.

 ____________________________

गुरुवार, जून ०३, २०२१

जागतिक सायकल दिन

जागतिक सायकल दिन

 

  जागतिक सायकल दिन  

               
❍ 🚲दिनांक - ०३.०६.२०२१. ❍

फेसबुक लिंक http://bit.ly/3pdzHaI
शारीरिक शक्तीने चालविले जाणारे दोन चाकी वाहन म्हणजे सायकल.अनेक ठिकाणी हे वाहतुकीचे, व्यायामाचे आणि खेळाचे मुख्य व स्वस्त साधन आहे.
याच सायकलची महत्त्व ओळखून युनायटेड नेशन्सने पुढाकार घेत ‘जागतिक बायसिकल दिन’ साजरा करण्याचे ठरवले, आणि 3 जून हा दिवस जागतिक बायसिकल दिन म्हणून साजरा करू लागले. हा दिवस साजरा करण्याचे २०१८ मध्ये युनायटेड नेशन्सने नक्की केले, आणि ३ जून हा जागतिक बायसिकल दिन म्हणून ओळखला जातो.पहिली सायकल १८१६ मध्ये पेरीस मधील एका कारागीरणे केली.  गरिबांचे वाहन अशी ओळख सायकलला आहे.
जागतिक सायकल दिन,World Cycle Day


सायकल हा शब्द जरी उच्चारला तरी अनेक जण त्यांच्या सुरेख भूतकाळात जातात आणि त्यांच्या त्या जुन्या सायकलवरून गावाची भ्रमंती करूनच परततात. आज पन्नाशीच्या आसपास असणाऱ्या लोकांसाठी तर त्यांच्या तरुणपणी सायकल असणे ही गोष्टच मोठी आनंददायी असायची. काळाच्या ओघात प्रवास लांबला आणि सुबत्ता वाढू लागली तशी प्रत्येक घरची सायकल अडगळीत जाऊ लागली आणि दुचाकी, चारचाकी तिच्यापुढे मिरवू लागल्या.जगण्याचा वेग वाढला, वेळ कमी पडायला लागला, हातात पैसा आला, मोठ्या वाहनांची गर्दी वाढल्यामुळे रस्त्यावरची सुरक्षितता कमी झाली, सायकल चालवणारा जास्तीतजास्त काळ रस्त्यावर वावरत असल्यामुळे त्याच्या वाट्याला हवेतलं प्रदूषण जास्त येतं तर ते टाळणं अशा कारणांमुळे मधल्या काळात इतर दुचाकींचं प्रमाण वाढलं. पण आता पुन्हा एकदा सायकलला प्रतिष्ठा यायला लागली आहे. याचा अर्थ आपल्याकडे लगेच सगळेजण इतर दुचाकी वाहनं बाजूला ठेवून सायकली चालवायला घेतील असं नाही. ते शक्यही नाही, पण आवडीने सायकलं विकत घेणं, जवळची आणि सुरक्षित अंतरं सायकलवरून पार करणं, सायकल मोहिमा आखणं अशा गोष्टी लोक पुन्हा करायला लागले आहेत, हेही नसे थोडके.
सायकलवर उपजीविका असणाऱ्या लोकांचे प्रमाणही आज लक्षणीय आहे. फेरीवाले, भाजीवाले, वर्तमानपत्र विक्रेते, फुलविक्रते,फुगेवाले, इलेक्ट्रिक वस्तूंची दुरुस्ती करून देणारे हे सर्व लोक आजही उपजीविकेसाठी सायकलवरच शहराच्या विविध भागांत फिरतात. याशिवाय कामगार मंडळीही आज त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी जाण्यासाठी सायकलचाच वापर करतात.
सायकल हे प्रदूषण टाळण्यासाठी सर्वोत्तम असणारे वाहन आहे. सायकलस्वाराचे आरोग्य तर सायकल सांभाळतेच; पण पर्यावरणाचे आरोग्यही उत्तमपणे सांभाळते. त्यामुळे प्रत्येक शहरात सायकलस्वारांचे प्रमाण वाढणे, शहराच्या आरोग्याच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाचे आहे.तिला विकासाचे व आरोग्याचे प्रतिक बनवुया.   

               ✺ 𝑾𝒉𝒂𝒕𝒔𝒂𝒑𝒑  9890875498 ✺
                  ❍ माहिती सेवा ग्रूप ❍
❍ पेठवडगांव,जि. कोल्हापुर ❍
-------------------------------------------

 World Cycle Day


  Date - 03.06.2021. ❍
__________________________

Bicycles are two wheelers driven by physical strength. In many places it is the main and cheapest means of transportation, exercise and sports.
Recognizing the importance of this bicycle, the United Nations took the initiative to celebrate World Bicycle Day, and June 3 became World Bicycle Day. This day was decided by the United Nations in 2018, and June 3 is known as World Bicycle Day. The bicycle is known as the vehicle of the poor.

Even if the word bicycle is uttered, many people go back to their beautiful past and return after wandering around the village on their old bicycles. For people in their fifties today, having a bicycle in their youth was a great pleasure. In the course of time, as the journey became longer and better, the bicycle of every household became more and more difficult and two-wheelers and four-wheelers started moving in front of it. The number of other two-wheelers has increased in the mean time due to reduced safety, cyclists spending more time on the road and more air pollution. But now, once again, the bicycle is gaining prestige. This does not mean that everyone will immediately put aside other two-wheelers and start cycling. It's not even possible, but people are starting to do things like buying bicycles with pleasure, crossing the nearest and safest distances by bicycle, planning a bicycle expedition.
The number of people making a living on bicycles is also significant today. Street vendors, vegetable sellers, newspaper vendors, florists, balloonists, electrician repairmen, all of these people still cycle to different parts of the city for their livelihood. In addition, workers today use bicycles to get to work.
The bicycle is the best vehicle to prevent pollution. The health of the cyclist is taken care of by the bicycle; But it also manages the health of the environment very well. Therefore, increasing the number of cyclists in every city is also very important for the health of the city. Let's make it a symbol of development and health.
               𝑾𝒉𝒂𝒕𝒔𝒂𝒑𝒑 𝑾𝒉𝒂𝒕𝒔𝒂𝒑𝒑 9890875498
                  ❍ MAhiti seva Group
Pethwadgaon, Dist. Kolhapur
-------------------------------------------

मंगळवार, मे ११, २०२१

मराठी शाळा वाचली पाहिजे

मराठी शाळा वाचली पाहिजे

 मराठी शाळा वाचली पाहिजे  


.            दि. ११ मे २०२१

फेसबुक लिंक http://bit.ly/3uC7VH5
मराठी भाषिकात आतापर्यंत जे डॉक्टर,इंजिनिअर,जिल्हाधिकारी,आयपीएस आधिकारी झाले त्यांचे प्राथमिक शिक्षण हे मराठी शाळेत झाले होते.हे आपण विसरून गेलो आहोत.मराठी भाषिकांमध्ये विविध कारणांनी मुलांना इंग्रजी भाषेत शिकवण्याची प्रथा रूढ झाली आहे.स्पर्धेचे युग, मराठी शाळेत शिकून पुढे काही भविष्य नाही, इंग्रजीशिवाय पुढे जाता येणार नाही; अशी वेगवेगळी कारणं सागून आपण आपल्या मुलांना इंग्रजी शाळांमध्ये घालतो. याचा परिणाम म्हणून मराठी शाळा बंद पडण्याच्या मार्गावर येऊ लागल्या आहेत. यावर कढी म्हणून आता बरेच जण असाही प्रश्न विचारू लागले आहेत की, ‘मराठी शाळांचा दर्जा घसरला आहे, मुलांना तिथे चांगली संगत मिळत नाही, शिक्षक चांगले नसतात वगैरे वगैरे…’ क्षणीक मराठी शाळांवरील हे आरोप मान्य करू, पण जर मराठी शाळांची ही स्थिती आली असेल तर याला जबाबदार कोण? यावरही आपल्यापैकी बरेच जण सरकार व राजकारण्यांवर याची जबाबदारी टाकून मोकळे होतात.   

मराठी शाळा वाचली पाहिजे
         

मराठी भाषा दिनी एकमेकांना शुभेच्छा देऊन (त्याहीतोडक्या-मोडक्या मराठीत) मराठी भाषा टिकणार किंवा वाढणार नाही. मराठी भाषेला म्हणजेच पर्यायाने मराठी जनतेला चांगले दिवस यायचे असतील, तर मराठी शाळा टिकल्या पाहिजेत. त्यात वाढ झाली पाहिजे. त्यांचा विकास झाला पाहिजे आणि याध्येयाने संपूर्ण मराठी जनांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे. मराठी शाळा टिकवण्यसाठी व्यापक चळवळ उभी करणं गरजेचं आहे. संयुक्त महाराष्ट्रासाठी रक्त सांडलेल्या महाराष्ट्राने मराठीशाळा टिकण्यासाठी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीपेक्षा मोठी चळवळ उभी करण्याची आज नितांतआवश्यकता आहे.
▪.प्रत्येक मुलाला मातृभाषेतून शिक्षण देणे गरजेचे आहे, कारण प्राथमिक व माध्यमिक शिक्षणासाठी मातृभाषेतून शिक्षण हीच शास्त्रशुद्ध पद्धत आहे.
▪.मराठी शाळांचा दर्जा खालावला आहे अशी नुसती ओरड करून चालणार नाही, तर त्यामागील कारणांचाही मागोवा घ्यावा लागेल.गेल्यापंधरा वर्षांत शासकीय धोरणे ही मराठी शाळांची गळचेपी करून इंग्रजी शाळांचं चांगभलं करताना दिसत आहेत.

मराठी शाळांचे संस्थाचालक व शिक्षण यांच्यापुढे शाळा चालवणं हेच मोठं आव्हान आहे. या सगळ्यामध्ये शाळांचा आर्थिकडोलारा सांभाळणे ही सहज साध्य गोष्ट नाही. या आव्हानासमोर माना झुकवून बर्याच हिंदी व गुजराती शाळाबंद पडल्या किंवा इंग्रजी झाल्या. तरीही बर्याच मराठी शाळा या आव्हानाला धाडसाने सामोर्या जात आहेत. विविध कल्पक उपक्रम राबवून शाळेचा आर्थिक गाडा हाकत आहेत. समाज म्हणून आपल्याला संस्थाचालकव शिक्षक वर्गासोबत उभं राहणं गरजेचं आहे.
मराठी शाळा या सरकारी अनुदानावर चालत असल्यामुळे त्यांना विविध सरकारी नियमांचं काटेकोर पालन करावं लागत.या उलट मोठमोठ्या इंग्रजी शाळा या वर्षाला कैक लाखांमध्ये मुलांकडून पैसे घेऊन शाळा चालवतात. शिक्षक भरती, शिक्षकांचे पगार ठरवणे, शिक्षकेतर कर्मचार्यांच्या भरती व पगार आदी सर्व विषय हे त्या त्या शाळांच्या हातात असतात. या उलट मराठी शाळा स्वेच्छेने एका शिपायाचीसुद्धा भरती करू शकत नाहीत. सरकारी नियमांनुसार असल्यामुळे संस्थाचालक व वरीष्ठ शिक्षकांना दर्जेदार नवीन शिक्षकांची निवड करता येत नाही. अनेक नवीन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तर अनुकंपा तत्त्वावर शाळेत नोकरी म्हणून रूजू झालेले असतात.आपण माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव ची पोस्ट वाचत आहात, शिक्षक या पेशाकडे समाजाचे कमालीचे दुर्लक्ष झालेले आहे. उपहासाने असंही म्हटलं जातं की ज्याला काहीचकरता येत नाही तो शिक्षक होतो.
या स्थितीत आमुलाग्र बदल होण्याची गरज आहे.B.Ed.आणिDip. Ed.करणार्यांमध्ये सुद्धा इंग्रजीतून ते शिक्षण पूर्ण करणार्यांची संख्या जास्त आहे. हे चित्र बदलून उत्तमोत्तम मराठी शिक्षक घडण्याची गरज आहे.अन्य राज्यांमध्ये विशेषत: दक्षिणेकडील राज्यांमध्ये प्रादेशिक भाषेला खूप महत्त्व आहे.त्यांच्याकडून हा गुण घेऊन आपणही शिक्षणाच्या बाबतीत मराठीसाठी आग्रही प्रसंगी दुराग्रही होण्याची आवश्यकता आहे.तरच मराठी वाचेल!
____________________________
ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498☜♡☞
💚 माहिती सेवा ग्रूप, पेठवडगाव  💜     
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
.            _ጦඹիiᎢi

शनिवार, मे ०१, २०२१

१ मे महाराष्ट्र दिन

१ मे महाराष्ट्र दिन

१ मे महाराष्ट्र दिन  


𖣘 दि.१ मे २०२१

फेसबुक लिंक http://bit.ly/3vyutbH
    'मंगल देशा, पवित्र देशा.... प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा' असं म्हणत आज बुधवारी म्हणजेच १ मे या दिवशी सर्वत्र महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देण्यात येत आहेत. १ मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिवस म्हणूनही साजरा करण्यात येतो. अशा याच दिवशी महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिवसही साजरा केला जातो.


१९५६ च्या States Re-organisation Act नुसार भारतातील राज्यांच्या सीमा या भाषेच्या आधारे निर्धारित करण्यात आल्या होत्या. ज्यानंतर संयुक्त महाराष्ट्र समितीकडून मुंबईसह वेगळ्या महाराष्ट्राची मागणी करण्यात आली. ज्यामध्ये मराठी, कोकणी भाषिकांचा समावेश असेल. तर, गुजराती आणि कच्छी भाषिक जनतेसाठी वेगळ्या राज्चयाची मागणी करण्यात आली. याच मागण्या आणि आंदगोलनांच्या बळावर अखेर १ मे १९६० मध्ये मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. म्हणूनच महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो.

१ मे महाराष्ट्र दिन
महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या १०६ हुतात्म्यांचे स्मरण या दिवशी केले जाते २१ नोव्हेंबर इ.स.१९५६ च्या तारखेची ती संध्याकाळ होती. सकाळपासून फ्लोरा फाउंटनच्या परिसरात तणावाचं वातावरण होतं. राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्यास नकार दिला होता. या निर्णयाचा सर्वच स्तरांतून आणि अनेक लहानमोठ्या सभांमधून जळजळीत निषेध करण्यात येत होता. याचा संघटित परिणाम म्हणून कामगारांचा एक विशाल मोर्चा, तेव्हाच्या विवेकशून्य सरकारचा निषेध करण्यासाठी फ्लोरा फाऊंटनासमोरील चौकात येणार होता.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट दुपारनंतर, म्हणजेच मुंबईतल्या शंभर- सव्वाशे कापडगिरण्यांमधील, कामगारांची चारची कामाची पहिली पाळी संपल्यानंतर गिरणगावातून मोर्चे निघाले. फोर्ट भागात जमाव आणि सभाबंदी जारी करण्यात आली होती. कार्यालयांतील महिला कर्मचाऱ्यांना घरी पाठवण्यात आलं होतं. पण, जमावबंदीला झुगारून मुंबईकर फ्लोरा फाउंटनाच्या चौकात सत्याग्रहासाठी ठाण मांडून बसले होते. त्यांना उधळून लावण्यासाठी लाठीमारही करण्यात आला. पण, तरीही ते चौकातून हटत नव्हते अखेर पोलिसांना त्यांच्यावर गोळीबाराचा आदेश देण्यात आला. मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांचे “दिसताक्षणी गोळ्या” घालण्याचे पोलिसांना आदेश होते. परिणामी शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या निदर्शकांच्या रक्ताच्या चिळकांड्या रस्त्यावर उडू लागल्या. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात जानेवारी १९५७ पर्यंत जे १०६ आंदोलक हुतात्मे झाले, त्या मालिकेची ही सुरुवात होती. या सर्व हुतात्म्यांच्या बलिदानापुढे आणि मराठी माणसाच्या आंदोलनामुळे सरकारला नमतं घेत १ मे १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना करावी लागली.म्हणुन आपण १ मे महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतो.
" महाराष्ट्रा"बाबत माहिती
______________________

👉 स्थापना-01 मे 1960
👉 राज्यभाषा - मराठी
👉 एकूण तालुके-353
👉 पंचायत समित्या 351
👉 एकूण जिल्हा परिषद-33
👉 आमदार विधानसभा 288
👉 आमदार विधानपरीषद 78
👉 महाराष्ट्र लोकसभा सदस्य 48
👉 सुमद्रकिनारा-720 किमी
👉 नगरपालिका- 230
👉 महानगरपालिका-26
👉 शहरी भाग - 45%
👉 ग्रामीण भाग 55%
👉 लोकसंख्या बाबतीत 2 रा क्रमांक
👉 क्षेत्रफळात 3 रा क्रमांक
👉 संपुर्ण साक्षर 1ला जिल्हा सिंधुदुर्ग
👉 सर्वात कमी साक्षर जिल्हा नंदूरबार
👉 महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या - मुंबई उपनगर
👉 महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या जिल्हा - नंदूरबार
👉 महाराष्ट्रातील सर्वाधिक जंगले असलेला जिल्हा - गडचिरोली
👉 महाराष्ट्रातील कमी जंगल असेलला जिल्हा - बीड
👉 महाराष्ट्रातील सर्वाधिक आदिवासी असलेला जिल्हा - नंदूरबार
👉 महाराष्ट्रातील अधिक तलावांचा जिल्हा - गोंदिया
👉 महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा - अहमदनगर
👉 महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा - मुंबई शहर
👉 महाराष्ट्रातील उंच शिखर -कळसूबाई(1646मी) कल्याण जवळ
👉 महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी - गोदावरी
👉 महाराष्ट्रातील सर्वात लहान राष्ट्रीय महामार्ग - न्हावाशेवा पळस्पे 27 किमी
👉 महाराष्ट्रातील सर्वात जुनी नगरपालिका - रहिमतपूर ( सांगली )
👉 पहिले मातीचे धरण गोदावरी - (गंगापूर) नदीवर
👉 महाराष्ट्रात सर्वात जास्त समुद्र किनारा - मुंबई
👉 जगातील पहिले जैव तंत्रज्ञान विद्यापीठ - नागपूर
👉 भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर मुंबई

!! मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा !!
____________________________
WᕼᗩTᔕAᑭᑭ  9890875498 ☜♡☞
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
______________________________