Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गडचिरोली लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
गडचिरोली लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, जुलै ३१, २०२२

Large Refinery Petrochemical Complex near Umred or Butibori

Large Refinery Petrochemical Complex near Umred or Butibori

SUNDAY SPECIAL*

*AZADI KA AMRIT MAHOTSAV IN VIDARBHA*

*DISTRICT WISE POTENTIAL IN VIDARBHA*




1) *NAGPUR* PART ONE

*Large Refinery Petrochemical Complex near Umred or Butibori*
LOGIC -- A)All four directions of country having Refineries but Central India Since decades kept dry.

B)Delhi not on coast but having 3 Refineries nearby so logic that Refineries need coast not true .

C)Nagpur and 400km radius having bulk consumption of Petroleum Products.15MMTPA demand assured growing steadily.

D)Cooking Gas LPG reaching from ports to bottling plants at Butibori by trucks. Huge recurring costs may be zero with RPC near Nagpur. India second largest LPG importing country.LPG is refinery product.

E)Mumbai Nagpur Expressway almost ready for Crude Pipelines. Present Rail Road cost from Refinery to Petrolpump everage Rs6/-litre will come down to Rs1.50

F)Best National Highways network will be used to distribute liquid Fuel by pipelines.Faster,Cheaper delivery with lowest inventory levels at RPC.

G)10 Airports here to connect with ATF pipelines. Best,Secured,lowest cost will help Aviation Sector. Most of large Metro City Airports connected by ATF pipelines from Refinery.

H)First Refinery in country near coal.With Coal nearby power cost to refinery will come down substantially. Same way with Coal&Refinery combination many new generation Fuels like Ethanol,Methanol, DME to further cut imports bills.

I)Only location in country where such bulk consumers nearby to RPC. 30Cement plants,13Steel Plants,500MMTPA mining of different minerals.

J)Nagpur Central Location Zero mile of the country.Whole Cross Country traffic passing through Nagpur. With Rs1-1.50Litre cheap diesel petrol maximum filling from Nagpur. Huge boost to VAT income of Maharashtra.

K)Single largest Petrochemicals Consuming plant IndoRama here making Polyester. 10Lac MT PTA MEG used .Cotton&Local Polyester with RPC support vidarbha will be able to convert entire Cotton into Textiles. Huge potential. Boost for farm income.

L)RPC highly power consuming industry.local Coal can help to cut costs.Coastal Refineries using Gas or Imported Coal for power generation.To minimise pollution FGD installation from day one.

M)Water also key input for RPC available from different dams where industrial power still unutilised. Huge value unlocking for state as earning by water will start immediately.

N)Coastal area Refineries using SeaWater making sweet water by desalination process again highly power consuming.Here sweet water availability through DAMs,NMC,Own reservoirs give lots of comfort.

O)Many value added products made by different types of inputs coming from RPC.These types of inputs support huge Ancillaries nearby again cutting costs with opening up many opportunities.

P)Nagpur only Location for RPC where best infrastructure readily available for such large projects. No capital costs needed to invest in infrastructure. Will help faster implementation. Again costs savings.

Q)With 60MMTPA RPC 10 lac direct indirect jobs possible in the region for what region suffering since decades. Must be brought ASAP.

R)FINAL ABSTRACT
NET SAVINGS RS 30000CR TOWARDS LOGISTICS, CAPITAL COST,LOWER IMPLEMENTATION TIME AND IMPORTS OF MANY ITEMS WILL REDUCE SUBSTANTIALLY


*NAGPUR PART TWO*

REFINERY PETROCHEMICALS COMPLEX PART TWO

LOGIC -- S)This Large RPC will help huge value unlocking for state like MSRDC the owner of Mumbai Nagpur Expressway will earn huge money by ROW charges for CrudePipelines and manifold increased Toll collection due to increased industrial production.

T)Electricity Rates may come down due to less T&D charges because maximum power generated here will be consumed here itself.No long distance transmission. GreenEnergy projects in WesternMaharashtra also help us to cut prices. Vidarbha Resources For Vidarbha. HUGE savings.

U)With Large RPC huge construction activities will ensure maximum FlyAsh consumption nearby.Helping to cut pollution&costs.Sameway other building materials will attract thousands of Crs Royalties to state Govt.Huge money fr Rural Vibrant economy.

V)Agriculture alone can't take load of such large vidarbha population. Large number of workers must shift to industry. Better salaries with EPF,ESIC,Insurance like social benefits.Families with fixed income always strong what we don't have today.

W)Vidarbha Consumption of many Refineries related products coming by imports.With port formalities,storage,handling approx 100$PMT cost can be saved towards Bitumen,Sulphur,Polymers,Fertilisers and many.With RPC in VIDARBHA zero imports of Vidarbha requirements. Huge savings of Forex.

X)MIHAN, BUTIBORI AND OTHER MIDC AREAS IN VIDARBHA having land bank of around 6-7000Acres.Complete value unlocking for state where thousands of Cr land get sold to top corporate investors willing to invest near RPC.Domestic in MIDC and Export potential in MIHAN.

Y)LIT,IIM,IIIT,VNIT,RKNEC like top colleges ensure flow of talent to such big complex where each and every Engineering stream students will get opportunities for training as well as jobs. Also huge potential for new generation Entrepreneurs.

Z)Such large projects directly indirectly helps many sectors like Hotels,Restaurants,Tours&Travels,RealEstate,Banking&Finance and many more.Many large NPA will get resolved and Sick Closed units can restart. Huge unlocking of dead capital.

ABSTRACT Such projects comes through strong political will only but convincing power to decision makers and investors play important role. So far Vidarbha leaders not able to attract investments but Best Possible TaskForce must be created nothing impossible.





*NAGPUR PART THREE*

PLAN 1)
COMPLETE HAND OVER OF MIHAN TO TATA LIKE GROUP TO ENSURE MAXIMUM BENEFITS FOR YOUTH

LOGIC - MIHAN with its lots of Strengths lying underutilized,unsold since last two decades.Best location,infrastructure,connectivity must be utilised to its best possible extent.TATAGROUP most suitable as

A)AVIATION TATAGROUP Presently having 3 Airlines AirIndia,Vistara, AirAsia running where they need different types of latest technology services like MROs,Training Centers,Spareparts Warehousing,BackOffice work etc MIHAN most suitable for this.

B)TATAs with these Airlines may be larget AirCrafts owning group may attract Boeing&AirBus both companies to have base in MIHAN.Gradually they can develop Vendors locally.Great opportunity for new generation Entrepreneurs.

C)TCS the world's leading software company belongs to TATAs having one center at MIHAN already.They have big plans for growth.TATAs can expand their TCS operations manifold here opening opportunities for thousands of fresh graduate engineers. 

D)DATA CENTERS As Data Protection Bill is coming in force Demand for Data Centers growing.With Own Super App and lots of business back up needs TATAs can invest in MIHAN.Again opportunities for Nagpur Youth.

E)CONTAINERS manufacturing at MIHAN for TATASTEEL best business where entire RawMaterials made by TATA Steel only.Huge Demand as well as Shortages going on.These containers can be given to Shipping lines as sale or lease after certification by Internationally Approved Agency. 

F)TATAs entered into Retail Business after acquiring BigBasket can built best Warehousing,Logistics and Distribution network here in MIHAN where according to requirements many local Vendors can get registered. Huge Opportunity 

G)With MIHAN like location and TATA Group agressive plans a large 5 Star Hotel with best amenities must. With strong TAJ Brand TATAs in Hotel Business. Again best Synergies there. 

H)TANISHQ Tatas Jwellery Brand very famous can start its large manufacturing unit in MIHAN where SEZ benefits can establish best visibility. Training can make the manpower perfect. 

I)Many such opportunities there for other TATA group companies by supporting each other, We must ensure 100%Occupancy for MIHAN by all out efforts. TATAS the Mumbai based Business Conglomerate will always be helpful if Nitin Gadkari and Devendra Fadnavis Sir invite them with workable proposals. 


**AZADI KA AMRIT MAHOTSAV*

*DISTRICT WISE POTENTIAL IN VIDARBHA*

1) *NAGPUR PART FOUR* 

*VIBRANT ECONOMY OF VIDARBHA* 
 
LOGIC- A)With Large RPC in VIDARBHA and Complete Acquisition of MIHAN may help all sectors to grow rapidly with huge inflow by salaries&services in local economy.This will boost buying power through more disposable income in all income groups. 

B)Many State Govt depts like MIDC,VIDC,MSRDC,Collectorates of nearby districts will become more profitable may run without budgetary support from State Govt.State govt must try all out for both the projects whole heartedly to ensure maximum youth engagement.

C)More Projects,MSMEs,RealEstate,Hotels,Tours&Travel,Training Centers,Services,Outsourcing of businesses will attract many top industry houses from all over the world to Nagpur. Again Big Opportunity for Nagpur Youth and existing businesses. 

D)We all know Govt jobs for masses not possible as we have to ensure Lakhs of skilled and Unskilled workers get absorbed in above projects. Socially and Politically these efforts can help to fulfill 3 decades jobs and financial backlogs.Finally justice to VIDARBHAS innocent people.

Strong political will must for such types of initiatives. This time we hope Devendra Fadnavis Sir and Nitin Gadkari Sir do their best to attract these projects. 


Pradeep Maheshwari 
Strategist Natural Resources Nagpur

Pradeep Maheshwari

आझादी का अमृत महोत्सव
विदर्भाची जिल्हानिहाय क्षमता

१) नागपूर - भाग १

उमरेड किंवा बुटीबोरीजवळ मोठे रिफायनरी पेट्रोकेमिकल प्रकल्प

कारण - अ) देशाच्या चारही दिशांना रिफायनरी आहेत पण मध्य भारताला अनेक दशकांपासून कोरडेच ठेवले आहे.

 ब) दिल्ली समुद्र किनार्‍यावर नाही पण आसपास ३ रिफायनरी आहेत म्हणून रिफायनरीसाठी समुद्रकाठ 
                 असणे आवश्यक आहे हा तर्क खरा नाही. 

 क) नागपूर व ४०० किमी.च्या त्रिज्येत मोठ्या प्रमाणावर पेट्रोकेमिकल उत्पादनांचा वापर आहे. १५ 
                 एमएमटीपीएची खात्रीची मागणी हळूहळून वाढते आहे.

 ड) स्वयंपाकाचा गॅस एलपीजी तळांवरून बुटीबोरीमधील बॉटलिंग प्रकल्पात ट्रकने पोहचतो. नागपूरजवळ 
                 आरपीसी आले तर मोठ्या प्रमाणावर होणारा आवर्ती खर्च शून्यावर येईल.
 
 इ) मुंबई-नागपूर एक्सप्रेस वे क्रुड पाइपलाईन्ससाठी जवळपास तयार आहे. सध्याचा रिफायनरी ते 
                 पेट्रोलपंप हा रेल्वे व रस्ते वाहतुक खर्च सरासरी रु.६/लिटर आहे तो कमी होऊन १.५० रुपयांपर्यंत 
                 येईल. 

 फ) उत्तम राष्ट्रीय महामार्गांचे जाळे द्रव इंधन पाइपलाईन्सने वितरित करण्यासाठी वापरले जाईल. 
                 आरपीसीला सगळ्यात कमी इन्व्हेंटरी पातळीसह जलद आणि किफायतशीर वितरण.

 ग) एटीएफ पाइपलाईन्ससोबत जोडण्यासाठी इथे १० विमानतळं आहेत. उत्तम, सुरक्षित, किमान खर्च 
                 यामुळे विमानचालन क्षेत्राला मदत होईल. बहुतांश महानगरांतील विमानतळ रिफायनरीपासून एटीएफ 
                 पाइपलाइन्सनी जोडलेली आहेत.

 ह) देशातील पहिली रिफायनरी कोळसा खाणीजवळ. रिफायनरीजवळ कोळसा असेल तर वीजेचा खर्च 
                 मोठ्या प्रमाणावर कमी होईल. अशाच कोळसा आणि रिफायनरी संयोजनाप्रमाणे, इथॅनॉल, मिथॅनॉल, 
                 डीएमई यासारखी नवीन पिढीतील अनेक इंधनांमुळे आयातीवरील खर्च आणखी कमी होईल.

 ई) आरपीसीजवळ मोठ्या प्रमाणाव्र ग्राहक असणारे देशातील एकमेव स्थळ. ३० सिमेंट प्रकल्प, १३ स्टील 
                 प्रकल्प, विविध खनिजांचे ५०० एमएमटीपीए खाणकाम.

 ज) नागपूर हे मध्यवर्ती ठिकाण आहे, देशातील झिरो माईल बिंदू. संपूर्ण देशातील वाहतुक नागपूरमधून 
                 मार्गस्थ होते. रु. १-१.५० लिटरने डिझेल, पेट्रोल स्वस्त झाल्यास कमाल भरणा नागपूरमधून होईल. 
                 महाराष्ट्राच्या व्हॅट उत्पन्नाला मोठी चालना मिळेल. 

 क) पेट्रोकेमिकल्सचा वापर करणारा एकमेव मोठा प्रकल्प इंडोरामा इथे पॉलियेस्टरची निर्मिती करतो. १० 
                 लाख एमटीपीटीए एमईजीचा वापर होतो. आरपीसीच्या पाठिंब्यासह कापूस आणि स्थानिक पॉलियेस्टर 
                 वापरून विदर्भ संपूर्ण कापसाचे कापडात रुपांतर करू शकतो. प्रचंड क्षमता. शेतीच्या उत्पन्नाला 
                 चालना.

 ल) आरपीसी मोठ्या प्रमाणावर वीजेचा वापर करणारा उद्योग आहे. कोळसा खर्च कमी करणयस मदतीचा 
                 ठरू शकतो. समुद्रकिनार्‍यावरील रिफायनरी विद्युत निर्मितीसाठी गॅस किंवा आयात केलेला कोळसा 
                 वापरतात. प्रदूषण कमी करण्यासाठी पहिल्या दिवसापासून एफजीडी बसवता येईल.
 
 म) आरपीसीसाठी मुख्य इनपुट असलेले पाणीदेखील विविध धरणांमधून उपलब्ध आहे जेथे औद्योगिक 
                 वीज अद्याप वापरात नाही. पाण्याद्वारे कमाई म्हणून राज्यासाठी प्रचंड मूल्य उपलब्ध होणे त्वरित 
                 सुरू होईल.

 न) समुद्राच्या पाण्याचा वापर करणार्‍या किनारी भागातील रिफायनरीज डिसेलिनेशन (पाण्यातून क्षार 
                 काढणे) प्रक्रियेद्वारे गोड पाणी तयार करतात ज्याला पुन्हा जास्त वीज लागते. येथे धरण, एनएमसी, 
                 स्वतःच्या जलाशयांद्वारे गोड पाण्याची उपलब्धता भरपूर सोयीची होते. 

 ओ) आरपीसीमधून येणार्‍या विविध प्रकारच्या इनपुट्सद्वारे बनवलेली अनेक मूल्यवर्धित उत्पादने. या                  
                  प्रकारच्या इनपुट्समुळे जवळपासच्या मोठ्या अनुषंगिक एककांना (अँसिलरी मदत होते आणि अनेक 
                  संधी उपलब्ध होऊन पुन्हा खर्च कमी होतो.

 प) आरपीसीसाठी फक्त नागपूर हे ठिकाण जेथे अशा मोठ्या प्रकल्पांसाठी सर्वोत्तम पायाभूत सुविधा सहज 
                 उपलब्ध आहेत. पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी भांडवली खर्चाची गरज नाही. जलद 
                 अंमलबजावणी होण्यास मदत होईल. पुन्हा खर्चावर बचत.

 र) ६० एमएमटीपीए आरपीसीमुळे अनेक दशकांपासून ज्यासाठी हा प्रदेश त्रस्त होता त्या १० लाख प्रत्यक्ष 
                 अप्रत्यक्ष नोकऱ्या या प्रदेशात शक्य आहेत. ते लवकरात लवकर आणले पाहिजे.

 ल) अंतिम गोषवारा
                 लॉजिस्टिक्सवर निव्वळ बचत ३०००० कोटी. भांडवली खर्च, अंमलबजावणीसाठी लागणारा कमी वेळ 
                 आणि अनेक वस्तूंची आयात लक्षणीय प्रमाणात कमी होईल. 


  प्रदीप महेश्वरी
तज्ज्ञ, नैसर्गिक संसाधने

शनिवार, जुलै ३०, २०२२

आझादी का अमृत महोत्सव |  विदर्भातील जिल्हानिहाय क्षमता | Azadi Ka Amrit Mahotsav | Potential Investors in VIDARBHA

आझादी का अमृत महोत्सव | विदर्भातील जिल्हानिहाय क्षमता | Azadi Ka Amrit Mahotsav | Potential Investors in VIDARBHA

Azadi Ka Amrit Mahotsav | Potential Investors in VIDARBHA


1)Large Integrated SteelPlant 4-5MMTPA JSW Group,JSPL,Arcelor Mittal TATA Steel,

2)Complete Acquisition of MIHAN Land for Containers Making,DataCenters,MROs,5STAR hotel,Defense  TATA Group 

3)Country's largest FerroAlloys Cluster at Bhandara by TATA GROUP, JSWGROUP and MOIL 

4)Largest Private Freight Terminal to handle Road,Rail and Air Logistics. Private and Railways as PPP model

5)Country's Largest Commondo Training Institute by Ministry of Home affairs and Defense 

All these proposals having strong viability and logic for investors to explain

*Most of Mumbai Based Group if UP CM can attract them Our DCM can attract for sure only honest efforts must*
------------------------------


 1) GADCHIROLILarge Integrated Steel Plant 4-5MMTPA capacity
 
LOGIC- Best quality IronOre,LimeStone,Coal

Country's Largest Commondo Training Institute. 

LOGIC - Best location with Mountains,Rivers,Insurgency ,3StateBorders. 

१) गडचिरोली - मोठा एकात्मिक स्टील प्रकल्प ४-५ एमएमटीपीए क्षमता
​कारण - उत्तम दर्जाचे लोहखनिज, चुनखडी, कोळसा
  देशातील सगळ्यात मोठी कमांडो प्रशिक्षण संस्था
​कारण - पर्वत, नद्या, बंडखोरी आणि ३ राज्यांच्या सीमांसह सर्वोत्तम स्थान
------------------------------


2) BHANDARA |  Country's Largest Auto Component Park 

LOGIC- A)Best quality Long,Flat,alloy steel,Manpower,nearby

B)All 3 leading Automobile Manufacturing hubs Delhi,Pune,Chennai on equal distance. 50%OEM,20%Replacement 20%Exports through Best export infrastructure created

Country's Largest FerroAlloys Manufacturing Cluster 

LOGIC- Country's largest Manganese Ore producer Navratna PSU MOIL having mines in Bhandara,All other major inputs with electricity nearby 

12MMTPA SteelPlants in Maharashtra as FerroAlloys consumers ensure 3-4Times more revenues to state.Huge savings with Exports demands also. 
 
२) भंडारा - देशातील सगळ्यात मोठा ऑटो कॉम्पोनंट पार्क
​कारण - अ) उत्तम दर्जाचे लांब, सपाट मिश्रधातू स्टील, जवळच उपलब्ध मनुष्यबळ
​​ ब) दिल्ली, पुणे चेन्नई ही तिन्ही अग्रगण्य ऑटोमोबाईल उत्पादन केंद्रे समान अंतरावर. ​​ निर्माण केलेल्या सर्वोत्तम पायाभूत निर्यात सुविधांद्वारे ५०% ओईएम, २०% बदली, २०% निर्यात | देशातील सगळ्यात मोठे फेरो-अलॉय उत्पादन क्लस्टर
      कारण - देशातील सगळ्यात मोठे मँगनीज खनिज उत्पादक नवरत्न पीएसयू मॉइलच्या भंडार्‍यात खाणी. वीजेसह  
              सगळे महत्त्वाचे इनपुट्स (आवश्यक सामग्री) जवळ उपलब्ध
              महाराष्ट्रात १२ एमएमटीपीए स्टील प्रकल्प कारण फेरो-अलॉय ग्राहक राज्याला ३-४पट महसूलाची ​​​ सुनिश्चिती देतात.
 
 --------------------------
 

3) *GONDIA* World's first of its own kind International Tiger Tourism Center where Gondia Airport must be developed as Tiger Gateway of India. 
 
LOGIC-  Three Side four best Tiger Sanctuaries with maximum Tiger population KanhaKisli,Pench,Nagzira and Tadoba. These attractions must be marketed aggressively in high income cities like Pune Banglore,Hyderabad,Delhi,Mumbai.3-4days packages will attract many tourists. Huge income for locals 

10000-15000 Tourists good number may help all local small and big tourists points revival.Local food,Tribal Arts,Bomboo items may help vibrant economy. Hotels,Tours&Travel industry will flourish again huge employments.

2)Most Modern Rice Research Center near Gondia 

LOGIC - Will help improving Rice Varities to earn more Forex.Like Punjab over the years quality and realizations improved manifold. Gondia with huge forex earnings by RiceExports deserve this institution. Infact 3 states CG MP and Maharashtra will be benefitted. 

LOGIC- A)Best quality Long,Flat,alloy steel,Manpower,nearby

3)LARGE SOLAR POWR PARK NEAR GONDIA 

LOGIC- Lots of land available in Gondia at much cheaper rates where no agriculture activities.Such large land parcels must be made productive by inviting investments in Solar Power Generation.Cities where thermal power generated must be given priority for Solar Power. 

3) गोंदिया
A)जगातील अशाप्रकारचे पहिले आंतरराष्ट्रीय व्याघ्र पर्यटन केंद्र; गोंदिया विमानतळ टायगर गेटवे ऑफ इंडिया म्हणून विकसित करणे आवश्यक आहे.
​कारण - तीन बाजूंना कान्हाकिसली, पेंच, नागझिरा आणि ताडोबा ही कमाल वाघ-संख्या असलेली चार उत्तम व्याघ्र अभायण्ये. 
 पुणे, बंगळुरु, हैदराबाद, दिल्ली, मुंबई अशा उच्च उत्पन्न असलेल्या शहरांमध्ये या आकर्षणांचे ​अतिशय जोमाने मार्केटिंग करायला हवे. ३-४ दिवसांचे पॅकेज अनेक पर्यटकांना आकर्षित करेल. स्थानिकांसाठी ​उत्पन्न वाढवण्याची मोठी संधी होईल.
 
​१००००-१५००० अशा चांगल्या संख्येने पर्यटक आल्यास स्थानिक लहान-मोठ्या पर्यटन स्थळाम्चे पुनरुज्जीवन होण्यास मदत होईल. स्थानिक खाद्यपदार्थ, आदिवासी कला, बांबूच्या वस्तू अर्थव्यवस्थेला चालना देतील. मोठा रोजगारासह हॉटेल्स, टुर्स अँड ट्रॅव्हल्स उद्योग पुन्हा बहरेल
 
२) गोंदियाजवळ सगळ्यात आधुनिक तांदूळ संशोधन केंद्र
​कारण - तांदळाचे प्रकार सुधारण्यासाठी आणि अधिक फॉरेक्स मिळवण्यास मदत होईल. पंजाबसारखे दर्जा आणि ​पैशात रुपांतर अनेकपटींनी सुधारेल. तांदूळ निर्यातीने मोठे परकीय चलन कमावण्यास पात्र असलेले गोंदिया या ​संस्थेसाठी पात्र आहे. किंबहुना, छत्तीसगढ़ , मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र या ३ राज्यांना फायदा होईल.
 
३) गोंदियाजवळ मोठा सौर ऊर्जा पार्क
​कारण - कृषी उपक्रम नसलेली जमीन मोठ्या प्रमाणावर गोंदियात उपलब्ध आहे. सौर ऊर्जा निर्मितीसाठी गुंतवणूक ​आमंत्रित करून असे असे मोठे भूखंड उत्पादक करायला हवे. ज्या शहरांमध्ये औष्णिक उर्जा निर्मिती होते त्यांना ​सौर ऊर्जेसाठी प्राधान्य द्यायला हवे.
 --------------------
4) CHANDRAPUR 
Must be converted&declared as *WorldClassIndustrialCity*
 
LOGIC -- Chandrapur the highest Revenue Contributing District ignored by local leaders.With Cement,Steel,FerroAlloys,CoalMining,Electricity Generation all polluting industries.Chandrapur must be given equally clean green industries to ensure Citizens get better opportunities.

 2)Chandrapur must be considered for Cross Subsidy Waiver for cheaper electricity. 

LOGIC- Power plants near CoalMines generating electricity at much lower rates but given to consumers at much higher price by loading highT&D losses and Cross Subsidy fr farmers. But Citizens health,Air quality,Poor Roads due to excessive Transport activities needs to be compensated by lower electricity costs, Better amenities for citizens and world class facilities. Highest Revenue paying by Minerals Royalty,Highest rate GST by Cement&Steel,Cess,Tiger and wildlife tourism like many levies Chandrapur deserve special package to become world class industrial city.

3)Chandrapur must have large *Indian School of Mines*equilent to IIT like Dhanbad 

LOGIC--Chandrapur and Surrounding areas full of Ferrous,Nonferrous and Coal Mines need high class mining professionals as world wide new technologies coming.As most of the non forest Minerals now almost finished.Forest and underground mining need different technology and such prestigious institutions opens up lots of opportunities for local talented youth. Such graduates having huge demand in foreign countries also.


१) चंद्रपूर - "जागतिक दर्जाचे औद्योगिक शहर" म्हणून रुपांतरित व घोषित करायला हवे.
​कारण - चंद्रपूर हा महसूलात सगळ्यात जास्त योगदान देणारा जिल्हा आहे, मात्र स्थानिक नेत्यांकडून दुर्लख्सःईट. ​सिमेंट, स्टील, फेरोअलॉय, कोळसा खाणी, वीज निर्मिती असे सगळे प्रदूषण करणारे उद्योग. नागरिकांना अधिक ​चांगल्या संधी मिळाव्या म्हणून चंदपूरला तेवढेच स्वच्छ, हरित उद्योग द्यायला हवेत.
 
२) स्वस्त विजेसाठी क्रॉस सबसिडी माफीसाठी चंद्रपूरचा विचार करणे आवश्यक आहे.
​कारण - कोळसा खाणीजवळील वीज प्रकल्पात अतिशय कमी दरात वीज निर्मिती होते पण ग्राहकांना ती पारेषण व ​वितरण नुकसानीचे ओझे लादून आणि शेतकर्‍यांसाठी क्रॉस सबसिडी लावून बर्‍याच जास्त दराने दिली जाते.पण ​नागरिकांचे आरोग्य, हवेची गुणवत्ता, मोठय प्रमाणावरील वाहतुकीमुळे खराब रस्ते याची भरपाई वीज दर कमी ​करुन, सुखसोयी व जागतिक दर्जाच्या सुविधा देऊन करायला हवी. खनिज रॉयल्टीमुळे सगळ्यात जास्त महसूल ​देणारे, सिमेंट व स्टीलवर सगळ्यात जास्त जीएसटी दर, सेस, व्याघ्र व वन्यजीव पर्यटन असे अनेक अकारण ​लादलेले कर यामुळे जागतिक दर्हाचे औद्योगिक शहर होण्यास चंदपूर विशेष पॅकेज मिळण्यासाठी पात्र आहे.
 
३) धनबादसारखे आयआयटीला समकक्ष "इंडियन स्कुल ऑफ माइन्स" चंद्रपूरला असायला हवे.
​कारण - चंद्रपूर व आसपासच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर लोह व गैर-लोह आणि कोळशाच्या खाणी आहेत, आता ​जगभरात नवीन तंत्रज्ञान येत असल्याने तिथे उच्च श्रेणीच्या खाणकाम व्यावसायिकांची गरज आहे. आता बहुतांश ​गैर-वन्य खनिजे संपली आहेत. जंगलांमध्ये आणि भूमिगत खाणकामासाथी वेगळ्या तंत्रज्ञानाची गरज आहे आणि ​अशा प्रतिष्ठित संस्था स्थानिक प्रतिभावंत युवकांसाठी अनेक संधी निर्माण करतात. अशा पदवीधारकांना परदेशातही मोठी मागणी आहे.
   -----------------------


5)YEOTMAL
 Large Minerals Processing Zone at Wani.
 
LOGIC -- Wani Taluka in YEOTMAL district having best quality of Minerals like Dolomite,Limestone in bulk quantities. Specifications and Whiteness after calcination making it more precious.Large Steel Companies already buying from Wani but huge potential there to expand manifold. 

Minerals&Coal nearby Wani only area in country.Lime&Dolomite both precious and after processing it is used in bulk quantities for Steel,Chemicals,Construction and Wall care products.All these sectors growing with huge capacities additions. 

Wani having such many small Minerals processing units but with old polluting process plants needs replacement.These plants must be converted into latest technology plants with cluster formation nearby. Manifold value additions ensure huge earnings for state. 

2)Large Coal Gasification Plants 

LOGIC-- NitiAayog and Ministry of Coal started promoting Coal Gasification in bigway. Wani area in YEOTMAL having best quality Coal Deposits can be converted into Synthetic Natural Gases. Through this process new generation fuels like Ethanol Methanol DME can be produced.DME is the replacement of LPG presently imported. 

Coal Gasification route can be used for Large quantities of Fertilisers making like Urea,Ammonium Nitrate presently coming from long distance plants or Imported.

3)Cotton and Cotton Seed Processing

LOGIC--YEOTMAL district having best quality Cotton as main crop.This long Fibre cotton having good Domestic and Exports demands.Under MITRA Scheme one Large Textile Cluster proposed in Amravati. Best prices can help farmers to double their income. 

After processing Cotton seed can be used for Oil extraction used as edible oil.DeOiledCake can be used for cattle feed ensure very high percentage of Fat in milk. This way Cotton Ginning,Pressing,OilExtraction,Milk Processing like many opportunities there for youth in YEOTMAL district. 

4)Large Scale Solar Power Generation 

Logic-Whole YEOTMAL dist with maximum radius having ample land available at much lower cost.Jhhudpi forest where small Shrubs can be used for Solar Power Generation.Infact in Coal Mining Districts Solar plants must be given on priority.Climatic Conditions always suitable for proposed industries. 

5)Large Textile Park Under MITRA Scheme 

Yeotmal equally suitable district for large investments in Textiles.All Conditions laid by Central Govt for MITRA Scheme can be easily fulfilled. Shri Devendra Fadnavis Sir trying hard for this.Amravati and Yeotmal both locations suitable with best cotton crop.Socially large employments generating opportunities must in YEOTMAL. 

All these investments in YEOTMAL must as district witnessed maximum farmer suicide in last two decades. CoalMining,Gasification, Minerals Processing Industry having huge potential can ensure one assured job with fixed income in small farmers family. 


- प्रदीप महेश्वरी
तज्ज्ञ, नैसर्गिक संसाधने
(Pradeep Maheshwari | Strategist Natural Resources Nagpur)

सोमवार, जुलै २५, २०२२

 येत्या ३ दिवसात राज्यात मध्यम ते मुसळधार पाऊस.

येत्या ३ दिवसात राज्यात मध्यम ते मुसळधार पाऊस.

#BIGNEWS Monsoon
विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा जोर धरणार
कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता
नागपूर, चंद्रपूर, अकोला, गडचिरोली, गोंदियाला ‘यलो अलर्ट’


येत्या ३ दिवसात राज्यात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुढचे ३ दिवस राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. विदर्भातील काही भागात गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. विदर्भात काही जिल्ह्यांत पूरस्थिती होती. राज्याच्या विविध भागात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने उसंत घेतली होती. त्यामुळे गडचिरोली, चंद्रपूर या भागातील नद्यांची पाणी पातळी घटली असून पूरही ओसरला आहे. मात्र आता पुन्हा एकदा हवामान खात्याने विदर्भाची चिंता वाढवलीय. विदर्भात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. याशिवाय मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागात पावसाचा अलर्ट देण्यात आलाय.
मागील आठ दिवसापासून गायब असलेल्या पावसानं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा बरसायला सुरुवात केली आहे. रात्रीपासून जिल्ह्याचा अनेक भागांमध्ये सरींवरती पाऊस बरसत आहे. कोसळणाऱ्या सरी या जोरदार अशाच आहेत. सध्या देखील जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरण आहे. खेडमधील जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. रात्री उशिरा जिल्हा माहिती कार्यालयाने जगबुडीबाबत दिलेली माहिती आहे. पाऊस पडत असला तरी जिल्ह्याच्या जनजीवनावरती मात्र कोणताही मोठा परिणाम झालेला नाही.

सोमवार, जुलै ११, २०२२

 मुख्यमंत्री तातडीने गडचिरोलीत |  दुपारी चार वाजता अतिवृष्टी आणि पूरग्रस्त भागाचा पाहणी दौरा करणार

मुख्यमंत्री तातडीने गडचिरोलीत | दुपारी चार वाजता अतिवृष्टी आणि पूरग्रस्त भागाचा पाहणी दौरा करणार

 मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे तातडीने गडचिरोलीत 


मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर प्रथमच एकनाथ शिंदे यांचे दुपारी ३.१५ वाजता नागपूर शहरात आगमन होत आहे. पूरग्रस्त भागाचा आढावा घेण्यासाठी ते हेलिकॉप्टरने गडचिरोलीला जाणार आहेत. ते आधीच्या सरकारमध्ये पालकमंत्री होते.  त्यामुळे कदाचित गडचिरोलीला भेट देत आहेत. यावेळी उप-मुख्यमंत्री श्री @dev_fadnavis  जी हे सुद्धा या दौऱ्यात गडचिरोली ला भेट देणार आहेत. गडचिरोली विभागासह विदर्भात उत्पन्न झालेल्या पूर परिस्थितीबाबत राज्याचे मुख्यमंत्री श्री  @mieknathshinde  जी यांच्याशी खासदार अशोक नेते यांनी फोन वर चर्चा केली. आजच पूर परिस्थितीची पाहणी ते स्वतः गडचिरोलीला भेट देऊन करतील व राज्य शासनाच्या वतीने सर्व प्रकारची सहायता प्रदान करतील असे आश्वासन त्यांनी दिले. दुपारी चार वाजता एकनाथ शिंदे हे  अतिवृष्टी आणि पूरग्रस्त भागाचा पाहणी दौरा करणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी 6.30 वाजता पूर परिस्थितीबाबत गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रशासन सोबत आढावा बैठक घेणार आहेत. 

राज्यातील मुंबईसह, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे सातारा, कोल्हापुरात या भागात जोरदार पाऊस कोसळताना दिसत आहे. तसेच गडचिरोलीमध्ये देखील पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. तिथे अनेक नद्यांना पूर आला आहे. तसेच नागपूर, चंद्रपूर, वाशिम, वर्धा जिल्ह्यातही मोठा पाऊस कोसळताना दिसत आहे.



#rain #nature #rainyday #photography #love #naturephotography #clouds #photooftheday #weather #sky #instagood #instagram #water #travel #storm #photo #art #raindrops #rainbow #beautiful #rainy #india #raining #picoftheday #landscape #summer #sunset #ig #flowers #monsoon






#gadchiroli - 20%

#nagpur - 14%

#chandrapur - 12%

#marathi - 8%

#pune - 8%

#gadchiroli #nagpur #chandrapur #marathi #pune #mumbai #wardha #vidarbha #maharashtra #ig #marathijokes #bhandara #gondia #akola #amravati #marathimeme #marathimulgi #zeemarathi #mimarathi #buldhana #india #marathistatus #instamarathi #marathisamrajya #marathimulga #aurangabad #yavatmal #memes #washim #marathipremgeet

Eknath Shinde


मंगळवार, जून २८, २०२२

प्रसिद्ध समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांच्या तब्बेतीची महत्वाची अपडेट

प्रसिद्ध समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांच्या तब्बेतीची महत्वाची अपडेट



Facebook Post Date 28 june
बाबांना काल परत admit केले आहे. आता सर्व visitors ना पूर्ण प्रवेश बंद केलाय डॉक्टरांनी. बाबांच्या फोन वर कॉल करू नये. ताप अजून आहे. गेली 5 दिवस झाले पुन्हा इन्फेक्शन झाले आहे आणि high fever आहे. आज काही टेस्ट होतील. त्याचे रिपोर्ट २-३ दिवसांनी येतील. जे काही असेल अपडेट ते सोशल मीडिया वर टाकत जाईन. कृपया फोन करून तब्येत विचारू नका. कृपया त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना पण कॉल करून त्रास देऊ नये. योग्य उपचार सुरू आहेत. माझ्या व्हॉट्सअप मेसेज वर कधीतरी चौकशी करू शकता. मोबाईलवर पर्सनल मेसेज करून विचारपूस करावी ही विनंती. लगेच उत्तराची अपेक्षा करू नये. आपले प्रेम आणि काळजी आम्ही समजू शकतो पण या टेन्शन मध्ये आणि बिझी असल्याने उत्तर लगेच मिळेल ही अपेक्षा करू नये. समजून घ्याल ही अपेक्षा. Dinanath Mangeshkar Hospital Pune येथे येऊन गेले असल्यास खाली रजिस्टर ठेवले आहे त्यावर आपण शुभेच्छा संदेश, नाव, पत्ता, मोबाईल नंबर लिहावा. भेटीची अपेक्षा आणि आग्रह मुळीच करू नये. बरे झाल्यावर नक्की भेटायला यावे हेमलकसाला. 🙏🏻 अनिकेत आमटे



17 जून रात्री 12 वाजता
बाबांची तब्येत आज बरी आहे. आज सध्या पुरता डिस्चार्ज मिळाला आहे. 2-3 दिवसांनी चेक अप होईल. परत रक्ताच्या सर्व टेस्ट करतील आणि ब्लड values ठीक असल्यास लवकरच (8-10 दिवसात) किमो थेरपी सुरू करतील. पुढील साधारण महिनाभर ट्रीटमेंट पुण्यातच होणार आहे. बाबांचा आजचा फोटो सोबत जोडला आहे रुमानी सोबतचा. पेशंट कसा असावा याचे आयडीयल उदाहरण आहेत बाबा.

DMH दवाखान्यातील अतिशय आपुलकीने ट्रीटमेंट करणारे डॉक्टर्स, नर्सिंग स्टाफ, मामा मावश्या सर्वांचे आभार. आपण सर्वांच्या शुभेच्छा धीर द्यायला सोबत आहेतच, अशी पोस्ट अनिकेत आमटे यांनी केली आहे.



17 जून सकाळी.
बाबांची तब्येत आज बरी आहे. आज कदाचित डिस्चार्ज मिळेल. 2-3 दिवसांनी चेक अप होईल. आणि मग सर्व टेस्ट करून किमो थेरपी सुरू करतील. पुढील साधारण महिनाभर ट्रीटमेंट पुण्यातच होणार आहे, अशी माहिती पुत्र अनिकेत आमटे यांनी आज 17 जून रोजी दिली.


डॉक्टर प्रकाश आमटे हे 8 जून रोजी पुणे येथे बीजे मेडिकल कॉलेजमध्ये दीक्षांत समारंभाला आले असता त्यांना जास्त ताप व खोकल्याचा त्रास झाला म्हणून एका खासगी रुग्णालयात उपचार व तपासण्या सुरू आहेत व पूर्ण विश्रांतीचा डॉक्टरांनी सल्ला दिला. उपचाराला थोडा प्रतिसाद मिळाला आहे.



📅 Facebook Post Date 16 📅
अनिकेत आमटे यांनी फेसबुक वर शेअर केलेल्या पोस्टमध्ये सांगितले की, आज पण बाबांच्या #drprakashamte प्रकृती मध्ये चांगली सुधारणा आहे. अतिशय प्रेमाने उपचार करणाऱ्या सर्व तज्ञ डॉक्टर मंडळींचे तसेच हॉस्पिटल स्टाफचे आभार. सर्व जनतेच्या शुभकामना आम्हाला धीर देत असतात.
सर्व ठीक होईल.


Facebook Post Date 15 June
बाबांची #drprakashamte प्रकृती आज कालच्या सारखी स्थिर आहे. औषध उपचाराला प्रतिसाद मिळत आहे. Lukemia हा रोग असल्याने त्याची ट्रीटमेंट बरेच दिवस चालेल. त्यापूर्वी सध्या असलेले निमोनिया चे इन्फेक्शन पूर्ण बरे झाले पाहिजे. आता ताप नाहीये. लवकरच इन्फेक्शन पूर्ण बरे होईल अशी आशा आहे. आपल्या शुभेच्छा आणि प्रेमाबद्दल आभारी आहोत.
अनिकेत आमटे

Dr Prakash Amte, social worker and Magsaysay award winner, has been admitted to a private hospital in Pune.





Prakash Baba Amte is a social worker from Maharashtra, India. Amte and his wife, Mandakini Amte, were awarded the Magsaysay Award for 'Community Leadership' in 2008 for their philanthropic work in the ... Wikipedia
Born: 26 December 1948 (age 73 years), Maharashtra
Spouse: Mandakini Amte
Awards: Padma Shri (2002); Ramon Magsaysay Award (2008)
Education: MBBS Former Surgical Registrar IGMC, Nagpur
Children: Arti Amte, Aniket Amte, Digant Amte
Siblings: Vikas Amte, Renuka Amte-Manohar
Parents: Baba Amte, Sadhana Amte



गुरुवार, एप्रिल १४, २०२२

 दगडाने डोके ठेचून केली दोघांची हत्या |

दगडाने डोके ठेचून केली दोघांची हत्या |



गडचिरोली ( Gadchiroli):  एटापल्ली (Etapalli) तालुक्यातील हेडरी पोलिस उपविभागांतर्गत गट्टा पोलिस मदत केंद्राच्या हद्दीत पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरुन नक्षल्यांनी दोन युवकांची दगडाने डोके ठेचून हत्या हत्या केली. अशोक नरोटे(२८ रा.गोरगुट्टा)  व मंगेश हिचामी (२७रा.झारेवाडा) अशी मृतांची नावे आहेत. नक्षल्यांनी केलेल्या हत्या मधील एक ग्रामस्थ मंगेश हिचामी हा झारेवाडा येथील असून, अशोक नरोटे हा आत्मसमर्पित नक्षलवादी होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.

पोलीस मदत केंद्र (Police) गट्टा (जां) हद्दीमध्ये दिनांक १३ एप्रिल २०२२ रोजी मंगेश मासा हीचामी (२७ ) रा. झारेवाडा पो. गट्टा (जां) ता. एटापल्ली जि. गडचिरोली व नविन पेका नरोटे (२५) रा. गोरगुट्टा पो. गट्टा (जां) ता. एटापल्ली या दोन निरपराध आदिवासी युवकांची पोलीस खबरी असल्याच्या संशयावरुन नक्षलवाद्यांनी क्रुर हत्या केली.


नक्षलवाद्यांनी मंंगेश हिचामी यास दिनांक १३ एप्रिल २०२२ रोजी रात्रो १०.०० वाजता व नविन नरोटे यांस रात्रो ०१.००  वाजता घरातुन बळजबरीने घेवुन गेले व त्यांची हत्या केली. या दोघांच्याही हत्येनंतर मंगेश हिचामी याचे मृतदेह झारेवाडा ते गट्टा रोडवर आणुन ठेवले तर नविन नरोटे याचे मृतदेह गोरगुट्टा ते गिलनगुडा रोडवर आणुन ठेवले होते.

या दोघांचे मृतदेह त्यांच्या गावापासून काही अंतरावर रक्ताच्या थारोळ्यात आढळून आले. बंदुकीने त्यांची हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. हेडरी पोलिस ठाण्याजवळच सुरजागड पहाड असून, तेथे लोहखनिज उत्खननाचे काम सुरु आहे. काल १३ एप्रिल रोजी दुपारी २.०० वाजताच्या  सुरजागड लोहखनिज प्रकल्पात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे मोठ्या थाटामाटात कार्यक्रम करण्यात आले.  या कार्यक्रमाच्या २४ तासाचा आधीच नक्षल्यांनी दोघांची हिंसक हत्या करून दहशत निर्माण करून पोलीस प्रशासनात खळबळ माजवली असून नक्षल पुन्हा सक्रीय झाले असून सुरजागड लोह प्रकल्पावरून कठीण परिस्थिती निर्माण करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

घटनेची माहिती पोलीस विभागाला मिळताच सुरजागड परिसरात मोठ्या संख्येने नक्षल विरोधी तुकड्या पाठवून सर्च ऑपरेशन नक्षल विरोधी अभियान तिव्र केल्याची प्राथमिक माहिती सूत्राकडून समोर येत आहे.


Murder Gadchiroli Etapalli

Gadchiroli, Maharashtra 442605, India

बुधवार, मार्च ३०, २०२२

डिजिटल पत्रकारांचे गडचिरोली ऑल मिडीया असोसिएशन (गामा) गठीत

डिजिटल पत्रकारांचे गडचिरोली ऑल मिडीया असोसिएशन (गामा) गठीत

गामा च्या संयोजकपदी मनिष कासर्लावार, अनिल बोदलकर यांची निवड



गडचिरोली आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात डिजिटल मिडीयाचे महत्व मोठया प्रमाणात वाढले आहे. मागील दोन वर्षातील कोरोना काळापासून तर डिजिटल मिडीया हा प्रसार माध्यमाचा महत्वपुर्ण भाग बनला आहे. कोणत्याही घडामोडीचा वृत्तांत काही क्षणात जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम डिजिटल मिडीयाच्या माध्यमातून केले जात आहे.

गडचिरोली जिल्हयात सुध्दा डिजिटल मिडीयाचा सुध्दा प्रसार वाढला असून या मिडीयामध्ये कार्यरत असलेल्या पत्रकारांचे गडचिरोली ऑल मिडीया असोसिएशन (गामा) गठीत करण्यात आले असून या असोसिएशनच्या संयोजकपदी मनिष कासर्लावार व अनिल बोदलकर यांची निवड करण्यात आली आहे.


गडचिरोली ऑल मिडीया असोसिएशनची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीला विदर्भ न्यूज एक्सप्रेसचे संपादक मनिष कासर्लावार आणि एव्हीबी न्यूज पोर्टलचे संपादक अनिल बोदलकर यांची गडचिरोली ऑल मिडीया असोसिएशनच्या संयोजकपदी सर्वानुमते निवड करण्यात आली.


गडचिरोली ऑल मिडीया असोसिएशन मध्ये पुर्णसत्य न्यूज पोर्टलचे संपादक हेमंत डोर्लीकर, गडचिरोली वार्ताचे संपादक जयंत निमगडे, महाभारत न्युज पोर्टलचे संपादक उदय धकाते, गोंडवाना टाईम्स पोर्टलचे व्यंकटेश दुडंमवार, महाराष्ट टुडेचे संपादक जगदिश कन्नाके, राईट टाईम न्यूजचे संपादक राजू सहारे, नॅशनल मिडीया न्यूज जिल्हा प्रतिनिधी प्रा.श्रीमंत सुरपाम, विदर्भक्रांती न्यूज पोटर्लचे संपादक बाळू म्हशाखेत्री, वृत्तवाणीचे संपादक प्रविण चन्नावार आणि नागपूर पोस्ट च्या प्रतिनिधी रूपाली शेळके यांचा समावेश आहे.


डिजिटल मिडीयाच्या माध्यमातून आपल्या समस्या मांडण्यासाठी पत्रकार परिषद आयोजनाबाबत गडचिरोली ऑल मिडीया असोसिएशनचे संयोजक मनिष कासर्लावार 9423669220 व अनिल बोदलकर यांच्याशी 78210 93027 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

गुरुवार, मार्च १०, २०२२

गडचिरोली जिल्ह्यामधील पर्यटन विकासाचा अभाव

गडचिरोली जिल्ह्यामधील पर्यटन विकासाचा अभाव




गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती २६ आगस्ट १९८२ रोजी चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून झाली. संपूर्ण गडचिरोली जिल्हा हा पूर्वी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये समाविष्ट होता व मुख्यतः गडचिरोली, सिरोंचा ही ठिकाणे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तहसील म्हणून कार्यरत होती. गडचिरोली जिल्ह्याचे एकुण क्षेत्रफळ १४४१२ चौ.कि.मी.आहे. चंद्रपूर व ब्रम्हपुरी मधील जमिनदारी व मालमत्तेचे हस्तांतरण करून गडचिरोली तहसील म्हणून १९०५ पासून अस्तित्वात होती. ब्रम्हपुरी ऐवजी गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती २६ आगस्ट १९८२ रोजी चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून करण्यात आली आहे. गडचिरोली जिल्हा हा महाराष्ट्र राज्याच्या विदर्भ या प्रदेशात मोडतो. फार प्राचीन काळी ह्या प्रदेशावर राष्ट्र्कुट यांचे राज्य होते. त्यानंतर चालुक्य, देवगीरीचे यादव यांचे साम्राज्य होते. यानंतर गडचिरोलीच्या गोंड राजांनी राज्य केले. तेराव्या शतकात, खन्डक्या बल्लाळ शाह यांनी चंद्रपूरची स्थापना केली. त्यांनी आपली राजधानी सिरपूर येथून चंद्रपूर येथे हलविली. याचकाळात चंद्रपूर प्रदेश हा मराठ्याच्या सत्तेखाली आला. १८५३ मध्ये, बेरार हा चंद्रपूर (पूर्वीचे चांदा ) प्रदेशाचा भाग ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनी च्या ताब्यात आला. १८५४ मध्ये चंद्रपूर हा बेरार या प्रदेशाचा स्वतंत्र जिल्हा म्हणून अस्तित्वात आला. ब्रिटीशांनी १९०५ मध्ये चंद्रपूर व ब्रम्ह्पुरीची जमिनदारी व मालमत्ता हस्तांतरण करून गडचिरोली तहसीलची निर्मिती केली. राज्याची पुनर्ररचना होण्यापुर्वी हा भाग १९५६ पर्यंत केंद्रीय अधिपत्याखाली होता. त्यानंतर राज्यपुनर्रचनेनुसार चंद्रपूर बॉम्बे स्टेट मध्ये समाविष्ट करण्यात आले. १९६० मध्ये केंद्र शासनाने महाराष्ट्र राज्याची स्थापना करून त्यामध्ये चंद्रपूर हे जिल्हा म्हणून समाविष्ट करण्यात आले. १९८२ मध्ये चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून ब्रम्हपुरी ऐवजी स्वतंत्र गडचिरोली जिल्हा अस्तित्वात आला. गडचिरोली जिल्हा हा महाराष्ट्र राज्याच्या उत्तर-पूर्व दिशेला वसलेला असून तेलंगणा व छत्तीसगड राज्याच्या सीमा लागून आहेत. गडचिरोली जिल्हा हा पूर्णपणे नक्सल प्रभावित जिल्हा म्हणून ओळखला जातो. गडचिरोली जिल्हा जवळपास ७६ % जंगलाने व्यापलेला आहे . जिल्ह्याची एकूण लोकसंख्या १०७२९४२ असून पुरुष व स्त्रिया यांची लोकसंख्या अनुक्रमे ५४१३२८, ५३१६१४ याप्रमाणे आहे (२०११ च्या जनगणने नुसार). जिल्ह्यात अनुसूचित जाती व जमाती ची लोकसंख्या अनुक्रमे १२०७४५ व ४१५३०६ ऐवढी आहे. जिल्ह्याची एकूण साक्षरता  ७४.४ टक्के आहे. जिल्ह्यामध्ये अनुसूचित जाती व जमातीची लोकसंख्येची टक्केवारी ११.२५ % व ३८.७ % अनुक्रमे आहे.

गडचिरोली जिल्हा हा मुख्यत्वे महाराष्ट्र राज्यात आदिवासी, मागासलेला व घनदाट जंगलाने व्याप्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. हा जिल्हा अतिदुर्गम, डोंगर द-याने व्याप्त व अविकसित असून जास्तीत जास्त क्षेत्र जंगलाने वेढलेला आहे. जिल्ह्याच्या एकूण जमिनीच्या क्षेत्रापैकी जवळपास ७६ % टक्के भाग जंगलाने व्याप्त आहे. हा जिल्हा बांबुचे झाड व तेंदू ची पाने करीता प्रसिध्द आहे. भात हे जिल्ह्याचे मुख्य पिक आहे. याव्यतिरिक्त तूर, गहू, ज्वारी, सोयाबीन, जवस इत्यादी कृषी उत्पादने घेतली जातात. जिल्ह्यातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. जिल्ह्यात चामोर्शी तालुक्यामध्ये आष्टी येथे पेपर मिल चा कारखाना असून इतर कोणतेही मोठे उद्योगधंदे नाहित. यामुळे, जिल्हा हा आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे. जिल्ह्यात भाताचे उत्पादन जास्त होत असल्याने भात गिरणी ची संख्या जास्त आहे. जिल्ह्यात कोसाचे उत्पादन होत असून कोसा उत्पादन केंद्र आरमोरी येथे आहे. जिल्ह्यात फक्त १८.५ कि.मी. लांबीचा रेल्वे मार्ग असून देसाईगंज येथे रेल्वेची सुविधा आहे. गडचिरोली जिल्ह्यामध्ये मुख्यतः गोंडी, माडिया, मराठी, हिंदी, तेलगु, बंगाली, छत्तीसगडी इत्यादी भाषा बोलल्या जातात. गडचिरोली जिल्ह्यामध्ये शासनाने प्रशासकीयदृष्ट्या एकूण सहा उपविभाग (गडचिरोली, वडसा, अहेरी, चामोर्शी, एटापल्ली, कुरखेडा) निर्माण केले असुन प्रत्येक उपविभागात दोन तालुके सामाविष्ट करण्यात आलेले आहेत. जिल्ह्यात एकूण १२ तालुके आहेत. जिल्ह्यात ४५७ ग्रामपंचायती असून १६८८ राजस्व गावे अस्तित्वात आहेत. जिल्ह्यामध्ये तीन विधानसभा व एक लोकसभा क्षेत्र (चंद्रपूर जिल्ह्याचा काही भाग मिळून) असून १२ पंचायत समीती आहेत. जिल्ह्यात ९ नगर पंचायती असून गडचिरोली, देसाईगंज (वडसा) व आरमोरी  या शहरात नगरपालिका आहेत. गोदावरी नदी पश्चिमेकडून पूर्वे कडे वाहत असून तिचे पात्र जिल्ह्याच्या सीमेला लागून असून दक्षिण भागाला जिल्हा वसलेला आहे. गोदावरी नदीच्या उपनद्या जसे प्राणहिता (वैनगंगा व वर्धा या उपनद्या मिळून) व इंद्रावती ह्या मुख्य नद्या जिल्ह्याच्या सीमाभागात वाहतात. जिल्ह्याचे पूर्वेत्तर भागात, धानोरा, एटापल्ली, अहेरी व सिरोंचा तालुके असून घनदाट जंगलाने व्याप्त आहे. जिल्ह्याच्या भामरागड, टिपागड, पलसगड व सुरजागड भागात उंच टेकड्या आहेत. अहेरी नगरीत दशहरा उत्सव, मार्कंडा येथे महाशिवरात्र उत्सव चपराळा येथे हनुमान जयंती जिल्ह्यात एकूण लोकसंख्येपैकी ३८.१७ टक्के लोकसंख्या ही अनुसूचित जमातीची असल्याने हा जिल्हा आदिवासी जिल्हा म्हणून महाराष्ट्र राज्यात ओळखल्या जातो. अनुसूचित जमातीमध्ये मुख्यत्वे गोंड, कोलाम, माडिया, परधान इत्यादी जमातीचे लोक वास्तव्यास आहेत. त्यांची बोलीभाषा “गोंडी, माडिया” ह्या आहेत. गडचिरोली जिल्ह्यामध्ये निसर्ग निर्मित पर्यटक आहेत.  
बिनागुंडा :- बिनागुंडा हे भामरागड तालुक्यात वसलेले आहे. बिनागुंडा-कुओकोडी ऐतिहासिक गावे आहेत.  हा भाग  अबुजमादमध्ये येतो, या भागामध्ये राहणा-या आदिवासींना बडा माडिया म्हणतात. हा 7-8 गावांचा समूह आहे ज्यामध्ये 140 कुटुंबे आहेत. बिनागुंडा गावात पोहोचण्यासाठी, आपल्याला अहेरी-आलपल्ली-भामरागड-लाहेरी आणि त्यानंतर बिनागुंडा-कुओकोडीकडे जावे लागेल. अंतर गडचिरोली पासून आणि चंद्रपूर पासून 210 किमी दूर आहे. या क्लस्टरला जवळजवळ 8 महिने कापला जातो. बी.आय.टी.टी. बांबूच्या बाहेरील उतारा आणि वाहतुकीसाठी रस्ताचे वाहन बनविते. आदिम जनजाती बांबू कटिंग आणि तेंदू पट्टा संकलनद्वारे मिळविलेल्या मजुरीवर गुजराण करतात. ते लागवडीची शेती करीत असे. त्यांचे अस्तित्व जंगलावर प्रामुख्याने आहे. सदर ठिकाण शहरापासून दूर आहे आणि साध्या पद्धतीचे येथील ग्रामीण लोकांचे जीवनमान आहे. विविध सोयी सुविधे चा अभाव आहे. हे ठिकाण धबधब्यांसाठी प्रसिद्ध आहे. बिनागुंडा हे तालुक्यापासून  40 कि.मी. अंतरावर पूर्वेस आहे. सदर गाव  हे महाराष्ट्र व छत्तीसगडच्या सीमेवर वसलेले आहे. या डोंगरावर पश्चिमेकडील अबुझदचा पर्वत आहे. 4 कि.मी. अंतरावर  कुव्वाकोडी हे गाव  डोंगराच्या टोकावर स्थित आहे. भामरागड येथे  विश्रामगृह उपलब्द असून ते गडचिरोली पासून 160 किमी. अंतरावर आहे. गडचिरोली जिल्ह्यामध्ये हे निसर्ग निर्मित पर्यटकक्षेत्र आज सुद्धा विकासापासून लाखों दूर आहे.

सुरजागड आणि पेठा :- एटापल्ली तालुक्यात सुरजागड टेकडी वसलेली आहे. सदर टेकडी 27 कि.मी. दूरवर पसरलेली आहे. त्याला सुरजागड पहाडी म्हणून ओळखले जाते. या टेकड्यावर विविध प्रकारचे वनस्पती आणि प्राणी आहेत. प्रदेशातील दाट जंगल आणि हिरवीगार पालवी क्षेत्राच्या ट्रॅकर्सवर आकर्षित करतात. परिसरात दगडी लोखंडाच्या समृद्ध खाणी आहेत. या क्षेत्रात लोखंडाच्या खनिजांचा वापर करण्याचा
सरकार प्रयत्न करत आहे. हे त्याच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. या पर्वतीय क्षेत्रातील फुलपाखरेची प्रजाती देखील विद्वान आणि पर्यटकांना आकर्षित करते. पावसाळ्यातील ऋतूमध्ये मध्ये लहान धबधबे आणि पूर आलेल्या नद्या प्रदेशात छान देखावा निर्माण करतात. माडिया समाज हे सुरजागड पहाडीच्या गावात राहतात. सेवा समिती या गावात एक दवाखाना चालवते. या गावाजवळ चंद्रखंडी हे एक सुंदर ठिकाण आहे. हे गाव पेठापासून 2 कि.मी. अंतरावर आहे. हे निसर्ग निर्मित पर्यटकक्षेत्र आज सुद्धा विकासापासून लाखों दूर आहे.

चपराला :- हे गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तहसीलमध्ये स्थित आहे. गडचिरोली जिल्ह्यात चपराळा हे अतिशय लोकप्रिय आणि धार्मिक स्थळ आहे. हे प्रशांत धाम या नावानेही ओळखले जाते. सन 1935 च्या सुमारास कार्तिक स्वामी महाराजांनी हे मंदिर बांधले. आता ते भगवान शिव, साईबाबा आणि हनुमान, दुर्गा, आणि इतर देवी-देवतांच्या देवतेचे समूह बनले आहे, या ठिकाणला नेहमीच पर्यटक भेट देत असतात व नेहमी पर्यटकाची गर्दी असते. हे पप्राणहिता नदीच्या काठावर आहे. वर्धा आणि वैनगंगा या नद्या येथे प्राणित्ता नदीसाठी एकत्र येतात. हे वर्धा आणि वैनगंगा नदीचे एक ‘संगम’ स्थान आहे आणि प्राणहिता नदीचे उगमस्थान आहे. नदीचे खोरे सुमारे 1 ते 1.5 किलोमीटर आहे. नदीचे पत्र रूंदीमध्ये असल्याने नैसर्गिक सौंदर्य लाभलेले आहे. प्राणहिता नदीची सीमा असलेली सीमा आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र आहे. हे क्षेत्र चपराला वन्यजीव अभयारण्य अंतर्गत येते. येथे अनेक जंगली जनावरे आढळतात. हे निसर्ग निर्मित पर्यटकक्षेत्र आज सुद्धा विकासापासून लाखों दूर आहे.

भामरागड संगम :- हे ठिकाण पामालगौतम, इंद्रावती व पर्लाकोटा या नद्याच्या संगमाच्या काठावर वसलेले आहे. पावसाळा या ऋतूमध्ये वरील नद्याचे विस्तृत पाणी पसरत असते.हे ठिकाण त्याच्या हिरव्यागार आणि घनदाट जंगलासाठी प्रसिद्ध आहे. आपण येथे माडिया संस्कृती पाहू शकतो. येथे अस्वल,हरीण आणि इतर वन्य प्राणी अनेकदा आढळू शकतात. येथील संगमावर सूर्यास्ताच्या वेळेस भेट देण्यासाठी एक आनंदाची बाब असते. येथे नदीच्या काठावर बांधकाम विभागाचे विश्राम गृह बांधलेले आहे. त्यामुळे पर्यटकांना येथे भेट देण्यास अतिशय आकर्षण तयार होते. हे निसर्ग निर्मित पर्यटकक्षेत्र आज सुद्धा विकासापासून लाखों दूर आहे.

लक्का मेटा :- लाक्षागृह साठी प्रसिद्ध, निसर्ग वारसा एक चमत्कार. कथासंग्रहानुसार, महाभारत काळात पांडवांनी लाक्षागृह मध्ये आश्रय घेतला होता. अहेरी तालुक्यात, अलापल्ली-सिरोंचा रोडवर, रेपनपल्ली गावापासून 4 कि.मी. अंतरावर दाट जंगला मध्ये,लाक्षागृह वसलेले आहे. जेव्हा कौरावांनी लाक्षागृहमधल्या पांडवांना ठार मारण्याचा प्रयत्न केला, तेव्हा कौरवांनी लाक्षागृहला जाळले. परंतु हे गृह नैसर्गिक घटकांच्या मदतीने स्थापीत असल्याने बरेच दिवस हे गृह जळत राहिले.बर्न होते आणि पांडवांची त्यातून सुटका झाली. पांडवांनी त्यातून बाहेर येण्यासाठी गुप्त मार्ग वापरला जो एक तलावात उघडत होता. लाक्षागृहच्या विटा, लपविलेले मार्ग, सरोवर हा सत्याचा साक्षी आहे. हे डोंगराळ वर आहे आणि सकाळी लवकर तेथे जाणे आवश्यक असते कारण तेथे जाण्याकरिता एकच अरुंद मार्ग आहे. हे निसर्ग निर्मित पर्यटकक्षेत्र आज सुद्धा विकासापासून लाखों दूर आहे.

वन वैभव :- आलापल्ली वनवैभव गडचिरोली जिल्ह्यात आहे. हे ठिकाण आल्लापल्ली पासून 16 कि.मी. अंतरावर असून सन 1935 मध्ये स्थापन करण्यात आलेली स्थायी संरक्षण क्षेत्र आहे. या प्लॉटचे क्षेत्र सुमारे 6 हेक्टर आहे. या प्रदेशाचे जैवविविधता फार चांगले आणि अतिशय वृद्ध आणि सरळ वाढणारे वृक्ष येथे जतन केले जाऊ शकते. वनस्पती आणि प्राण्यांच्या असंख्य प्रजातीसह विविध फुलझाडे पहायला मिळतात. पर्यावरणीय व्यवस्थेची देखभाल करणे स्वाभाविकपणे केले जाते. म्हणून येथे शैवाल, बुरशी, किडे आणि मकरस्यांच्या विविध प्रजाती दिसतात. या क्षेत्राशी संलग्न मेडपल्ली तलाव असून पर्यावरणातील विविध घटक पर्यटक आणि संशोधकांचे आकर्षण ठरले आहे. येथे साग या प्रजातीचे झाड सर्वात उंच असून त्याची उंची 39.70 मीटर एवढी आहे. सर्वात मोठ्या वृक्षाची उंची असलेल्या झाडाचा घेर 5.27 मीटर आहे

मार्कंडा देव :- मार्कंडा देव हे भगवान शिवाचे लोकप्रिय स्थान आहे आणि केवळ महाराष्ट्रात नव्हे तर भारतातील सर्वत्रही धार्मिक व्यक्तींसाठी भव्यता आहे. सदर ठिकाण हे चामोर्शी उपविभागातील चामोर्शी तहसील अंतर्गत येतो. येथील लोकसंख्या सुमारे 1000 आहे. हे गाव वैनगंगा नदीच्या काठावर वसलेले आहे. हे निसर्ग निर्मित पर्यटकक्षेत्र आज सुद्धा विकासापासून लाखों दूर आहे.

नद्या :- संपूर्ण गडचिरोली जिल्हा गोदावरी नदीच्या ड्रेनेज बेसिनमध्ये समाविष्ट आहे. जिल्ह्याच्या दक्षिण-पश्चिम सीमेवर, सिरोंचा जवळ, गोदावरी नदी जिल्ह्यात प्रवेश करते आणि जिल्ह्याच्या दक्षिणेकडील सीमेवर सुमारे 50 किलोमीटर पूर्वेकडे वाहते. इंद्रावतीचा संगम झाल्यानंतर दक्षिण-पूर्व कोनातून गोदावरी दक्षिणकडे आंध्र प्रदेशकडे वळते. वैनगंगा नदीच्या प्रवाहाद्वारे 225 कि.मी.एवढे अंतर पश्चिम दिशेने सीमा तयार केली आहे जी चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याचे विभाजन करते. खोब्रागडी, कठाणी आणि मिरगॅडोला या नद्या मोठ्या उपनद्या म्हणून वाहतात. वैनगंगा आणि वर्धा नद्यांच्या संगमाद्वारे बनविलेल्या प्राणहिता नदी; 190 किमी पर्यंत दक्षिण-पश्चिम सीमारेषा तयार करते जी गोदावरी संगमाशी होत नाही. दीना नदी ही मुख्य उपनदी आहे. इंद्रावती नदी भामरागड तालुक्यात कोवंडेजवळील महाराष्ट्रात प्रवेश करते आणि गोदावरीत प्रवेश करण्यापूर्वी 120 किमी अंतरावर दक्षिण-पूर्व सीमारेषा तयार करते. पर्लकोटा, पामुलगौतम आणि बंदिया या प्रमुख उपनद्यांची आहेत. सिरोंचा येथे वैनगंगा नदीसह गोदावरी नदीचे संगम; गोदावरी आणि इंद्रावती नदीचे सोमनूर येथे संगम व चमोर्शी तालुक्यात चपराला जवळ वर्धा आणि प्राणहिता नदीचे संगम; भामरागड येथे पर्लकोटा, पामुलगौतम आणि इंद्रावती (त्रिवेणी संगम) नदीचे त्रिवेणी संगम आहे. उपरोक्त व्यतिरिक्त, खालील नद्या जिल्ह्यातून वाहतात. गाढवी, खोब्रागडी, पाल वेलोचना, कठाणी, शिवणी, पोर, दर्शनी प्रमुख नद्या जिल्ह्यातून वाहणाऱ्या प्रमुख नद्या वैनगंगा, गोदावरी, प्राणहिता, दीना आहे. ह्या नदीच्या भागामध्ये पर्यटनाचा कोणत्याही प्रकारचा विकास झालेला दिसून येत नाही. गडचिरोली जिल्ह्यामध्ये निसर्गनिर्मित पर्यटनक्षेत्राचा वारसा लाभलेला आहे. या पर्यटनक्षेत्राचा विकास योग्यप्रकारे झाला तर या जिल्ह्यातील आदिवासी तरुण वर्गाला रोजगारा मध्ये संधी उपलब्ध होईल.          
                                        
        प्रा. डॉ. कैलास व्हि. निखाडे 
                                                              
निर्सग अभ्यासक
                                       
        9423638149, 94035109814
drkailasnikhade@gmail.com