Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

खून लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
खून लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, ऑक्टोबर १९, २०१८

 चंद्रपुरात धारधार शस्त्राने युवकाची हत्या

चंद्रपुरात धारधार शस्त्राने युवकाची हत्या

बल्लारपूर/प्रतिनिधी:
चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथे युवकाची धारधार शस्त्राने हत्या 
शिवीगाळ केल्याने करण्यात आली हत्या 
खून साठी इमेज परिणामबल्लारपूर शांती नगर येथील गणेश बंडु दाडंगे (17) हा गेल्या २ ते ३ दिवसापासून नगर परिषद समोर असणाऱ्या भंगार व्यवसाईक आरिफ मो. शरिफ शेख (30) याला शिवीगाळ करत असल्याने मनात राग धरून दसर्याच्या दिवशी संध्याकाळी पेपर मिल मागे बल्लारपूर-विसापूर मार्गावर चाकूने गळा कापून हत्या केली.या  हत्येनंतर आरोपीनेच बल्लारपूर पोलिसांना घटनेची माहिती देत स्वताला पोलिसांच्या स्वाधीन केले.लगेच आरोपीच्या सांगण्यावरून त्याला अटक करण्यात आली.घटनेनंतर अप्पर पुलिस अधीक्षक हेमराजसिंह राजपुत यांनी घटनास्थळी भेट दिली.या संपूर्ण खून प्रकरणात आणखी काही आरोपी असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.

महाराष्ट्रातील सर्वाधिक देखणे पोलीस स्टेशन असलेले शहर म्हणून बल्लारपूर पोलीस स्टेशनचे राज्याचे वित्त नियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते नुकतेच उद्घाटन झाले.या नंतर एका आठवड्यातच येथे खुनाची घटना घडली.

सोमवार, ऑक्टोबर १५, २०१८

 कुक्कटपालन व्यवसायात तोटा झाल्याने पत्नीचा खून करून स्वतः केली आत्महत्या

कुक्कटपालन व्यवसायात तोटा झाल्याने पत्नीचा खून करून स्वतः केली आत्महत्या


 

  उस्मानाबाद/प्रतिनिधी:
कुक्कटपालन व्यवसायात सातत्याने हो
पत्नीचा खून साठी इमेज परिणामरा तोटा, पावसाअभावी नापिकी, कर्ज कसे फेडायचे या नैराश्येतून शिराढोण (जि. उस्मानाबाद) येथील एका शेतकऱ्याने पत्नीचा खून करून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार शनिवारी (ता. १३) सकाळी उघडकीस आला.येथील शेतकरी रामभाऊ गुलाबराव यादव (वय 55) हे गेल्या सात ते आठ वर्षांपासून कुक्कुटपालन व्यवसाय करतात. या व्यवसायात त्यांची पत्नी सीताबाई यादव (वय 50) या मदत करतात. यादव कुटुंबाकडे शेतीसाठी व कुक्कुटपालन व्यवसायासाठी बँकेचे जवळपास साडेतीन लाख रुपयांचे कर्ज होते. हे पती- पत्नी शेतातस वास्तव्यास असतात. गेल्या तीन ते चार वर्षात पावसाअभावी नापिकीमुळे उत्पन्नात घट आली आणि कुक्कुटपालन व्यवसायत सातत्याने नुकसान व तोटा झाल्याने गेल्या काही दिवसांपासून हे पती- पत्नी तणावाखाली होते, असे त्यांच्या नातेवाईकांकडून सांगण्यात येत आहे. त्यातून आलेल्या नैराश्यामुळे रामभाऊ यादव यांनी मध्यरात्री झोपलेल्या पत्नीच्या डोक्यात हातोडा मारून खून केला व त्यानंतर स्वतःच्या शेतातील बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
याबाबतची माहिती मिळाल्यानंतर शिराढोण पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक माजीद शेख, पोलिस उपनिरीक्षक महेश कांबळे, पोलिस नाईक बाबासाहेब मोराळे, अमोल उंबरे, दयानंद गाडेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.



सोमवार, सप्टेंबर ०३, २०१८

नागपुरात खून

नागपुरात खून

भाच्यानेच केला मामाचा खून
लोखंडेनगर येथे मृतकाच्या घराजवळच घडली घटना 
 पप्पू ऊर्फ प्रवीण देवराव वंजारी (वय ३५) असे मृताचे नाव आहे.
कुख्यात पप्पू अट्टल गुन्हेगार होता
मृतकाच्या भाच्यानेच केली हत्या,घरघुती वादातून करण्यात आली हत्या  



शुक्रवार, ऑगस्ट २४, २०१८

 वर्ध्यात`बच्चा`चा खून; शौचालयाच्या टाक्यात आढळला मृतदेह

वर्ध्यात`बच्चा`चा खून; शौचालयाच्या टाक्यात आढळला मृतदेह

वर्धा/ विशेष प्रतिनिधी:

वर्धा येथील पुलफैल येथे राहणारा अट्टल गुन्हेगार `बच्चा` उर्फ मिलिंद सुभाष मेश्राम (वय ५१) याचा शुक्रवारी रात्री धारधार शत्राने वार करून त्याच्याच घरी खून करण्यात आला. खून केल्यानंतर त्याचा मृतदेह त्याच्या घरासमोरील शौचालयाच्या टाक्यातील पाण्यात टाकलेला आढळून आला .
पोलिसांनी या प्रकरणात संशयित म्हणून चार जणांना ताब्यात घेतले असून यात त्याच्या सावत्र मुलीचाही समावेश आहे.विशेष म्हणजे त्याच्या सावत्र मुलीनेच मृतदेह शौचालयाच्या टाकीतील पाण्यात असल्याचे सर्वांना सांगितले.
याशिवाय आरोपी बच्चाचे दोन दात पडले असल्याचे तपासात पुढे "बच्चा" मेश्राम याच्या शरीरावर तब्बल २५ हून अधिक घाव असल्याचे सांगण्यात येत आहे.तसेच खुनाच्या वेळी त्याचा गळा चिरल्याचे दिसत होते.छातीवरही
शत्राचे वार होते. यावरून त्याचा अत्यंत निघृणपणे खून केल्याचे स्पष्ट दिसत होते.
बच्चा उर्फ मिलिंद मेश्राम हा वर्धा येथील रेल्वेगाडीत चहा विक्रीचे काम करायचा. बच्चा या टोपण नावानेच त्याची ओळख होती.तो विशाखापट्टणम येथील कारागृहात १८ महिने बंदिस्त होता. दरम्यान या काळात त्याच्या पत्नीचे निधन झाले होत, तो महिन्यापूर्वीच तो वर्ध्यात परतला होता.मुली सोबतही मिलिंदचा नेहमी वाद व्हायचा. त्यामुळे ती नातेवाईकांच्या घरी राहायची. कालही तिचे वडिलांसोबत भांडण झाले होते. त्यामुळे ती गुरुवारीच नातेवाईकांकडे राहायला निघून गेली होती.पहाटे ती घरी आली तेव्हा तिला वडील घरी दिसले नाही.मात्र सर्वत्र रक्त व शितोडे दिसून आले. याच सोबत तेथे २ दात पडून असल्याचे दिसले.तिने सर्वत्र शोध घेतला,शोध घेत असतांना ती घरासमोरील शौचालयाच्या टाक्याजवळ गेली असता तिला वडिलांचा मृतदेह टाक्यात दिसून आला.
घटनेची माहिती मिळताच पोलिस श्वानपथकाश दाखल झाले. उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेश कोल्हे, ठाणेदार चंद्रकांत मदने सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले.व मृतदेह शवचिकित्सेकरीता जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविला.



शनिवार, जुलै २१, २०१८

कुऱ्हाडीने वार करून सख्या भावानेच केली भावाची हत्या

कुऱ्हाडीने वार करून सख्या भावानेच केली भावाची हत्या

 ललित लांजेवार:
वारंवार होणाऱ्या भांडणातून चिडलेल्या लहान भावानेच सख्या मोठ्या भावाची कुऱ्हाडीने सपासप वार करून हत्या केल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस येथील नकोडा येथे शुक्रवारी घडली. 
बिसु शिवानंद शर्मा असे मृत व्यक्तीचे नाव असून आरोपी लहान भाऊ दिपक शिवानंद शर्मा याला घुग्गुस पोलिसांनी अटक केली आहे. मोठा भाऊ हा तापट,उर्मट,व गुंड प्रवृत्तीचा असल्याने मोठा भाऊ बिसु व लहान भाऊ दीपक यांच्यात नेहमी वाद व्हायचे,हा वाद जास्तच विकोपाला जात असे,शुक्रवारी देखील बिसुने दिपकशी भांडण केले व झोपी गेला.अश्यातच राग धरून असलेल्या लहान भाऊ दीपकने त्याला जीवनेशी मारण्याचा मनात कट रचला व बिसू गाढ झोपेत असतांना घरातील कुऱ्हाडीने त्याच्या डोक्यावर व मानेवर सपासप वार केले.
या हल्ल्यात बिसुचा जागीच मृत्यू झाला व दिपकने घरातून पळ काढला.घरचे इतर व्यक्ती कामानिमित्य बाहेर गेले होते ते घरात येताच बिसू रक्ताने माखलेला दिसताच आरडा ओरड करण्यात आली व यांची माहिती घुग्गुस पोलिसांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सत्यजित आमले हे आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा केला. तसेच आरोपीवर गुन्हा दाखल करुन आरोपीच्या शोधात पथक रवाना करण्यात आले.शेवटी रात्री उशिरापरीयंत दिपकला नकोडा परिसरातुन अटक करण्यात आली.सदर घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सत्यजित आमले यांच्या नेतृत्वात PSI राहुल थांगणे,संतोष धांडेवार,गोपाल अतकुलवार,सचिन बोरकर,विनोद वनकर,सुधीर मत्ते करीत आहेत.