Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, जुलै २२, २०२३

घाटबोरी शेत शिवारात शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू





संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.२२ जुलै:-
सडक अर्जुनी तालुक्यात शुक्रवारी (ता.२२)सकाळ पासूनच पाऊस होता.पाऊस सकाळी,दुपारी व सायंकाळी पडला.
दुपारच्या वेळेला विजांच्या कडकडाटासह पडला.
तालुक्यातील घाटबोरी/तेली येथील ओमदास सखाराम वाघाडे  (वय ५५ वर्षे) यांचा दुपारी  अडीच वाजता च्या दरम्यान  शेतात रोवणी सुरू असताना विज पडून मृत्यू झाला. घाटबोरी/तेली वरून दोन किलोमिटर अंतरावरील घाटबोरी/कोहळी शेतशिवारात
रोवणी सुरू होती.येथे 
मृतक शेतात एका बांधीत  फन मारत होता.तर दुसऱ्या बांधीत महिला रोवणी करीत होत्या.अचानक दुपारला
विजेच्या गडगडासह  पाऊस पडला. विज  मृतकाच्या अंगावर पडली.जागीच त्यांचा मृत्यु झाला.परंतु,त्यात दोन बैल,पाच महिला,त्यांचा एक मुलगा व पुतण्या थोडक्यात बचावले.वेळीच शेतावर काम करणारे महिला पुरुष गोळा झाले.त्यांना पत्नी व दोन मुले आहेत.  मृतकाची  माहिती होताच घटनास्थळी तलाठी पोहचले व माहिती घेतली.तसेच डूग्गीपार
पोलिसांनी पंचनामा केला. शवविच्छेदनासाठी सडक अर्जुनी येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.