Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, मार्च ०१, २०२१

अन्नत्याग सत्याग्रहाच्या समर्थनार्थ 25 जणांनी केले आत्मक्लेश सामूहिक मुंडन



चंद्रपूर/ प्रतिनिधी

रामाळा तलावाच्या संरक्षणार्थ बंडू धोतरे यांनी सुरू केलेल्या अन्नत्याग सत्याग्रहाला सोमवारी आठ दिवस उलटून गेल्यानंतरही प्रशासनाने दखल न घेतल्याने पाठिंबा देण्यासाठी आंदोलनाच्या समर्थनार्थ 25 जणांनी मुंङण केले.
सोमवारी दिवसभरात शहरातील विविध संस्था, संघटना आणि राजकीय पदाधिका-यांनी भेटी देऊन पाठिंबा दिला. रामाळा तलावातील जलप्रदूषण आणि इको प्रोने केलेल्या मागण्यासंदर्भात बंङू धोतरे यांच्याशी चर्चा केली. मागील आठ दिवसांपासून सुरु असलेल्या अन्नत्याग सत्याग्रहाला पाठिंबा देण्यासाठी 25 जणांनी मुंङण केले. आत्मक्लेश सामूहिक मुंडन आंदोलनात स्वतः बंडू धोतरेसह इको प्रोचे नितीन बुरडकर, धर्मेंद्र लुनावत, संजय सब्बनवार, हरिदास कोराम, सुमित कोहळे, अमोल उट्टलवार, कपिल चौधरी, हरीश मेश्राम, जयेश बैनलवार, सुनील मीलाल, दत्ता सरोदे, सचिन धोतरे, गौरव झोडे, सुनील पाटील, आशिष मस्के यांचा समावेश होता. या सत्याग्रहाला समर्थन व पाठिंबा देत महाराष्ट्र नाभिक संघटन चंद्रपूर यांनी सामूहिक मुंडन केले. यात रवी येसेकर, मशेष आंबेकर, रमेश चौधरी, प्रणिल वाटेकर, रोहित कडुकर, बंडू चौधरी, राजेश मालवीय, वासुदेव कडवे, जामुवंत निंबाळकर यांचा समावेश होता. 
आजही शहरातील संघटना, राजकीय पदाधिका-र्यांनी उपोषण मंङपाला भेट देत पाठिंबा दिला. यात भारतीय जनता महिला मोर्चा, युवा चेतना मंच, रोटरी क्लब ऑफ स्मार्ट सीटी चंद्रपूर, ज्ञानदा शिक्षण संस्था, पर्यावरण मंच, नुटा चंद्रपूर युनिट, बुध्दिस्ट वुमेन्स फाऊंडेशन, गुरू रविदास फाऊंडेशन, श्री वेदमाता गायत्री ट्रस्ट, श्री माता कन्यका बगिचा ग्रूप, संस्कार भारती, विकलांग सेवा संस्था, माहिती अधिकार, पोलिस मित्र, पत्रकार संरक्षण सेना आदींसह तिरवंजा ग्रामपंचायत उपसरपंच प्रशांत कोपूला यांनी पाठिंबा दिला.  




लोकमान्य टिळक कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनी केली रामाळाच्या रक्षणार्थ 'मानवी साखळी'

इको प्रोचे अध्यक्ष बंडू धोतरे यांच्या अन्नत्याग सत्याग्रह उपोषणाला जाहीर पाठिंबा देण्यासाठी आठव्या दिवशी लोकमान्य टिळक कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनी एकत्रित येत रामाला तलाव वाचविण्यासाठी 'मानवी साखळी' तयार केली.
रामाला तलाव संवर्धन करिता सुरू असलेल्या बंडू धोतरे यांच्या अन्नत्याग सत्याग्रह आंदोलनास आपले समर्थन जाहीर करीत घोषणा दिल्या. आज उपोषणाचा आठवा दिवस आहे. यावेळेस विद्यार्थिनींनी रामाळा  तलावाचे प्रदूषण आणि भविष्याबद्दल चिंता व्यक्त केली.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.