Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, नोव्हेंबर २४, २०२०

सुरक्षित राहा:दुसऱ्या लाटेत कोरोनापासून बचावासाठी खबरदारी घ्या

 
चंद्रपूर :  

महाराष्ट्रातील महाविकास आघाडीने जनहितार्थ विशेष अधिवेशन बोलावून कोरोना महामारीची दुसरी लाट थोपविण्यासाठी अधिक सतर्कतेने नवीन दिशानिर्देश जरी करणे अत्यंत गरजेचे असून महाराष्ट्रातील जनतेला कोविड १९ चे संकटातून वाचवावे अशी विनंती चंद्रपूर - वणी- आर्णी लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार बाळू धानोरकर यांनी मुख्यमंत्राकडे पत्राद्वारे केली आहे.

देशातील सर्वच राज्यामध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ होत असल्याचे निदर्शनास येत आहे. राजस्थान, गुजराथ, दिल्ली या ठिकाणी पुन्हा एकदा कोरोना महामारी उग्ररूप धारण करीत आहे. या पाश्वभूमीवर नागरिकांनी कोविड १९ नियमावलीचे अतिदक्षतेने पालन करून सोशल डिस्टन्स, मास्क, सॉनिडायझरचा नियमित वापर बंधनकारक करावा. 

नव्याने कोरोना रुग्णवाढ होत असल्यामुळे राज्यात शिथिल करण्यात आलेले निरबंध पुन्हा लावल्या जाऊ शकतात असे संकेत राज्य शासनाकडून दिले गेले आहेत. या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपासून बचाव करण्यासाठी सर्वानी 'नो मास्क नो एन्ट्री' मोहीम हाती घेणे गरजेचे आहे. नागरिकांनी देखील खबरदारी घेण्याचे आवाहन खासदार बाळू धानोरकर यांनी केले आहे.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.