Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, जानेवारी ३०, २०२०

वर्धा:आर.एस.एसला आता कुठे गांधी आठवत आहेत: महादेव विद्रोही

सेवाग्राम आश्रमासमोर उपवास सत्याग्रह
वर्धा/प्रमोद पानबुडे:
सन 2002 पर्यंत आर एस एस च्या कार्यालयात कधी राष्ट्रीय झेंडा फडकला नाही, आणि कधी महात्मा गांधी ची जयंती साजरी झाली नाही.आताकुठे त्यांना गांधी आठवत आहे. कारण गांधीशिवाय जगात काही चालत नाहिए,जगात भारत देशाला गांधींच्या नावाने ओळखले जाते.

गोडसे अथवा शहाच्या नावाने ओळखले जात नाही अशी टीका सर्व सेवा संघाचे अध्यक्ष महादेव विद्रोही यांनी केली आहे. सेवाग्राम आश्रम समोर एन आर सी च्या विरोधात उपोषण सत्याग्रह करण्यात येत आहे.

गांधीवादी कार्यकर्ते तसेच पदाधिकारी या सत्याग्रहात सहभागी झाले आहेत. देशात सर्वत्र सी ए ए आणि एन आर सी ला विरोध होत आहे, महात्मा गांधी यांनी देखील दक्षिण आफ्रिकेत आशा कायद्याना विरोध केला होता, आता या देशात असा कायदा येत आहे त्याचा विरोध आवश्यक आहे.



SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.