Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, डिसेंबर २१, २०१९

ओबीसींच्या जातिनिहाय जनगणनेचा विषय केंद्राकडे रेटून धरा

डॉ ऍड अंजली साळवे विटणकर यांचे विधिमंडळ सदस्यांना साकडे
नागपूर/प्रतिनिधी:

जनगणना 2021 मध्ये ओबीसींची स्वतंत्र जातिनिहाय स्वतंत्र जनगणना करण्याची मागणी केंद्र शासनाकडे रेटून धरण्याच्या विनंतीचे निवेदन ‘जनगणना 2021 मध्ये ओबीसीचा कॉलम नाही म्हणून, आमचा जणगणनेत सहभाग नाही’ अश्या "पाटी लावा" आंदोलनाच्या प्रणेता डॉ ऍड अंजली साळवे विटणकर यांनी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, राज्याचे गृह तथा नगरविकास मंत्री नामदार एकनाथ शिंदे, ग्रामविकास व सामाजिक न्यायमंत्री नामदार छगन भुजबळ, महसुल तथा ऊर्जामंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांचेसह आमदार विजय वडेट्टीवार, प्रणिती शिंदे, बच्चु कडू, रोहीत पवार, किशोर जोरगेवार यांच्यासह अनेक विधिमंडळ सदस्यांना देत लोकशाहीच्या संसद, न्यायपालिका, प्रशासन आणि प्रसारमाध्यमे याचारही स्तंभासोबतच आपन उभारलेल्या लोकचळवळीला (पाटी लावा मोहीम) बळ देण्याची विनंतीही त्यांनी आपल्या निवेदनातून केली आहे.

2021 मध्ये होणा-या जनग़ननेच्या नमुना अर्जात ओबीसीसाठी स्वतंत्र कॉलम नसणे हा ओबीसींच्या संविधानिक अधिकाराची गळचेपी असून याविरोधात डॉ ऍड अंजली साळवे विटणकर यांनी पुढाकार घेत उच्च न्यायालयात (नागपूर खंडपीठ) मध्यस्थी अर्ज दाखल करून जनगणना 2021 ला आव्हान दिले आहे. आपल्या या न्यायालयीन लढ्याला राज्यातील जनसामान्य ओबीसी बांधवांनी पाठिंबा दिला आहे. याशिवाय ‘जनगणना 2021 मध्ये ओबीसीचा कॉलम नाही म्हणून आमचा जणगणनेत सहभाग नाही, अशी "पाटी लावा" मोहीम डॉ ऍड साळवे यांनी 26 नोव्हेंबर पासून स्वतःच्या घरावर पाटी लावून सुरू केली आहे. 

विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा या जिल्ह्यात ‘पाटी लावा’ मोहीम लोकचळवळीचे रुप धारण करीत असून ओबीसी बांधव यात स्वयंस्फ़ुर्तीने सहभागी होत असल्याची माहिती डॉ ऍड अंजली साळवे विटणकर यांनी आपल्या निवेदनातून दिली आहे. 

आपल्या आवाहनाला प्रतिसाद देत चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे खासदार बाळू धानोरकर यांनीही लोकसभेच्या नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान मांडून संपुर्ण देशाचे लक्ष या ज्वलंत विषयाकडे वळविल्याची माहिती डॉ साळवे यांनी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, नामदार एकनाथ शिंदे, नामदार छगन भुजबळ, नामदार बाळासाहेब थोरात यांचेसह आमदार विजय वडेट्टीवार, प्रणिती शिंदे, बच्चु कडू, रोहीत पवार, किशोर जोरगेवार यांचेशी झालेल्या चर्चेदरम्यान दिली.

महाराष्ट्रातील सर्वपक्षिय नेत्यांनी ओबीसीची स्वतंत्र जनगणना करण्याची मागणी केंद्र शासनाकडे रेटून धरण्याची विनंती डॉ ऍड साळवे यांनी आपल्या निवेदनात केली असून त्यांच्या या प्रयत्नांची प्रशंसा करीत राज्यातील अनेक लोकप्रतिनिधींनी हा विषय केंद्र शासन स्तरावर लावून धरण्याचे आश्वासन दिले आहे. 

डॉ ऍड अंजली साळवे विटणकर
मोबाईल क्रमांक – 9158724082
ईमेल – anjali_sv@yahoo.com

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.