Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, डिसेंबर १२, २०१९

ओबीसींचा लढा संसदेत:खा.धानोरकर यांनी केली ओबीसीच्या स्वतंत्र जनगणनेची मागणी

डॉ ऍड अंजली साळवे विटणकर यांच्या "जनगणना 2021 मध्ये ओबीसीचा कॉलम नाही म्हणून आमचा जणगणनेत सहभाग नाही" ला उत्स्फूर्त प्रतिसाद
नागपूर/प्रतिनिधी:
ओबीसींची स्वतंत्र जनगणना वगळून सरकारने सातत्याने मागासवर्गियांना त्यांच्या संविधानिक अधिकारापासून वंचित ठेवले आहे मात्र, 2021 मध्ये होणा-या जनगणनेत ओबीसींची स्वतंत्र जनगणना करून समाजातील वंचित घटकांना न्याय देण्या्ची मागणी खासदार सुरेश धानोरकर यांनी आज (दि. 11 डिसेंबर) लोकसभेत केली. याचसोबत अंजली साळवे यांनी सुरु केलेल्या 'पाट्या लावा' मोहिमेला सामान्य नागरिकांकडून मिळत असलेल्या जनगणना २०२१ ला जनतेद्वारे स्वयंस्फ़ुर्त असहभाग प्रतिसादाचा विशेष उल्लेखही खासदार धानोरकर यांनी लोकसभेतील आपल्या प्रश्नात केला. 
ओबीसीची स्वतंत्र जनगणना वगळल्याने उच्च न्यालायत मध्यस्थी अर्ज दाखल करीत जनगणना 2021 ला आव्हान देणा-या व 26 नोव्हेंबर पासून "जनगणना 2021 मध्ये ओबीसीचा कॉलम नाही म्हणून आमचा जणगणनेत सहभाग नाही" अशी पाटी लावा मोहीम राबविणा-या डॉ ऍड अंजली साळवे विटणकर यांनी ओबीसी संघटनांनी हा विषय संसदेत उचलून धरण्यासंदर्भातील निवेदन त्यांच्या क्षेत्रातील सर्वपक्षिय खासदारांना देण्याची विनंती केली होती. 

याशिवाय त्यांनी स्वत: याबाबत स्वतंत्रपणे अनेक खासदारांनाही याबाबत विनंती केली होती. याशिवाय यासंदर्भात खासदारांना द्यावयाच्या निवेदनाचा नमुनाही फ़ेसबुक आणि वॉट्सअप सारख्या समाज माध्यमातून सर्व ओबीसी संघटनांना उपलब्ध करून दिला होता. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक ओबीसी संघटनांनी त्यांच्या भागातील खासदारांना हा विषय संसदेत मांडण्याबाबत निवेदन दिले. महाराष्ट्रातील काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांनी डॉ साळवे यांच्या आवाहनाची दखल घेत यासंबंधी डॉ, साळवे यांचेशी सविस्तर चर्चा करून ओबीसी जनगणनेचा मुद्दा आज (दि. 11 डिसेंबर) संसदेत उपस्थित करीत सर्वांचे लक्ष वेधले.

यापुर्वी सुद्धा महाराष्ट्रातील अनेक विषय खासदार धानोरकरांनी संसदेत हिरिरिने मांडले आहेत. 2021 मध्ये ओबीसीची स्वतंत्र जणगणना होणे गरजेचे आहे आणि बऱ्याच वर्षांपासून ही जनगणना सरकारद्वारे केल्या जात नसल्याने ओबीसींमध्ये असंतोष आहे, याच मुद्द्याकडे खासदार धानोरकरांनी संसदेचे लक्ष वेधत संविधानाच्या कलम 340, 16(4) तसेच जनगणना कायद्यानुसार देशातील राज्यनिहाय जनतेची संख्या माहिती करणे, तसेच वर्ग, जाती, उपजाती आणि इतर माहिती सरकारद्वारे गोळा केली जाते व याच माहितीच्या आधारावर जनतेसाठी शासकीय धोरण व नियोजन केले जाते, परंतु स्वतंत्र जनगणना होत नाही त्यामुळे सरकार जवळ मागासवर्गीय घटकांचा नेमका आकडाच नसतांना एवढी वर्ष कुठल्या आधारावर या घटकांसाठी नियोजन केले जात आहे हे एक कोडंच असून हा मागासवर्गियांना त्यांच्या संविधानिक अधिकारापासून वंचित ठेवण्याचा प्रकार असल्याच्या डॉ ऍड साळवे व इतर संघटनांच्या या मागणीकडे खासदार धानोरकरांनी संसदेच्या निदर्शनास आणले. तसेच सरकारद्वारे 2021 च्या जनगणने मध्ये भारतीय राज्य घटनेच्या कलम 16(4), 340 व जनगणना कायदा 1948 च्या उद्देशानुसार जाहीर केलेल्या प्रश्नावलीत, जोपर्यंत जातीनिहाय ओबीसी, व्हीजे, एनटी, डीएनटी, एसबीसी या मागासवर्गीयांच्या गणनेचा उल्लेख होत नाही तोपर्यंत जनगणना 2021 ला स्थगीत करावे. सोबतच जनगणना 2021 च्या प्रश्नावलीत ओबीसी, व्हीजे, एनटी, डीएनटी, एसबीसी या मागासवर्गाचा स्वतंत्र उल्लेख करून या वर्गाची जातीनिहाय गणना करण्याची मागणीही त्यांनी लोकसभेत केली.

सरकारतर्फ़े ओबीसी जनगणनेचा विषय अनेक वर्षांपासूण अडगळीत टाकल्या गेल्याने ओबीसीचे आंदोलन सुरू असू विदर्भात डॉ अंजली साळवे यांच्या "जनगणना 2021 मध्ये ओबीसीचा कॉलम नाही म्हणून आमचा जणगणनेत सहभाग नाही" अश्या पाट्या लावून असहयोग आंदोलन सुरू झाले आहे असा विशेष उल्लेख खासदार धानोरकरांनी संसदीय प्रश्नात उल्लेख केला.

राज्यात अनेक खासदार असतांना पहिल्यांदाच निवडून आलेले खासदार धानोरकरांनी हा विषय मांडून ओबीसीचा आक्रोश संसदेत मांडला व 2021 च्या जनगणनेत ओबीसीची जातनिहाय जनगणनेची मागणी करत जननेता म्हणून पुढाकार घेतल्याने डॉ ऍड अंजली साळवे यांनी त्यांच्यासह सर्व संघटनाचे आभार मानले असून लोकहिताचे प्रश्न संसदेत तळमळीने मांडण्यासाठी जनतेने खासदार धानोरकरांसारखेच नेते संसदेत निवडून द्यावे असे आवाहनही डॉ साळवे यांनी केले आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.