Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, ऑगस्ट ०३, २०१९

महाजनादेश यात्रेनिमित्त ५ ऑगस्टच्या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित रहा

  भाजपा तालुकाध्यक्ष अविनाश पाल  यांचे आवाहन

सावली/प्रतिनिधी:- 

राज्याला प्रगतिपथावर आणणारे आपल्या राज्याचे लाडके लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस यांची महाजनादेश यात्रा दिनांक 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट दरम्यान संपूर्ण राज्यात फिरणार असून दिनांक ५ ऑगस्ट २०१९ रोजी सावली तालुक्यातील व्याहाड खुर्द येथे सकाळी ९ वाजता या यात्रेचे आगमन होणार  आहे .यानिमित्ताने मा. मुख्यमंत्री यांच्या  स्वागत  सभेचे आयोजन राष्ट्रीय महामार्ग व्याहाड खुर्द   येथे करण्यात आले  असून या सभेला राज्याचे वित्त नियोजन व  वनमंत्री  तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार, अदिवासी विकास व वन  राज्यमंत्री  तथा भंडाऱ्याचे पालकमंत्री परिणयजी  फुके, मा. आमदार रामदासजी आंबटकर प्रदेश सरचिटणीस भाजपा, गडचिरोली - चिमुर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोकजी नेते, भाजपा जिल्हा अध्यक्ष हरीशभैया शर्मा, जिल्हा परिषद अध्यक्ष देवरावभाऊ भोंगळे, माजी आमदार अतुलभाऊ देशकर,तसेच जिल्ह्यातील सर्व सभापती/ उपसभापती,  नगराध्यक्ष, जि. प./ प.स. सदस्य  यांच्यासह सर्व वरिष्ठ पदाधिकारी सहभागी होणार आहेत.

पुन्हा नव महाराष्ट्र घडविण्याच्या हेतूने पुन्हा आणू या आपले सरकार या निर्धाराने येणाऱ्या यात्रेच्या निमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री मा ना देवेंद्रजी फडणवीस यांची महाजनादेश यात्रा आपल्या सावली तालुक्यातील व्याहाड खुर्द येथे येत आहे आपण या यात्रेचे स्वागत करण्यासाठी व यात्रेनिमित्य आयोजित स्वागत  सभेला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे सावली तालुका अध्यक्ष अविनाशभाऊ पाल यांनी केले आहे.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.