Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, फेब्रुवारी २०, २०१९

चंद्रपूर अगरबत्ती प्रकल्पाची आज सुरूवात


चंद्रपूर दि. 20 फेबुवारी : चांदा ते बांदा योजनेतून जिल्ह्यातील महिलांना आर्थिक सबळीकरण देण्यासाठी उद्या जगप्रसिद्ध आयटीसी लिमिटेड या कंपनीसोबत बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्रामार्फत करार करण्यात आल्यानंतर चंद्रपूर अगरबत्ती प्रकल्पाला पोंभूर्णा येथे सुरुवात होत आहे. राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार उद्या या प्रकल्पाचे उद्घाटन करणार आहेत.

या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर राज्यमंत्री दीपक केसरकर, वन विकास मंडळाचे अध्यक्ष चंदनसिंग चंदेल, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, आयटीसी या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवी रायवरम तसेच महाराष्ट्र बांबू विकास मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक टी.एस.के. रेड्डी उपस्थित राहणार आहेत.

महिला बचत गटांच्या मार्फत चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अगरबत्ती प्रकल्प सुरू करण्याबाबतचे सुतोवाच ना. सुधीर मुनगंटीवार यांनी केले होते. प्रसिद्ध आयटीसी कंपनी यांच्या सहकार्याने आता हे काम पोंभुर्णा तालुक्यामध्ये सुरू झाले आहे. उद्या या प्रकल्पाचे उद्घाटन होत आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून मोठ्या संख्येने महिलांना उद्योग मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. उद्याच्या या कार्यक्रमाला पोंभुर्णा पंचायत समितीच्या सभापती अलकाताई आत्राम, पोंभुर्णाच्या नगराध्यक्षा श्वेता बनकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष राहुल संतोषवार, आयटीसी लिमिटेड शाखा व्यवस्थापक बिजीत सिद्धार्थ, यांच्याशिवाय मुख्य वनसंरक्षक एस. व्ही. रामराव, एफडीसीएम महाव्यवस्थापक ऋषिकेश रंजन,वनसंरक्षक एन.आर.प्रवीण, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी,आयटीसीचे आशिष मुरलीधर, वि.बालकृष्णन आदी उपस्थित राहणार आहे. दुपारी तीन वाजता होणाऱ्या या सोहळ्याला मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे संचालक राहुल पाटील यांनी केले आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.