Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, डिसेंबर ०५, २०१८

दुष्काळी भागात चारा छावण्या सुरू कराव्यात*  : महावीर जैन

खबरबात, धुळे/गणेश जैन

बळसाणे  :  साक्री तालुक्यातील माळमाथा परिसरात गंभीर स्वरूपाचा दुष्काळ निर्माण झाला असून अशा भयानक परिस्थीतीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासन टाळाटाळ करत आहे पिण्याच्या पाण्याबरोबर च आपल्या पाळीव प्राणांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे या परिसरात सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना पशूधन वाचविणे किंवा त्यांचे पोषण करणे अवघड झाले आहे माळमाथा भागात तातडीने चारा छावण्या सुरू कराव्यात किंवा चाऱ्यासाठी थेट अनुदान सरकारने द्यावे अशी मागणी शिवसेनेचे साक्री तालुका उपप्रमुख महावीर जैन यांनी केली*
  माळमाथा परिसरात पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे वाढत्या पाणी टंचाई ने बहुतांशी गावांवर दुष्काळाची छाया गडद झाली आहे पाण्याअभावी शेतातली पीके करपली आहेत येत्या काही दिवसात पिण्याच्या पाण्याची गंभीर प्रश्न उदभवेल असे चिन्हे दिसत आहे राज्यसरकार कडून धुळे जिल्ह्यातील काही तालुके दुष्काळ म्हणून जाहीर करण्यात आले आणि साक्री तालुक्यातील उर्वरीत भाग  दुष्काळी यादीत समावेश झाल्याची घोषणा करण्यात आली पण दुसाणे सर्कल अजून दुष्काळाच्या यादीत नाही तरी दुसाणे सर्कलातील गावांना दुष्काळी यादीत सामावून घ्यावे व पाळीव प्राण्यांकरिता चाऱ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी छावण्या सुरु कराव्यात अशी मागणी बळसाणे येथील शिवसेना तालुका उपप्रमुख महावीर जैन यांनी केली आहे

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.