Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, नोव्हेंबर २७, २०१८

सततच्या नापिकीमुळे शेतकऱ्यानी केली आत्महत्या

उमेश तिवारी/कारंजा (घा)


 सततच्या नापिकीमुळे व कर्ज बजारीपणामुळे सावळी खुर्द येथील विश्वास चंद्रभानजी कडवे वय ५१ वर्ष या शेतकऱ्याने आज दि.२७/११/१८ रोजी दुपारी १:३० वा त्याच्याच शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. 
      पोलिसांना घटनेची माहिती मिळता पंचनामा करून मृतकाचे प्रेत आरोग्य तपासणी करीता कारंजा येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. 
         मृतकाचे मागे पत्नी,मुलगा,मुलगी,आई,वडील असा परिवार आहे. त्यांच्याकडे ३ एकर शेती आहे. कर्ज ७०हजार आहे असे वृत्त आहे. पुढील तपास कारंजा पोलीस करीत आहे.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.