Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, ऑक्टोबर १०, २०१८

अन शेतकऱ्याचे संपूर्ण घरच जाळून झाले खाक

१.५ लाख रुपयाचे नुसकान;शेतकरी झाला बेघर


प्रतिनिधी/कारंजा (घाडगे):
सेलगाव (लावणे) येथिल शेतकरी केशवराव चोपडे यांच्या घराला सकाळी १० ते ११ च्या सुमरात अचानक आग लागली या आगीमध्ये घरातील संपूर्ण वस्तू जळुन खाक झाल्या. 
विशेष म्हणजे घरातील संपूर्ण अन्न दाळ दाना व कपडे या सारखे जीवनावश्यक वस्तूदेखील जळुन खाक झाल्या. सेलगाव येथील सरपंच हनुमंतराव पठाडे यांनी तहसीलदार यांचेशी संपर्क साधून घटनेची संपूर्ण माहिती दिली . या घराला लागलेली धकधकती आगेची आस हि घरच्या लगतच्या ३,४ घराला लागली असून आगीचे कारण कळु शकले नाही. 
अथक परीश्रमा नंतर गावकऱ्यांच्या मदतीने आग आटोक्यात आली या आगीमुळे १.५ लाख रुपयाचे शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे. त्यांच्या मागे २ मुले १ मुलगी आणि पत्नी असा परिवार असून त्यांच्याजवळ ४ एकर शेती असून लागलेल्या आगीमुळे चोपडे कुटुंबीय बेघर झाले आहे.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.