Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, ऑगस्ट २३, २०१८

शेतकऱ्यावर अस्वलीचा हल्ला;कुत्र्याने झडप घालून वाचविले मालकाचे प्राण

उमेश तिवारी/कारंजा(घाडगे)
 मौझा सुसुंद्रा तालुका कारंजा घाडगे जिल्हा वर्धा येथे अस्वलाचा धुमाकूळ मौझा सुसुंद्रा येथे श्री वासुदेव नामदेवराव मसोदकर वय 26   हा आज दिनांक ला शेतात बैल चारण्याकरिता गेला असता त्यांच्यावर अस्वलाने अचानक हल्ला केला सुदैवाने त्यांच्या सोबत कुत्रा असल्यामुळे त्यांना पळण्यास यश आले सदर शेतकर्यांजवळ 5एकर शेती असून ती कसाबसा उदरनिर्वाह करतो घरी 4लोकांचे कुटुंब असून सगळे शेतीवर अवलंबून आहे,त्यात अस्वलाने धुमाकूळ घातल्याने शेतात वन्यप्राण्यामुळे पिकांची जागल करणे सुद्धा कठीण झाले आहे,दिवसाधवढ्या वेळी जर अस्वल अंगावर शिरत असेल तर रात्री जागल करणे तर खूब कठीण झाले आहे.
आज कुत्राच्या मदतीमुळे त्याला पळणे शक्य झाले परंतु असे किती दिवस चालणार हा विचार शेतकऱ्यांचा मनात पडू लागला,हे दिवस शेतकर्यांच्या पिकांचे आहे आणि दरवर्षी अशाच वेडेस अस्वल जंगलात सोडली जाते,असा प्रकोप शेतकऱ्यानं सोबतच का?दिनांक 20/08/2018रोजी धाडी तालुका आष्टी येथे गुराखी गुर चारण्यास गेला असता त्यांच्यावर सुद्दा याच अस्वलाने हल्ला करून त्याला ठार केले शासन मदत म्हणून मोबदला देते पण जीव नाही हा विचार शासनाने करून त्वरित यावर उपाययोजना करून याच खुंखार अस्वलीला जेरबंद करावे अशी मागणी सुसुंद्रा वासीयकडून होत आहे.



SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.