Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, ऑगस्ट १६, २०१८

गोठा जळून दोन बैल ठार

कारंजा (घा.)उमेश तिवारी/प्रतिनिधी:
कारंजा घाडगे दि १६ आॅगष्ट  येथील खर्डीपुरा परीसरातील गावाबाहेरील सुरेश कुरवाडे यांचे मालकीचे जनावरांच्या गोठ्याला रात्री १२ वाजताचे दरम्यान आग लागल्याची घटना घडली.या आगीत  दोन बैल जळून मृत्यूमुखी पडले  असून एक गाय व एक वासरू जळाल्यामुळे गंभीर जख्मी झाले .  या आगीत अंदाजे दिड लाखाचे नुकसान झाले.घटनेचे वृत्त समजताच परीसरातील नागरीकांनी घटनास्थळाकडे धाव घेत मिळेल तेथून पाणी आणून आग विझविली.या आगीत शेतीला  लागणारी असणारे,लाकुडफाटा,औषधी , कवेलू जळाल्याने बरेच नुकसान झाले. तहसीलचे कारंजा मंडळ निरीक्षक पी.के.आत्राम यांनी घटनास्थळावर जाऊन पंचनामा केला.पोलीसा तर्फे घटनेचा तपास करण्यात येत  आहे. आगीचे कारण मात्र कळू शकले नाही.



SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.