Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, जुलै १२, २०१८

कुणी घर देता का घर, वृद्ध महिला घरकुल योजनेपासून वंचित

चंद्रपुर/प्रतिनिधी:
सिंदेवाही तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या पेंढरी (कोके) येथील ओबीसी व इतर लाभार्थी घरकुलापासून आजही वंचित आहेत. यात येथील अंत्योदय योजनेचा लाभ घेत असलेल्या व निराधार मायाबाई दादाजी शेंडे यांचे घर पडण्याच्या स्थितीत असतानाही त्यांना शासनाकडून घरकूल योजनेचा लाभ मिळालेला नाही. मुसळधार पावसात त्यांचे घर कोसळल्यास मोठा धोका उद्भवण्याची शक्यता निर्माण झाली आहे.त्यांचे मातीचे व कुळाचे घर दोन्ही बाजुने खचले आहे. भिंतींना मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. मात्र पर्याय नसल्याने त्या अजुनही आपल्या कुटुंबासह पडक्या घरातच राहतात. पावसाळ्यात घर पडले आणि त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना इजा झाल्यास कोण जबाबदार असे कुटुंबीयांनी सांगितले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.