Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, जून ०६, २०१८

कारंजाच्या युवकांचे तहसीलदारांना निवेदन

  वाढते अपघात टाळण्यासाठी केली गतिरोधक निर्मितीची मागणी
कारंजा (घा)/प्रतिनिधी:
 कारंजा हे शहर तालुक्याचे ठिकाण असून या शहरातील मध्य वस्तीतून महामार्ग क्रमांक ६  जातो.या मार्गावरून नेहमीच वाहने वेगाने जातात.शासकीय कार्यालयाचा व नागरिकांच्या दैनंदिन कार्याकरिता जाण्यायेण्याचा मग देखील एकच आहे, त्यामुळे प्रत्तेक दिवशी एका निरअपराध्याचा या शहरातून जाणार्या मार्गावर बळी जात आहे. या मार्गावर अपघात प्रमाण वाढले असून याला आळा बसला पाहिजे यासाठी  नारा टी. पॉईंट ते स्मशानभूमी प्रयन्त ब्रेकर तयार करावे अशीं मागणी कारंजा येथील युवकांनी तहसीलदार यांचे मार्फत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे सह आमदार अमर काळे, माजी आमदार दादाराव केचे यांना निवेदनातून  करण्यात आली .कारंजा शहरातून रस्ता ओलांडताना शाळकरी मुले, नागरिकांना जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागतो. या मागणीची त्वरित नोंद घेऊन तत्काळ हि मागणी पूर्ण करावी.अशी विनंती या निवेदनात करण्यात आली आहे. 




SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.