Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, जून ३०, २०१८

चंद्रपूर वीज केंद्रातील संच होऊ शकतात बंद

संबंधित इमेजचंद्रपूर/प्रतिनिधी:
 चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राला पाणी पुरवठा करणाऱ्या इरई धरण कोरडे पडल्यामुळे येत्या 15 जुलैपासून ते बंद करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी यांनी घेतला आहे.तीन हजार मेग़ावॅट वीज निर्मिती क्षमता या केंद्राची आहे. ते बंद झाल्यास राज्यात वीजेचे संकट निर्माण होऊ शकते. याचा धरणावरून चंद्रपूर शहराला पाणी पुरवठा केला जातो. ते एकमात्र स्त्रोत आहे. परिणामी शहरात सुद्धा पाणी टंचाई होऊ शकते. सध्या धरणात १८ दलघमी पाणीसाठा आहे. वीज केंद्राच्या व्यवस्थापनाने सुद्धा १५ जुलैपर्यंत पाऊस न आल्यास वीज केंद्र बंद करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. मान्सून सुरू होऊन जवळपास २५ दिवसांचा कालावधी लोटला. मात्र, चंद्रपूर जिल्ह्यात सरासरी १५० मि.मी.च्यावर पाऊस पडला आहे.



SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.