Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, जून १२, २०१८

अहीर यांनी मांडला 4 वर्षांच्या विकासात्मक कारकीर्दीचा आलेख

चंद्रपूर/प्रतिनिधी:
केंद्रातील मा. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारच्या 04 वर्षातील विकासात्मक उपलब्धींचा गोषवारा लोकांसमोर मांडण्यासाठी चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे खासदार तथा केंद्रीय गृह राज्यमंत्राी हंसराज अहीर यांनी गोंडपिपरी व राजुरा या दोन्ही तालुक्यातील अनेक गावांना भेटी देवुन नागरिकांशी थेट संवाद साधला. याप्रसंगी केंद्रीय गृह राज्यमंत्रयांनी आपल्या 4 वर्षांच्या कारकीर्दीत मोदी सरकारने विविध कल्याणकारी तसेच विकासाभिमुख योजनांच्या माध्यमातून अनेक क्षेत्रांमध्ये केलेला अभुतपुर्व विकास विरोधकांना व्यथित करणारा असल्याने विरोधकांनी लोकांची दिशाभुल करण्याचा प्रयत्न चालविला असुन विरोधकांचे हे प्रयत्न हाणुन पाडण्यासाठी भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकत्र्यांनी सज्ज होत केंद्र व राज्य सरकारच्या योजनांची, विविध क्षेत्रात होत असलेल्या विकासाची माहिती लोकांपर्यंत पोहचवावी असे आवाहन ना. अहीर यांनी केले.
गोंडपिपरी तालुक्यातील तोहोगांव, लाठी, सोनापूर (देश.), धाबा तसेच राजुरा तालुक्यातील विरूर (स्टे.) या गावातील नागरिकांशी मंत्राी महोदयांनी संवाद साधत केंद्र व राज्य सरकारच्या लोककल्याणकारी योजनांची व विकासात्मक धोरणांची माहिती दिली. अवघ्या 04 वर्षामध्ये लोकांना अपेक्षीत असलेला विकास साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शब्द पाळला आहे. मुख्यमंत्राी देवेंद्र फडणवीस यांच्या राजवटीत महाराष्ट्राने विकासाच्या दिशेने झेप घेतली असतांना या विकास कार्याने व्यथीत झालेल्या विरोधकांनी लोकांची दिशाभुल चालविली असली तरी नागरिक या फसव्या अपप्रचाराला महत्व देणार नाही असा विश्वास व्यक्त करून केंद्रीय गृह राज्यमंत्रयानी ग्रामीण व शहरी लोकांसाठी पंतप्रधान आवास योजना, उज्वला गॅस योजना, जन धन योजना, सौभाग्य योजना व अनेक योजनांच्या माध्यमातून देशामध्ये समाजाभिमुख विकास होत असल्याचे सांगीतले. ज्यांनी अव्याहतपणे प्रदिर्घ सत्तेचा उपभोग घेतला. परंतू जनसामान्यांच्या प्रश्नांना कधीही समजुन घेतले नाही. लोकांच्या विश्वासाला सदैव तडा दिला अशा लोकांनी जनतेमध्ये भ्रम पसरवून सरकारच्या चांगल्या कामांना नख लावण्याचा प्रयत्न चालविला असला तरी अशा खोट्या व भ्रामक प्रचाराला नागरिक भीक घालणार नाही असा विश्वास केंद्रीय गृह राज्यमंत्राी अहीर यांनी या संवाद कार्यक्रमातून व्यक्त केला.
या कार्यक्रमास राजुरा विधानसभा क्षेत्राचे प्रमुख खुशाल बोंडे, भाजपा जिल्हा सचिव अरूण मस्की, आदिवासी नेते वाघुजी गेडाम, सतिश धोटे, तालुका अध्यक्ष सुनिल उरकुडे, किसान आघाडी जिल्हा महामंत्राी राजु घरोटे, गोंडपिपरी पं.स. सभापती दिपक सातपुते, गोंडपिपरीचे नगराध्यक्ष संजय झाडे, उपसभापती मनिष वासमवार, नगरसेवक राधेश्याम अडाणिया, जि.प. सदस्या वैष्णवी अमर बोडलावार, जि.प. सदस्या स्वाती वडपल्लीवार, विस्तारक सतिष दांडगे, मधुकर नरड, तोहगावचे सरपंच हंसराज रागीट, तिरूपती नल्लाला, किट्टी बावेजा, सतिष कोमडपल्लीवार, गोंडपिपरीच्या तहसिलदार श्रीमती. मिटकरी, गोंडपिपरीचे गट विकास अधिकारी श्री. मोहीतकर यांचेसह भाजपाचे तालुका पदाधिकारी उपस्थित होते. 
यावेळी ना. अहीर यांनी नागरिकांच्या समस्या जाणुन घेतल्या उपस्थित अधिकाÚयांद्वारा तालुक्यातील विकासकामांची माहिती जाणुन घेतली. विकासकामे कालबध्द कार्यक्रमानुसार गतीशीलतेने होण्याकरिता अधिकाÚयांनी व्यक्तीगत पातळीवर नियंत्राण ठेवावे अशा सुचना केल्या यावेळी संबंधीत गावातील नागरिक बहुसंख्येनी उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.