Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, जानेवारी १५, २०१८

कर्जबाजारी शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या


वरोरा/प्रतिनिधी: 
रोगराईने पिके नष्ट झाल्याने तसेच कर्जाचे डोंगर असल्याने कर्जाची परतफेड कशी करायची या विवंचनेत असणाऱ्या एका शेतकऱ्याने जंगलातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना वरोरा तालुक्यातील ताडगव्हाण येथे घडली. सदानंद दादाजी सूर वय ४४ असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे.
सध्या शेतकऱ्यांच्या पिकांवर अनेक रोगांनी घात घातला असून शेतकरी आस्मानी संकटात सापडला आहे. 
वरून शेतीसाठी कर्ज घेतलेले परत कसे करायचे यामुळे ते अस्वस्थ असायचे. त्यातच पिकांवर अनेक प्रकारची लागण झाल्याने संपूर्ण पीक नष्ट झाले होते याच विवंचनेत गेल्या काही दिवसांपासून सदानंद हे चिंतेत असायचे .सोमवारी सकाळी उठून शेताकडे गेले व परिसरातील जंगलात झाडाला गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली. या घटनेची माहिती शेगाव पोलिसांना मिळताच घटनेचा पंचनामा केला व आकस्मित मृत्यूची नोंद केली.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.