Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, जानेवारी २०, २०१८

नगरसेवकांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

चंद्रपूर : मनपाच्या नगरोत्थान व दलित वस्ती सुधार योजनेंतर्गतचा निधी वाटपाचा वाद आता आणखी चिघळत चालला आहे. मतदारांना सामोरे जाण्यासाठी प्रभागात या निधीतून विकासकामे करणे आवश्यक असल्याने अनेक नगरसेवक आपल्या प्रभागासाठी निधी मिळावा म्हणून पाठपुरावा करीत आहेत. मात्र पदाधिकाºयांनी सर्व निधी आपल्याच प्रभागात वळता केल्याने विरोधकांसह भाजपाचेही नगरसेवक संतापले आहे. स्थायी समितीचे सभापती राहुल पावडे यांना या नगरसेवकांनी शुक्रवारी घेराव घातला. त्यानंतर थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करीत न्याय निवाडा करण्याची मागणी केली.
मनपात भाजपात स्पष्ट बहुमत आहे. त्यामुळे आतापर्यंत विरोधकांचा फारसा आक्रोश कधी दिसून आला नाही. मात्र आता विकासनिधी वाटपावरून विरोधकांसह भाजपाचे काही नगरसेवकही संतापले आहेत. शहरातील विविध प्रभागाच्या विकासासाठी शासनाकडून नगरोत्थान व दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत निधी दिला जातो. २०१७-१८ या वर्षासाठीदेखील शासनाकडून मनपाला नगरोत्थान व दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत कोट्यवधींचा निधी प्राप्त झाला आहे. मात्र हा निधी वाटप करताना मनपाच्या सत्तारुढ पदाधिकाºयांनी भेदभाव केल्याचा आरोप आहे. शहरातील अनेक प्रभागातील वस्त्यांमधील अनेक कामे प्रलंबित आहे. तेथील नागरिकांच्या समस्या अजूनही कायम आहेत. मात्र २०१७-१८ मध्येही या वस्त्यांच्या विकासासाठी निधी देण्यात आलेला नाही. मनपा पदाधिकाºयांच्या या सापत्न वागणुकीमुळे विरोधकांसह सत्ताधारी भाजपाच्याही काही नगरसेवकांमध्ये सध्या तीव्र नाराजी पसरली आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.