Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, डिसेंबर १४, २०१७

बोंड अळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दया

 राजुरा विधान सभेचे लोकप्रिय आमदार मा.श्री.अड. संजयभाऊ धोटे यांचा नेतृत्वात भाजयुमो जिल्हा सचिव आशिष ताजने यांची राज्याचे कृषीराज्य मंत्री  सदाभाऊ खोत यांचाकडे मागणी
चंद्रपूर/प्रतिनिधी
चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कपासी पिकावर बोंड अळीचा पादुरभाव झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे शेतातील कपाशीचे पीक पुर्णपणे नष्ट होण्याचा मार्गावर असून काही शेतकऱ्यांचे पीक पूर्ण नष्ट सुधा झाले आहे या गोष्टीची दखल घेत आमदार मा.श्री. संजयभाऊ धोटे यांचा नतृत्वत भाजयुमो जिल्हा सचिव आशिष ताजने यांनी राज्याचे कृषीराज्य मंत्री मा.श्री.सदाभाऊ खोत्त यांच्याकडे बोंड अळीमुळे होत असलेल्या नुकसानीची कापूस उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली
               बोंड अळीचा पदुर्भव अचानकपणे झालेल्या कपाशीचे पीक अचानक पणे नष्ट झालेले आहे तसेच कापसाचा उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे चंद्रपूर जिल्ह्यात शेतकरी मोठ्या प्रमाणात शेतकरी कपाशीचे उत्पादन घेतात.परंतु बोंड अळीचा पडूर्भवामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेला आहे तरी शेतकऱ्यांना या आर्थिक संकटातून बाहेर काडण्यासाठी राज्यशासनातर्फे शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी  भाजयुमो जिल्हा सचिव आशिष ताजने यांनी कृषी राज्यमंत्री मा.ना.श्री. सदाभाऊ खोत यांचाकडे केलेली आहे.तसेच सदर प्रकरणाबाबत अतिशय गंभीर असून आम्ही लवकरच यावर सकारात्मक शासन निर्णय घेऊन शेतकऱ्यांना आर्थिक मदत करू असे कृषीराज्य मंत्री मा.ना.श्री सदाभाऊ खोत यांनी सांगितले

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.