Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, डिसेंबर ०९, २०१७

नागपूरमध्ये ‘जवाब दो’ धरणे सत्याग्रह


पुणे : राजकीय इच्छाशक्तीचा अभाव कायम असल्याने महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे यांचे मारेकरी अद्याप सापडलेले नाहीत. याबाबत निषेध व्यक्त करण्यासाठी विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशन काळात १८ डिसेंबर रोजी नागपूर येथे ‘जवाब दो’ धरणे सत्याग्रह आंदोलन करण्यात येणार आहे. सनदशीर मार्गाने केलेल्या आंदोलनाची शासनाने दखल न घेतल्यास अराजक परिस्थिती निर्माण होईल, अशी संतप्त प्रतिक्रिया महाराष्ट्र अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील आणि उपाध्यक्ष अशोक धिवरे यांनी दिली.
डॉ. दाभोलकर यांच्या खुनाला २० डिसेंबर रोजी ५२ महिने पूर्ण होत आहेत. पानसरे यांच्या खुनाला ३४ महिने पूर्ण होत आहेत. या खुनांच्या कटामध्ये सनातन आणि हिंदू जनजागरण समितीचा हात असल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले आहे. समीर गायकवाड आणि वीरेंद्र तावडे अटकेत असले तरी फरार मारेकरी सारंग अकोलकर आणि विनय पवार यांना पकडण्यात यंत्रणांना अद्याप यश आलेले नाही. त्यामुळेच अटकेतील दोघांना जामीनावर सोडण्यासाठी न्यायालयावर दबाव निर्माण केला जात आहे. त्यामुळे कायदा-व्यवस्थेचा धाक कमी होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या दिरंगाईचा जाब विचारण्यासाठी जवाब दो धरणे सत्याग्रह आंदोलन करण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.
दाभोलकर आणि पानसरे यांचे खून विचारधारेच्या आधारावर झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचा छडा लावण्यासाठी तपास यंत्रणेमध्ये विचारी, विवेकी लोक असण्याची गरज आहे, असे मत धिवरे यांनी व्यक्त केले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.