गोंडपिपरी/प्रतिनिधी:
शेतकरी शेतात काम करत असताना चराईसाठी सोडलेल्या बैलावर वाघाने हल्ला चढविला यात बैल गंभीररीत्या जखमी झाल्याची घटना सोमवारी दुपारच्या सुमारास घडली.गोंडपिपरी तालुक्यातील धाबा येथील शेतकरी कचरू झाडे हे आपल्या शेतात कापूस वेचणीचे काम करीत होते व त्यांनी त्यांचा बैल हा चराईसाठी सोडला होता याच वाघाने संधी साधत बैलावर वाघाला प्राणघातक हल्ला केला व बैलाला एका शेतातून दुसऱ्याच्या शेतात फरफटत नेऊन त्याची शिकार करण्याचा प्रयत्न केला मात्र तितक्यात बैलमालक व त्याच्या मुलाने प्रसंगावध राहून आपल्या बैलाची सुटका या वाघाच्या तावडीतून केली यात बैल गंभीर जखमी झाला असून बैलाच्या मानेवरती व पाठीवरती गंभीर जखमा झाल्याने शेतकऱ्याला वन विभागाने तात्काळ मदत द्यावी असे मागणी करण्यात येत आहे.
Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads
सोमवार, नोव्हेंबर २७, २०१७
Author: खबरबात
खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.
या बातम्यादेखील नक्की वाचा
- Blog Comments
- Facebook Comments