Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, मे ०५, २०१४

वर्धा नदीच्या पात्रात मच्छीमाराचा मृत्यू

गोंडपिपरी तालुक्याच्या सिमेवरून वाहणार्‍या वर्धा नदीच्या पात्रात एका मच्छीमार जाळे टाकत असतानाच फिट आल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. बाल्या चिन्ना बाकेवार (३५) रा. लगामबोरी ता. अहेरी, असे मृत मच्छीमाराचे नाव आहे.
बाल्या बाकेवार हा १0 ते १२ वर्षांपासून मासेमारीचा व्यवसाय करतो. तो वर्षातील केवळ ४ महिने गावात काढत असून, उर्वरित ८ महिने नदीपात्रातच राहत होता. शुक्रवारी रात्री मासे पकडण्यासाठी बाल्या नदीपात्रात जाळे पसरवीत होता. दरम्यान त्याला पाण्यात फिट आल्याने तो पाण्यात कोसळला व यातच त्याचा मृत्यू झाला. मृताकडे शेती नसल्याने या व्यवसायावरच त्याची उपजिविका होती. त्याच्या पश्‍चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा व चार भाऊआहेत. बाल्याच्या आकस्मिक निधनामुळे कुटुबीयांवर मोठे संकट कोसळले असून, शासनाने आर्थिक मदत देण्याची मागणी होत आहे.



SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.